AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mamata Banerjee : सत्ता मिळवली पण महाराष्ट्राचे मन जिंकलेले नाही, भाजपसाठी जनता बुलडोझर बनेल ममता बॅनर्जींना विश्वास

मला विश्वास आहे की हे सरकार अधिक काळ सत्तेत राहणार नाही. हे अनैतिक तसेच लोकशाही मधून तयार झालेले सरकार नाही. सध्या त्यांनी सरकार जिंकले आहे. पण त्यांनी महाराष्ट्राचे मन जिंकले नाही असा टोला ममता बॅनर्जी यांनी लगावला.

Mamata Banerjee : सत्ता मिळवली पण महाराष्ट्राचे मन जिंकलेले नाही, भाजपसाठी जनता बुलडोझर बनेल ममता बॅनर्जींना विश्वास
भाजपसाठी जनता बुलडोझर बनेल ममता बॅनर्जींना विश्वासImage Credit source: twitter
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Jul 05, 2022 | 8:35 AM
Share

मुंबई – मागच्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. महाराष्ट्रातल्या अनेक घडामोडींवरती देशातील सगळ्या राजकीय नेत्यांचं लक्ष होतं. महाराष्ट्रातलं बंड गुजरातमध्ये गेलं त्यानंतर ती जागा असुरक्षित असल्याचं लक्षात आल्यानंतर आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी गुवाहाटी गाठली. हे संपुर्ण राजकारण अवघ्या देशाने पाहिलं आहे. महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी बंडखोर आमदारांना पैश्याशिवाय आणखी काय देण्यात आलं असा गौप्यस्फोट ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी केला आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचे सरकार बेकायदा आहे. त्यांच्या सरकारने सत्ता मिळवली असली तरी महाराष्ट्राचे मन आणि ह्दय त्यांना जिंकता आलेले नाही अशी टीका देखील त्यांनी केली आहे. तसेच त्यांनी भाजप आणि केंद्र सरकारवरती जोरदार हल्लाबोल केला. सत्तेचा दुरूपयोग करून त्यावर बुलडोझर फिरवला जात आहे. मात्र पुढच्या निवडणुकीत जनताच भाजपसाठी बुलडोझर बनेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भाजपसाठी जनता बुलडोझर बनेल ममता बॅनर्जींना विश्वास

मला विश्वास आहे की हे सरकार अधिक काळ सत्तेत राहणार नाही. हे अनैतिक तसेच लोकशाही मधून तयार झालेले सरकार नाही. सध्या त्यांनी सरकार जिंकले आहे. पण त्यांनी महाराष्ट्राचे मन जिंकले नाही असा टोला ममता बॅनर्जी यांनी लगावला. तुम्ही तुमच्या सत्तेचा गैरवापर करून लोकशाहीवरती बुलडोज चालवू शकता. पण या देशातील जनता लोकशाही मार्गाने तुमच्यासाठी बुलडोझर बनेल. तसेच ममता बॅनर्जी यांनी महाराष्ट्रातील शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना “आसाममध्ये भाजपकडून पैसे आणि इतर गोष्टींचा पुरवठा केला असा आरोप केला.

भाजप आणि केंद्र सरकारवरती त्यांनी जोरदार टीका केली

घराणेशाहीच्या राजकारणाच्या भाजपच्या वारंवार वापरल्या जाणार्‍या टीकेला देखील त्यांनी जोरदार उत्तर दिले. भाजप आणि केंद्र सरकारवरती त्यांनी जोरदार टीका केली. महाराष्ट्रात शिवसेनेच्या आमदारांनी बंड केल्यानंतर अनेकांचं लक्ष महाराष्ट्रातल्या राजकारणाकडं लागलं होतं. तब्बल दहा सुरू असलेल्या या राजकीय नाट्यात महाविकास आघाडीचं सरकार बरखास्त झालं आणि नवं सरकार आलं.

Follow Us
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या राजकीय हालचाली!
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... नीट पेपरफुटीवर बोलताना प्रियंका गांधी हे काय बोलून गेल्या?
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
मंत्री-सचिव सगळ्यांनाच फुटला घाम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण खातं...
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
Priyanka Gandhi | विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल; लाठीचार्जवरून मोदी-शहांकडे मागितलं उत्तर
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली मोठी अपडेट
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत बैठक
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक, ईराण-अमेरिका तणावादरम्यान...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे; मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलिसांना तातडीचे आदेश
पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर
मोठा खुलासा! पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर एकच खळबळ
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास...
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास... गुलाबराव पाटलांचं विधान तुफान चर्चेत
उत्तम शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर..
मोठी कारवाई! शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर ताब्याचा आरोप