AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता माघार नाही! ‘तो’ व्हीडिओ दाखवत सुषमा अंधारे म्हणाल्या, “उद्धवसाहेबांना पुन्हा मुख्यमंत्री करायचंय…”

शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा राज्याच्या प्रमुखपदी म्हणजेच मुख्यमंत्रीपदी बसवण्याचा निर्धार व्यक्त केलाय. त्या सोलापुरात बोलत होत्या. त्यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे...

आता माघार नाही! 'तो' व्हीडिओ दाखवत सुषमा अंधारे म्हणाल्या, उद्धवसाहेबांना पुन्हा मुख्यमंत्री करायचंय...
| Edited By: | Updated on: Dec 27, 2022 | 9:50 AM
Share

सोलापूर : शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा राज्याच्या प्रमुखपदी म्हणजेच मुख्यमंत्रीपदी बसवण्याचा निर्धार व्यक्त केलाय. सोलापुरातील जाहीर सभेत बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीचा व्हीडिओ दाखवला आणि उपस्थित शिवसैनिकांना आवाहन केलं.

“हा व्हीडिओ मी यासाठी दाखवला की उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतानाचं चित्र सर्व शिवसैनिकांच्या मनात साठलं पाहिजे. प्रत्येक शिवसैनिकाने एक गोष्ट लक्षात ठेवावी की, पुन्हा एकदा वर्षा बंगल्यावर, विधानभवनावर पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडकवायचा आहे आणि उद्धवसाहेबांना पुन्हा मुख्यमंत्री करायचं आहे”, असा निर्धार सुषमा अंधारे यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री म्हणतात हे सर्वसामान्य लोकांचं सरकार आहे. यांचे सामान्य लोक म्हणजे कोण? तर सुभाष देशमुख, निलंगेकर, वगैरे वगैरे… देवेंद्रजींनी एका महिन्यात 15 लोकांना क्लिनचीट देवून क्लोजर रिपोर्ट कसा काय दिला? यावर आम्ही सरकारला प्रश्न विचारणारच, असं अंधारे म्हणाल्यात.

“मेरे प्यारे भाईयों, बहनों…”, असं म्हणत सुषमा अंधारे यांनी पुन्हा एकदा मोदींची मिमिक्री केली आहे. शिवाय गुलाबराव पाटील यांचीही त्यांनी मिमिक्री केली.

ना खाऊंगा ना खाणे दूंगा बस नीरव मोदी, माल्ल्या को आधा दे दूंगा… काला धन वापस आया क्या?, असं म्हणत अंधारे यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. अमित शहांच्या पकोडे दुकानाची आठवण करून दिली.केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्यावरही अंधारे यांनी टीका केली आहे.

तानाजी सावंत हा आपला भाऊ आहे. त्याला खेकडा बिकडा म्हणू नका, असं म्हणत अंधारे यांनी सावंतांना डिवचलं आहे.

लोकसंख्या जास्त असली म्हणून ती विकासाला अडचण ठरत नाही. तसं असते तर चायना सर्वाधिक जास्त लोकसंख्या असुनही ती जगात पुढे आहे, असंही सुषमा अंधारे म्हणाल्यात.

मुलांनी जास्त विचार करु नये म्हणून डेली दीड जीबी डेटा दिला आहे. कॅगच्या अहवालात सांगितलंय, की एका महिन्यात 15 लाख नोकऱ्या गेल्या. याकडे लक्ष जाऊ नये म्हणून हिंदू मुस्लिम भांडण लावत आहेत, असा आरोपही सुषमा अंधारे यांनी सरकारवर केलाय.

Follow Us
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका.
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी.
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची...
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची....
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार.
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर.
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश.
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ.....
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.