AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आमचा सूर्य योग्य ठिकाणी उगवला, सुजय विखेंचं अजित पवारांना प्रत्युत्तर

भाजपचे खासदार सुजय विखे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे (Sujay Vikhe on Ajit Pawar criticism).

आमचा सूर्य योग्य ठिकाणी उगवला, सुजय विखेंचं अजित पवारांना प्रत्युत्तर
| Updated on: Mar 11, 2020 | 10:08 PM
Share

अहमदनगर : भाजपचे खासदार सुजय विखे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे (Sujay Vikhe on Ajit Pawar criticism). जिकडे सूर्य उगवतो विखे तिकडे जातात. त्यांना वाटलं सूर्य तिकडे उगवेल. मात्र. तो इकडेच उगवला, अशी टीका अजित पवारांनी विखे पाटलांवर केली. यावर सुजय विखे यांनी आमचा सूर्य योग्य ठिकाणी उगवल्याचं म्हणत अजित पवारांना प्रत्युत्तर दिलं.

सुजय विखे म्हणाले, “वास्तविकपणे भाजपमध्ये अनेक प्रवेश झाले. त्यात सत्ता येणार म्हणून काही प्रवेश झाले, असे काहींचे तर्क असू शकतात. मात्र, आम्ही भाजपमध्ये गेलो, कारण आम्हाला यांनी संधी दिली नाही. हा आमच्या आणि इतरांच्या भाजप प्रवेशात मुलभूत फरक आहे. महाराष्ट्रात भाजपची सत्ता येणार, केंद्रात नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊन भाजपची सत्ता येणार, 303 जागा येणार हे आम्हाला माहिती नव्हतं. आम्ही त्याकाळात प्रामाणिकपणे काँग्रेसचं काम केलं. काँग्रेस पक्ष जिल्ह्यात वाढवला. यांना जर आम्हाला उगवत्या सुर्याकडे जाऊ द्यायचं नव्हतं, तर त्यांनी आम्हाला लोकसभेचं तिकिट द्यायला हवं होतं. आम्ही भाजपमध्ये नसतो गेलो.”

आम्ही कुणाकडेही पाहून भाजपमध्ये गेलो नाही. आमच्यावर अन्याय झाला, सुडबुद्धीचं राजकारण झालं. त्यानंतर आम्हाला भाजपने आधार दिला. तो आधार आम्ही स्वीकारला. त्यानंतर महाराष्ट्रातील जनतेने भाजप-शिवसेना युतीलाच कौल दिला. त्यामुळे आम्ही घेतलेला निर्णय चुकला असं अजिबात नाही. पण अपवादात्मक आलेली सत्ता आणि त्याच्यावर होणाऱ्या भाषणावर मी टीका नको करायला. मागील काळात कर्नाटक झालं, आता मध्यप्रदेश झालं, आगामी काळात महाराष्ट्रातही सत्तांतरण होईल, असंही सुजय विखे म्हणाले.

Sujay Vikhe on Ajit Pawar criticism

Follow Us
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.