AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मंदिर किंवा आरक्षण नाही, तर हे आहेत मतदारांचे 10 प्रमुख मुद्दे

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर मंदिर-मस्जिदपासून सवर्ण आरक्षणापर्यंतचे अनेक मुद्दे गाजत आहेत. अशावेळी मतदारांसाठी नेमके कोणते मुद्दे महत्त्वाचे आहेत? हे जाणून घेणे अत्यावश्यक आहे. याच प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी ‘असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स’ (एडीआर) या संस्थेने देशभरात एक सर्वेक्षण केले आहे. एडीआरच्या सर्वेक्षणानुसार चांगल्या रोजगाराच्या संधी हा मुद्दा मतदारांच्या प्राधान्यक्रमात सर्वात वरती आहे. विशेष म्हणजे याच […]

मंदिर किंवा आरक्षण नाही, तर हे आहेत मतदारांचे 10 प्रमुख मुद्दे
| Updated on: Jul 05, 2019 | 4:12 PM
Share

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर मंदिर-मस्जिदपासून सवर्ण आरक्षणापर्यंतचे अनेक मुद्दे गाजत आहेत. अशावेळी मतदारांसाठी नेमके कोणते मुद्दे महत्त्वाचे आहेत? हे जाणून घेणे अत्यावश्यक आहे. याच प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी ‘असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स’ (एडीआर) या संस्थेने देशभरात एक सर्वेक्षण केले आहे.

एडीआरच्या सर्वेक्षणानुसार चांगल्या रोजगाराच्या संधी हा मुद्दा मतदारांच्या प्राधान्यक्रमात सर्वात वरती आहे. विशेष म्हणजे याच सर्वेक्षणानुसार रोजगाराच्याच मुद्द्यावर केंद्र सरकारची कामगिरी सरासरीपेक्षाही वाईट राहिली आहे.

एडीआरने संबंधित सर्वेक्षण 2018 मध्ये ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात घेतला होता. 534 लोकसभा जागांवर झालेल्या या सर्वेक्षणात जवळजवळ 2.73 लाख मतदारांनी सहभाग घेतला होता.

हे आहेत जनतेचे प्रमुख 10 मुद्दे

  1. चांगल्या रोजगाराच्या संधी (प्राधान्य – 46.86%)
  2. चांगली रुग्णालये /प्राथमिक आरोग्य केंद्रे (प्राधान्य – 34.60%)
  3. पिण्याचे पाणी (प्राधान्य – 30.50%)
  4. चांगले रस्ते (प्राधान्य – 28.34%)
  5. चांगली सार्वजनिक वाहतूक सेवा (प्राधान्य – 27.35%)
  6. शेतीसाठी पाण्याची उपलब्धता (प्राधान्य – 26.40%)
  7. शेतीसाठी कर्जाची उपलब्धता (प्राधान्य – 25.62%)
  8. शेतीमालाला हमीभाव (प्राधान्य – 25.41%)
  9. वीज/खते यांच्यावर अनुदान (प्राधान्य – 25.06%)
  10. चांगली कायदा सुव्यवस्था (प्राधान्य – 23.95%)

सर्वाधिक महत्त्वाच्या प्राधान्यक्रमावरील मुद्द्यांवर सरकारची कामगिरी

एडीआरच्या या सर्वेक्षणानुसार, जनतेच्या प्राधान्यक्रमात सर्वात वर असलेल्या मुद्द्यांवर मोदी सरकारची कामगिरी सरासरीपेक्षाही कमी झाली आहे. या सर्वेक्षणात मुल्यांकनाची मोजणी 5 गुणांमध्ये करण्यात आली आहे. तसेच सरासरी गुण 3 ठेवण्यात आले आहेत. या मुद्द्यांवर सरकारला जनतेने 5 पैकी दिलेले गुण खालीलप्रमाणे,

  1. चांगल्या रोजगाराच्या संधी (2.15 गुण)
  2. चांगली रुग्णालये /प्राथमिक आरोग्य केंद्रे (2.35 गुण)
  3. पिण्याचे पाणी (2.52 गुण)
  4. चांगले रस्ते (2.41 गुण)
  5. चांगली सार्वजनिक वाहतूक सेवा (2.58 गुण)
  6. शेतीसाठी पाण्याची उपलब्धता (2.18 गुण)
  7. शेतीसाठी कर्जाची उपलब्धता (2.15 गुण)
  8. शेतीमालाला हमीभाव (2.23 गुण)
  9. वीज/खते यांच्यावर अनुदान (2.06 गुण)
  10. चांगली कायदा सुव्यवस्था (2.26 गुण)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.