AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काँग्रेसच्या काळात 15 वेळा सर्जिकल स्ट्राईक झाला : अशोक गहलोत

जयपूर : पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय वायूसेनेने पाकिस्तानमध्ये घुसून एअर स्ट्राईक केला. या कारवाईचं भाजपने राजकारण केलं असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातो. पण यातच आता काँग्रेसचे नेते आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी एक नवा दावा केलाय. काँग्रेस सरकारच्या काळात आम्ही 15 वेळा सर्जिकल स्ट्राईक केला, पण याची कधी चर्चाही केली नाही, असं ते म्हणाले. राजस्थानमधील […]

काँग्रेसच्या काळात 15 वेळा सर्जिकल स्ट्राईक झाला : अशोक गहलोत
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:17 PM
Share

जयपूर : पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय वायूसेनेने पाकिस्तानमध्ये घुसून एअर स्ट्राईक केला. या कारवाईचं भाजपने राजकारण केलं असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातो. पण यातच आता काँग्रेसचे नेते आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी एक नवा दावा केलाय. काँग्रेस सरकारच्या काळात आम्ही 15 वेळा सर्जिकल स्ट्राईक केला, पण याची कधी चर्चाही केली नाही, असं ते म्हणाले. राजस्थानमधील सर्वच्या सर्व 25 जागा जिंकणार असल्याचा दावाही गहलोत यांनी केला.

जनता भोळी आहे. जनतेला वाटतं मोदींनी सर्जिकल स्ट्राईक केलाय. या अगोदरही 15 वेळा सर्जिकल स्ट्राईक झालाय. काँग्रेसच्या काळात 15 वेळा सर्जिकल स्ट्राईक झाला, पण त्यावर कधी आम्ही चर्चा केली नाही. कायद्याने हे करताही येत नाही, पण तुम्ही (पंतप्रधान मोदी) जाहीरपणे सांगताय, असं अशोक गहलोत म्हणाले.

इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे दोन तुकडे करुन बांगलादेशची निर्मिती केली. त्यांनी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली, पण नव्या खलिस्तानची निर्मिती होऊ दिली नाही. पण मोदी गांधी कुटुंबाविषयी सतत वाईट बोलत राहतात, या गोष्टींचा साधा उल्लेखही करत नाहीत, असं म्हणत मोदी सरकारने आश्वासने पूर्ण केली नसल्याचा आरोप गहलोत यांनी केला. मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह हे दोन चेहरे आज देशावर ज्या पद्धतीने राज्य करतात, ते दुर्दैवी असल्याचंही गहलोत म्हणाले.

सध्या लोकशाही धोक्यात आहे, संविधानही धोक्यात आहे, देश धोक्यात आहे. राजस्थानमध्ये आम्हीच निवडणूक जिंकू. आमचं मिशन 25 सुरु आहे. कारण, जनतेचा विश्वास आमच्यावर आहे. या सरकारचा अंत लवकरच आहे, असंही गहलोत म्हणाले.

Follow Us
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.