Eknath Shinde : बंडखोर आमदारांचा मुक्काम वाढला, 30 जूनपर्यंत शिंदे गट गुवाहाटीमध्येच राहणार

Eknath Shinde : बंडाशी भाजपाचा काही संबंध नाही, असंच राज्यातील नेते सांगत असले आहे. मात्र, तरीही सत्तेचं गणित जुळतंय का, तांत्रिक बाबी काय आहे, यासंदर्भात चाचपणी सुरू असल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे, फडणवीस आणि शिंदे यांच्या भेटीत काय चर्चा झाली, याबाबत देखील कळू शकलेलं नाही

Eknath Shinde : बंडखोर आमदारांचा मुक्काम वाढला, 30 जूनपर्यंत शिंदे गट गुवाहाटीमध्येच राहणार
एकनाथ शिंदे Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 26, 2022 | 7:31 AM

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा गुवाहाटीमध्ये मुक्काम वाढल्याची माहिती आहे. शिंदे गटाचे बंडखोर आमदार आणि शिवसेना (Shivsena) यांच्यातील संघर्षाच्या बातम्या सुरु असतानाच ही बातमी आल्यानं आता पुढे नेमकं काय होतं. याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून आहे. गुजरातमध्ये शुक्रवारी रात्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यात भेट झाल्याची माहिती आहे. या बैठकीला अमित शाह हे देखील उपस्थित होते, असं सांगण्यात येत असलं तरी त्याला अद्याप दुजोरा मिळालेला नाही. एकनाथ शिंदेंच्या बंडाशी भाजपाचा काही संबंध नाही, असंच राज्यातील नेते सांगत आहे. मात्र, तरीही सत्तेचं गणित जुळतंय का, तांत्रिक बाबी काय आहेत. यासंदर्भात एकनाथ शिंदे गटाकडून चाचपणी सुरू असल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे, फडणवीस आणि शिंदे यांच्या भेटीत काय चर्चा झाली. याबाबत देखील कळू शकलेलं नाही. दरम्यान, शिंदे गटानं गुवाहाटीमधील मुक्काम 30 जूनपर्यंत वाढवल्यानं राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

30 जूनपर्यंत मुक्काम का वाढला?

एकनाथ शिंदे गटानं शिवसेनेला भाजपसोबत पुन्हा युती करण्याचा सल्ला दिलाय. तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देखील सत्तेसाठी चाचपणी सुरू असल्याचं दिसतंय. पण, भाजप सावध पवित्रा घेऊन सत्तेची गणितं जुळवत असल्याचं बोललं जातंय. यामुळे शिंदे गटाला प्रत्येक निर्णय हा विचार करून घ्यावा लागत असल्याचं दिसतंय. कारण, शिवसेनेत परतीचे दोर आता पूर्णपणे कापले गेले आहेत. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आणि त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी केलेल्या जहरी टिकेवरुन ते स्पष्ट देखील झालंय.

आदित्य ठाकरेंच्या वक्तव्यानं बंडखोर तापले

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्यानं एकनाथ शिंदे गटातील बंडखोर आमदार आणखीनच तापले असल्याचं दिसून आलं. यामुळे काहीही झालं तरी मुंबईत परतायचं नाही, असंच बंडखोरांना ठरवल्याचं दिसतंय. ‘बरं झाली घाण गेली, असे सांगत आता यापुढे सगळे चांगले घडणार असल्याचे आदित्य ठाकरेंनी सांगितले आहे. ज्यांना मदत केली, ज्यांना उमेदवारी दिली त्यांनी पक्षाशी गद्दारी केली याचे वाईट वाटते असे त्यांनी म्हटले आहे. या आमदारांत जर हिंमत असती तर बंड करण्यासाठी सूरतला जाण्याची काय गरज होती, ठाण्यात राहता आले नसते का, असा प्रश्नही आदित्य यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडची दोन महत्त्वाची खआती नगरविकास आणि एमएसआरडीसी सारखी खआती एकनाथ शिंदेंना दिली, यापेक्षा त्यांना काय द्यायला हवं होतं, असा सवाल आदित्य ठाकरेंनी विचारला आहे. मुख्यमंत्र्यांना सत्तेचा मोह नव्हता. अनेक जण पुन्हा येईन म्हणत असताना, अनेक मंत्री बंगले सोडत नसताना, आम्ही तातडीने वर्षा निवासस्थान सोडले, असं आदित्य ठाकरे म्हणाले होते. 

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.