AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मध्य प्रदेशात भाजपचा 14 वर्षांचा निर्णय काँग्रेसकडून रद्द, ‘वंदे मातरम्’ बंद!

भोपाळ : मध्य प्रदेशातील काँग्रेसशासित कमलनाथ सरकारने गेल्या 14 वर्षांपासून सुरु असलेली परंपरा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कमलनाथ सरकारने दर महिन्याच्या पहिल्या तारखेला मंत्रालयात गायलं जाणाऱ्या ‘वंदे मातरम्’चा निर्णय रद्द केला आहे. शिवराजसिंह चौहान मुख्यमंत्री असताना त्यांनी आपल्या काळात दर महिन्याच्या पहिल्या तारखेला मंत्रालयाबाहेर सामूहिक ‘वंदे मातरम्’ गाण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या 14 वर्षांपासून ही परंपरा अविरतपणे सुरु होती. कुठलाही […]

मध्य प्रदेशात भाजपचा 14 वर्षांचा निर्णय काँग्रेसकडून रद्द, 'वंदे मातरम्' बंद!
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: Jul 05, 2019 | 4:46 PM
Share
भोपाळ मध्य प्रदेशातील काँग्रेसशासित कमलनाथ सरकारने गेल्या 14 वर्षांपासून सुरु असलेली परंपरा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कमलनाथ सरकारने दर महिन्याच्या पहिल्या तारखेला मंत्रालयात गायलं जाणाऱ्या वंदे मातरम्’चा निर्णय रद्द केला आहे. शिवराजसिंह चौहान मुख्यमंत्री असताना त्यांनी आपल्या काळात दर महिन्याच्या पहिल्या तारखेला मंत्रालयाबाहेर सामूहिक वंदे मातरम् गाण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या 14 वर्षांपासून ही परंपरा अविरतपणे सुरु होती. कुठलाही हंगाम असो, उन-वारा-पाऊस असो, तरी महिन्याच्या पहिल्या दिवशी सर्व अधिकारी पोलीस बँडसह वंदे मातरम् म्हणायचे. मात्र कमलनाथ सरकारने आधी जनतेचे काम करा असा संदेश देत हा निर्णय रद्द केला. त्यामुळे आज 1 जानेवारीला भोपाळ येथील मंत्रालयाबाहेर वंदे मातरम् गायलं गेलं नाही.

मध्य प्रदेशातील 15 वर्षांची भाजपची सत्ता संपवत काँग्रेसच्या कमलनाथ सरकारने मध्य प्रदेशात आपली सत्ता स्थापन केली. कमलनाथ सरकार सत्तेत येताच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली. त्यानंतर आता वंदे मातरम् रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र याबाबत कुठलाही अध्यादेश सरकारने जारी केला नव्हता.

कमलनाथ सरकारच्या या निर्णयावर भाजपने मात्र आक्षेप घेतला आहे. वंदे मातरम् म्हणत स्वातंत्र्याची लढाई लढली गेली. काँग्रेसच्या या निर्णयाने त्यांची मानसिकता दिसून येत आहे. कमलनाथ सरकारने राजकीय द्वेषातून हा निर्णय घेतला असून त्यांनी स्वत:च्या पायावर कुऱ्हाड मारुन घेतली आहेअशा शब्दांत भाजपचे नेते उमा शंकर गुप्ता यांनी काँग्रेसवर टीका केली.

वंदे मातरम् रद्द करण्याच्या निर्णयासोबतच कमलनाथ सरकारने सरकारी परिसरात असणाऱ्या आरएसएसच्या शाखेलाही बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच कुठलाही सरकारी अधिकारी आरएसएसच्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकणार नाहीअसाही आदेश जारी करण्यात आला आहे. 

Follow Us
साहेब आता निर्णय घ्या... नाराज समर्थकांचं भुजबळांकडे साकडं, राज्यसभा..
साहेब आता निर्णय घ्या... नाराज समर्थकांचं भुजबळांकडे साकडं, राज्यसभा उमेदवारीमुळे थेट विनंती; काय घडतंय?
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण आता... बड्या नेत्याचं सुचक विधान चर्चेत
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण आता... बड्या नेत्याचं सुचक विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?
इंडिया आघाडीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा, ठाकरेंनी काय भूमिका मांडली
इंडिया आघाडीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा, ठाकरेंनी काय भूमिका मांडली? राऊतांनी A टू Z सांगितलं!
मोठी बातमी! पक्षातून हकालपट्टीची होताच मिसाळेंची पहिली प्रतिक्रिया,
मोठी बातमी! पक्षातून हकालपट्टीची होताच मिसाळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले माझा फोन हॅक...
मोठी बातमी! सरकारी ऑफिसात महिला कर्मचाऱ्याचा छळ, बावनकुळेंनी लगेच फोन
मोठी बातमी! सरकारी ऑफिसात महिला कर्मचाऱ्याचा छळ, बावनकुळेंनी लगेच फोन फिरवला, त्या प्रकरणाची गंभीर दखल!
9 लाखांची दारू, 2 हुक्का अन् गांजा, पुण्यातील रेव्ह पार्टीचं हादरवणारं
9 लाखांची दारू, 2 हुक्का अन् गांजा, पुण्यातील रेव्ह पार्टीचं हादरवणारं सत्य;  डिजेच्या तालावर...
मोठी बातमी | जळगाव MIDC मध्ये भीषण आग! कुलर कंपनी धुराच्या लोटात
मोठी बातमी | जळगाव MIDC मध्ये भीषण आग! कुलर कंपनीत धुराचे लोट, मोठी दुर्घटना टळली
अचानक रुग्णालयात पोहोचल्या सुनेत्रा पवार; कर्मचाऱ्यांची घेतली खरडपट्टी
Dcm Sunetra Pawar | मोबाईलमध्ये व्यस्त, कामात हलगर्जीपणा! अचानक रुग्णालयात पोहोचल्या सुनेत्रा पवार; कर्मचाऱ्यांची घेतली खरडपट्टी
राष्ट्रवादीचा मोठा निर्णय, किशोर मिशाळ यांची हकालपट्टी, अजितदादांवर...
राष्ट्रवादीचा मोठा निर्णय, किशोर मिशाळ यांची हकालपट्टी, अजितदादांवर विधान करणं भोवलं!
36 हजार कोटींच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा कृषी मंत्र्यांकडून मोठी घोषणा
Datta Bharne | 56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! 36 हजार कोटींच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा? कृषी मंत्र्यांकडून मोठी घोषणा