AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्र्यांनी चोरी छुपके स्थापन केलेले सरकार टिकणार नाही : नवाब मलिक

"मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे चोरी चोरी छुपके सरकार स्थापन केले आहे, ते टिकणार नाही, आम्ही त्यांचा पराभव करु," असे नवाब मलिक यावेळी (ncp mla meeting in mumbai) म्हणाले. 

मुख्यमंत्र्यांनी चोरी छुपके स्थापन केलेले सरकार टिकणार नाही : नवाब मलिक
| Updated on: Nov 23, 2019 | 10:36 PM
Share

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात एका रात्रीत भूकंप (ncp mla meeting in mumbai) झाला. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीकडून भाजपवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यात आल्या. अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादीची एक बैठक आयोजित करण्यात (ncp mla meeting in mumbai) आली होती. या बैठकीला जितेंद्र आव्हाड, सुप्रिया सुळे, धनंजय मुंडे यांसह इतर नेत्यांसह आमदारही उपस्थित होते. या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी याबाबची माहिती दिली. “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे चोरी चोरी छुपके सरकार स्थापन केले आहे, ते टिकणार नाही, आम्ही त्यांचा पराभव करु,” असे नवाब मलिक यावेळी (ncp mla meeting in mumbai) म्हणाले.

“अजित पवारांनी राज्यपालांना हजेरीसाठी घेतलेले सह्यांचे पत्र दिलं.त्याला बहुमताचे पत्र जोडून हे सरकार शपथविधी करण्यात आला. भाजपला 30 तारखेपर्यंत बहुमत सिद्ध करण्यासाठी मुदत देण्यात आली. मला पूर्ण विश्वास आहे की, जेव्हा विधीमंडळाचे अधिवेशन सुरु होईल. त्यावेळी स्पीकरच्या निवडणुकीत आम्ही त्यांना पराभूत करु,” असा विश्वासही नबाव मलिक यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी अजित पवारांची विधीमंडळ गटनेतेपदावरुन हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर “राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांची विधीमंडळ गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली. अजित पवारांची विधीमंडळ नेतेपदावरुन हकालपट्टी करण्याचा निर्णय एकमताने देण्यात आला. अजित पवार यांनी घेतलेली भूमिका पक्षाविरोधी असल्याने त्यांना त्या पदावरुन हटवण्यात आले,” असेही नवाब मलिक (ncp mla meeting in mumbai) म्हणाले.

“पुढचा निर्णय होत नाही, तोपर्यंत सर्व घटनात्मक अधिकार जयंत पाटील यांना देण्यात आले आहेत,” असेही नवाब मलिक यांनी सांगितले.

“राष्ट्रवादीच्या 54 आमदारांपैकी पाच आमदारांशी आमचा संपर्क झालेला नाही. तर सहा आमदार उद्या सकाळपर्यंत मुंबईला पोहोचतील. उरलेले सर्व आमदार पक्षाच्या बैठकीला हजर होते,” असे नवाब मलिक म्हणाले.

“राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता येईल. आमचे आमदार मुंबईत राहणार आहे. शिवसेना आणि काँग्रेसचेही आमदार मुंबईत येतील,” असेही त्यांनी (ncp mla meeting in mumbai) सांगितले.

दरम्यान आमदार फुटीच्या भितीने राष्ट्रवादीचे सर्व आमदार मुंबईतील रेनिसन्स हॉटेलमध्ये राहणार आहेत. यशवंतराव चव्हाण सेंटरमधून एका बसमधून राष्ट्रवादीचे 42 आमदार पवईतील हॉटेलमध्ये जाण्यासाठी रवाना होणार आहेत. आमदार फुटीच्या भितीने सर्व आमदारांना एकाच बसमधून हॉटेलकडे रवाना झाले आहेत.

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.