AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गावचा सुपुत्र मुख्यमंत्री झाला, गावातल्या प्रत्येक कुटुंबाला 10 लाख, तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

चंद्रशेखर राव (KCR) ज्या गावात राहिले, वाढले त्या गावातील प्रत्येक कुटुंबाला थोडीथोडकी नव्हे तर तब्बल 10-10 लाख रुपये देण्याची घोषणा तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी केली.

गावचा सुपुत्र मुख्यमंत्री झाला, गावातल्या प्रत्येक कुटुंबाला 10 लाख, तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Jul 23, 2019 | 10:07 AM
Share

हैदराबाद : तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (K. Chandrashekar Rao) यांनी स्वत:च्या गावाप्रती सर्वात मोठी कृतज्ञता व्यक्त केली आहे. चंद्रशेखर राव (KCR) ज्या गावात राहिले, वाढले त्या गावातील प्रत्येक कुटुंबाला थोडीथोडकी नव्हे तर तब्बल 10-10 लाख रुपये देण्याची घोषणा तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी केली. इतकंच नाही तर गावातील प्रत्येक कुटुंबाला नवं घर बांधून देण्यात येणार आहे.

चंद्रशेखर राव हे त्यांच्या सिद्दीपेट या जिल्हा दौऱ्यावर होते, त्यावेळी त्यांनी चिंतामडका (Chintamadaka) गावातील दोन हजार कुटुंबांना प्रत्येकी 10-10 लाख रुपये देण्याची घोषणा केली.

गावातील नागरिकांना स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी चंद्रशेखर राव यांनी ही अवाढव्य घोषणा केली. दोन हजार कुटुंबांना प्रत्येक 10 लाख यानुसार जवळपास 2 अब्ज रुपये देण्यात येणार आहेत.

KCR यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले की, चिंतामडका गावातील तरुण कोणत्या उद्योगातून कमाई करु इच्छित असतील, तर त्यांना आवश्यक ती मदत करा. इतकंच नाही तर कामाच्या शोधात गावं सोडून गेलेल्या नागरिकांनाही परत बोलवण्यास केसीआर यांनी बजावलं आहे.

या घोषणेदरम्यान केसीआर यांच्यासोबत त्यांचा भाचा आणि सिद्दीपेट मतदारसंघाचे आमदार हरीश राव आणि वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

गावातील 2000 कुटुंबांना प्रत्येकी 10 लाख आणि घर बांधून देण्याचा आदेश केसीआर यांनी दिला. केसीआर यांच्या या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर 400 कोटी रुपयांचा भार पडणार आहे.

स्वयंरोजगार योजनेतून सर्व कुटुंबांसाठी आर्थिक मदतीपोटी 200 कोटींचा खर्च होईल, तर उर्वरीत 200 कोटी रुपये घरं, हॉटेल आणि रस्ते विकासावर खर्च करण्यात येणार आहेत. जी आर्थिक मदत दिली जाणार आहे, ती ट्रॅक्टर खरेदी, डेअरी उद्योग यासारख्या स्वयंरोजगारासाठी देण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या  

देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री कोण?

तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांच्या मुलीला 179 शेतकऱ्यांनी मिळून हरवलं 

तीन मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भव्य प्रकल्पाचा शुभारंभ, महाराष्ट्राला फायदा काय?  

Follow Us
MNS शहराध्यक्षांच्या गाडीची तोडफोड: मनसेचा भाजपवर आरोप
अंबरनाथमधील भाजप-मनसे राड्यावरुन मनसे नेते आक्रमक, गाडी तोडफोड करणाऱ्यांवर कारवाईची मागणी
चाकणच्या 20 कंपन्या स्थलांतराच्या तयारीत? 2 हजार रोजगारांचा प्रश्न
Sharad Pawar | चाकणच्या 20 कंपन्या स्थलांतराच्या तयारीत? 2 हजार रोजगारांचा प्रश्न; शरद पवार यांचा दावा
आमदार अपात्रता निर्णयावर राहुल नार्वेकरांचं मोठं वक्तव्य...
Rahul Narwekar | आमदार अपात्रता निर्णयावर राहुल नार्वेकरांचं मोठं वक्तव्य; सुप्रीम कोर्टात निर्णय....
फडणवीसांच्या निर्देशाने महा-आयडी; नागरिकांना मिळणार एकच डिजिटल ओळख
मुख्यमंत्री फडणवीसांच्या निर्देशाने महा-आयडी; नागरिकांना मिळणार एकच डिजिटल ओळख
पाकिस्तानचे PM शाहबाज शरीफ यांची पुन्हा भारताला धमकी
‘सिंधूचं पाणी आमची रेड लाईन’; पाकिस्तानचे PM शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
‘गावातील शाळांना सुविधा मिळेपर्यंत स्वातंत्र्याचं स्वप्न अपूर्ण'-दिपके
‘गावातील शाळांना सुविधा मिळेपर्यंत स्वातंत्र्याचं स्वप्न अपूर्ण'- अभिजीत दिपके
जमिनीच्या वादात अडकलेल्यांसाठी मोठी बातमी! सरकारचा मेगा प्लॅन
Chandrashekhar Bawankule | जमिनीच्या वादात अडकलेल्यांसाठी मोठी बातमी! सरकारचा मेगा प्लॅन; चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली घोषणा, म्हणाले...
जरांगेंच्या टीकेनंतर बावनकुळे भावुक; लाड म्हणाले, ‘वैयक्तिक टीक नको’
जरांगेंच्या टीकेनंतर बावनकुळे भावुक; प्रसाद लाड म्हणाले, ‘वैयक्तिक टीका नको’
मनिषा कायंदे यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल : "शिंदेंच्या जीवावर खासदार
मनिषा कायंदे यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल :
राजकीय उद्योग सोडून उद्योजकांकडे लक्ष द्यावे: सामंतांवर हल्लाबोल
राजकीय उद्योग सोडून उद्योजकांकडे लक्ष द्यावे: रोहित पवारांचा उद्योगमंत्री सामंतांवर हल्लाबोल