AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गावचा सुपुत्र मुख्यमंत्री झाला, गावातल्या प्रत्येक कुटुंबाला 10 लाख, तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

चंद्रशेखर राव (KCR) ज्या गावात राहिले, वाढले त्या गावातील प्रत्येक कुटुंबाला थोडीथोडकी नव्हे तर तब्बल 10-10 लाख रुपये देण्याची घोषणा तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी केली.

गावचा सुपुत्र मुख्यमंत्री झाला, गावातल्या प्रत्येक कुटुंबाला 10 लाख, तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
| Updated on: Jul 23, 2019 | 10:07 AM
Share

हैदराबाद : तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (K. Chandrashekar Rao) यांनी स्वत:च्या गावाप्रती सर्वात मोठी कृतज्ञता व्यक्त केली आहे. चंद्रशेखर राव (KCR) ज्या गावात राहिले, वाढले त्या गावातील प्रत्येक कुटुंबाला थोडीथोडकी नव्हे तर तब्बल 10-10 लाख रुपये देण्याची घोषणा तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी केली. इतकंच नाही तर गावातील प्रत्येक कुटुंबाला नवं घर बांधून देण्यात येणार आहे.

चंद्रशेखर राव हे त्यांच्या सिद्दीपेट या जिल्हा दौऱ्यावर होते, त्यावेळी त्यांनी चिंतामडका (Chintamadaka) गावातील दोन हजार कुटुंबांना प्रत्येकी 10-10 लाख रुपये देण्याची घोषणा केली.

गावातील नागरिकांना स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी चंद्रशेखर राव यांनी ही अवाढव्य घोषणा केली. दोन हजार कुटुंबांना प्रत्येक 10 लाख यानुसार जवळपास 2 अब्ज रुपये देण्यात येणार आहेत.

KCR यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले की, चिंतामडका गावातील तरुण कोणत्या उद्योगातून कमाई करु इच्छित असतील, तर त्यांना आवश्यक ती मदत करा. इतकंच नाही तर कामाच्या शोधात गावं सोडून गेलेल्या नागरिकांनाही परत बोलवण्यास केसीआर यांनी बजावलं आहे.

या घोषणेदरम्यान केसीआर यांच्यासोबत त्यांचा भाचा आणि सिद्दीपेट मतदारसंघाचे आमदार हरीश राव आणि वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

गावातील 2000 कुटुंबांना प्रत्येकी 10 लाख आणि घर बांधून देण्याचा आदेश केसीआर यांनी दिला. केसीआर यांच्या या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर 400 कोटी रुपयांचा भार पडणार आहे.

स्वयंरोजगार योजनेतून सर्व कुटुंबांसाठी आर्थिक मदतीपोटी 200 कोटींचा खर्च होईल, तर उर्वरीत 200 कोटी रुपये घरं, हॉटेल आणि रस्ते विकासावर खर्च करण्यात येणार आहेत. जी आर्थिक मदत दिली जाणार आहे, ती ट्रॅक्टर खरेदी, डेअरी उद्योग यासारख्या स्वयंरोजगारासाठी देण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या  

देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री कोण?

तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांच्या मुलीला 179 शेतकऱ्यांनी मिळून हरवलं 

तीन मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भव्य प्रकल्पाचा शुभारंभ, महाराष्ट्राला फायदा काय?  

Follow Us
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.
शिंदेंच्या काळात नगरविकास खात्यात मोठा भ्रष्टाचार, राऊतांचे थेट आरोप
शिंदेंच्या काळात नगरविकास खात्यात मोठा भ्रष्टाचार, राऊतांचे थेट आरोप.
मुंबई, पुण्यावरही 'अवकाळी'ची अवकृपा, पुढील 24 तास धोक्याची...
मुंबई, पुण्यावरही 'अवकाळी'ची अवकृपा, पुढील 24 तास धोक्याची....
राऊतांचा मोठा दावा शिंदे-अजित पवार गटातील 25-30 आमदार भाजपच्या वाटेवर?
राऊतांचा मोठा दावा शिंदे-अजित पवार गटातील 25-30 आमदार भाजपच्या वाटेवर?.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रफुल पटेल यांची दिल्लीत तासभर चर्चा
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रफुल पटेल यांची दिल्लीत तासभर चर्चा.
NCP मध्ये पत्राचं वादळ, सुनेत्रा पवारांची पटेल-तटकरेंवर नाराजी
NCP मध्ये पत्राचं वादळ, सुनेत्रा पवारांची पटेल-तटकरेंवर नाराजी.