AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मंदिर किंवा आरक्षण नाही, तर हे आहेत मतदारांचे 10 प्रमुख मुद्दे

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर मंदिर-मस्जिदपासून सवर्ण आरक्षणापर्यंतचे अनेक मुद्दे गाजत आहेत. अशावेळी मतदारांसाठी नेमके कोणते मुद्दे महत्त्वाचे आहेत? हे जाणून घेणे अत्यावश्यक आहे. याच प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी ‘असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स’ (एडीआर) या संस्थेने देशभरात एक सर्वेक्षण केले आहे. एडीआरच्या सर्वेक्षणानुसार चांगल्या रोजगाराच्या संधी हा मुद्दा मतदारांच्या प्राधान्यक्रमात सर्वात वरती आहे. विशेष म्हणजे याच […]

मंदिर किंवा आरक्षण नाही, तर हे आहेत मतदारांचे 10 प्रमुख मुद्दे
| Updated on: Jul 05, 2019 | 4:12 PM
Share

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर मंदिर-मस्जिदपासून सवर्ण आरक्षणापर्यंतचे अनेक मुद्दे गाजत आहेत. अशावेळी मतदारांसाठी नेमके कोणते मुद्दे महत्त्वाचे आहेत? हे जाणून घेणे अत्यावश्यक आहे. याच प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी ‘असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स’ (एडीआर) या संस्थेने देशभरात एक सर्वेक्षण केले आहे.

एडीआरच्या सर्वेक्षणानुसार चांगल्या रोजगाराच्या संधी हा मुद्दा मतदारांच्या प्राधान्यक्रमात सर्वात वरती आहे. विशेष म्हणजे याच सर्वेक्षणानुसार रोजगाराच्याच मुद्द्यावर केंद्र सरकारची कामगिरी सरासरीपेक्षाही वाईट राहिली आहे.

एडीआरने संबंधित सर्वेक्षण 2018 मध्ये ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात घेतला होता. 534 लोकसभा जागांवर झालेल्या या सर्वेक्षणात जवळजवळ 2.73 लाख मतदारांनी सहभाग घेतला होता.

हे आहेत जनतेचे प्रमुख 10 मुद्दे

  1. चांगल्या रोजगाराच्या संधी (प्राधान्य – 46.86%)
  2. चांगली रुग्णालये /प्राथमिक आरोग्य केंद्रे (प्राधान्य – 34.60%)
  3. पिण्याचे पाणी (प्राधान्य – 30.50%)
  4. चांगले रस्ते (प्राधान्य – 28.34%)
  5. चांगली सार्वजनिक वाहतूक सेवा (प्राधान्य – 27.35%)
  6. शेतीसाठी पाण्याची उपलब्धता (प्राधान्य – 26.40%)
  7. शेतीसाठी कर्जाची उपलब्धता (प्राधान्य – 25.62%)
  8. शेतीमालाला हमीभाव (प्राधान्य – 25.41%)
  9. वीज/खते यांच्यावर अनुदान (प्राधान्य – 25.06%)
  10. चांगली कायदा सुव्यवस्था (प्राधान्य – 23.95%)

सर्वाधिक महत्त्वाच्या प्राधान्यक्रमावरील मुद्द्यांवर सरकारची कामगिरी

एडीआरच्या या सर्वेक्षणानुसार, जनतेच्या प्राधान्यक्रमात सर्वात वर असलेल्या मुद्द्यांवर मोदी सरकारची कामगिरी सरासरीपेक्षाही कमी झाली आहे. या सर्वेक्षणात मुल्यांकनाची मोजणी 5 गुणांमध्ये करण्यात आली आहे. तसेच सरासरी गुण 3 ठेवण्यात आले आहेत. या मुद्द्यांवर सरकारला जनतेने 5 पैकी दिलेले गुण खालीलप्रमाणे,

  1. चांगल्या रोजगाराच्या संधी (2.15 गुण)
  2. चांगली रुग्णालये /प्राथमिक आरोग्य केंद्रे (2.35 गुण)
  3. पिण्याचे पाणी (2.52 गुण)
  4. चांगले रस्ते (2.41 गुण)
  5. चांगली सार्वजनिक वाहतूक सेवा (2.58 गुण)
  6. शेतीसाठी पाण्याची उपलब्धता (2.18 गुण)
  7. शेतीसाठी कर्जाची उपलब्धता (2.15 गुण)
  8. शेतीमालाला हमीभाव (2.23 गुण)
  9. वीज/खते यांच्यावर अनुदान (2.06 गुण)
  10. चांगली कायदा सुव्यवस्था (2.26 गुण)

मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.