AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पहिल्या यादीतून अडवाणींना डच्चू, गांधीनगरमधून ‘या’ बड्या नेत्याला संधी

मुंबई : भाजपने 182 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या पहिल्या यादीतून भाजपने ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनाच डच्चू दिला आहे. अडवाणी यांचं नुसतं नाव यादीतून वगळलं नाही, तर अडवाणी ज्या मतदारसंघातून लढतात, त्या गांधीनगरमधून भाजपाध्यक्ष अमित शाह यांना उमेदवारी देण्यात आली आहे. लालकृष्ण अडवाणी यांचे वय 91 वर्ष झाल्याने त्यांना तिकीट न दिल्याची चर्चा […]

पहिल्या यादीतून अडवाणींना डच्चू, गांधीनगरमधून 'या' बड्या नेत्याला संधी
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:14 PM
Share

मुंबई : भाजपने 182 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या पहिल्या यादीतून भाजपने ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनाच डच्चू दिला आहे. अडवाणी यांचं नुसतं नाव यादीतून वगळलं नाही, तर अडवाणी ज्या मतदारसंघातून लढतात, त्या गांधीनगरमधून भाजपाध्यक्ष अमित शाह यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

लालकृष्ण अडवाणी यांचे वय 91 वर्ष झाल्याने त्यांना तिकीट न दिल्याची चर्चा भाजपमध्ये सुरु आहे. देशाचे गृहमंत्री आणि उपपंतप्रधान राहिलेले लालकृष्ण अडवाणी सलग 6 वेळा गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले आहेत. 1980 च्या दशकात तसेच 1990 च्या दशकात भाजपला देशभरात वाढवण्याचे श्रेय लालकृष्ण अडवाणी यांना दिले जाते.

1984 मध्ये भाजपला दोन जागांवरुन 180 जागांपर्यंत पोहोचवणारे लालकृष्ण अडवाणी आता भाजपच्या प्रमुख नेत्यांमध्येही नाहीत. 2014 ला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उमेदवारीला विरोध केल्यामुळे लालकृष्ण अडवाणी यांचे पक्षातील अनेकांसोबत वाद झाले होते.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने अनेक दिग्गज नेत्यांचे तिकीट कापल्याचे दिसत आहे. महाराष्ट्रातही भापजने विद्यमान खासदार दिलीप गांधी आणि सुनिल गायकवाड या दोघांचे तिकीट कापले आहे. यामुळे पक्षांतर्गत वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महाराष्ट्र

नागपूर – नितीन गडकरी नंदुरबार – हिना गावित धुळे – सुभाष भामरे रावेर – रक्षा खडसे अकोला – संजय धोत्रे वर्धा – रामदास तडस चिमूर-गडचिरोली – अशोक नेते जालना – रावसाहेब दानवे भिवंडी – कपिल पाटील उत्तर मुंबई – गोपाळ शेट्टी उत्तर मध्य मुंबई – पूनम महाजन नगर – सुजय विखे बीड – डॉ. प्रीतम मुंडे लातूर – सुधाकरराव श्रंगारे सांगली – संजयकाका पाटील चंद्रपूर – हंसराज अहीर

महत्त्वाची नावं :

वाराणसी – नरेंद्र मोदी गांधीनगर – अमित शाह लखनौ – राजनाथ बागपत – सत्यपाल सिंग गाझियाबाद – व्ही के सिंग मथुरा – हेमा मालिनी उन्नाव – साक्षी महाराज अमेठी – स्मृती इराणी जयपुर ग्रामीण – राज्यवर्धन सिंह राठोड

निवडणुकीच्या तारखा जाहीर :

केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी 10 मार्चला लोकसभा निवडणूक 2019 च्या तारखा जाहीर केल्या. लोकसभेच्या 543 जागांसाठी 7 टप्प्यात मतदान होणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे. 11, 18, 23, 29 एप्रिल, तर 6, 12 आणि 19 मे रोजी अशा सात टप्प्यात मतदान होईल. देशभरातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी याबाबतची घोषणा केली.

महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात 11 एप्रिल 2019 रोजी पहिलं मतदान होईल. महाराष्ट्रातील 48 जागांसाठी चार टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला 7 जागांसाठी, दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला 10 जागांसाठी, तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला 14 जागांसाठी आणि चौथा टप्प्यात 29 एप्रिलला 17 जागांसाठी मतदान होणार आहे.

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.