AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CM Shinde: खातेवाटपानंतर शिंदे गटातील तीन मंत्री नाराज? अखेर भुसे, केसरकर आणि भुमरे आले समोर, म्हणाले..

एकनाथ शिंदे यांच्या गटातील काही मंत्र्यांना कमी महत्त्वाची खाती मिळाल्याने ते नाराज असल्याची चर्चा होती. त्यात शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, रोहयो आणि फलोत्पादनमंत्री संदीपान भुमरे आणि बंदरे आणि खनीकर्म मंत्री दादा भुसे हे नाराज असल्याची चर्चा होती. या तिन्ही नेत्यांनाही कमी महत्त्वाची खाती पदरात पडल्याने ते नाराज असल्याचे सांगण्यात येत होते, अखेरीस या तिन्ही मंत्र्यांनी आज समोर येत स्पष्टीकरण दिले.

CM Shinde: खातेवाटपानंतर शिंदे गटातील तीन मंत्री नाराज? अखेर भुसे, केसरकर आणि भुमरे आले समोर, म्हणाले..
अखेर तीन मंत्री आले समोर.. म्हणाले..Image Credit source: social media
| Edited By: Sandip Sakhare | Updated on: Aug 15, 2022 | 6:13 PM
Share

मुंबई- एकनाथ शिंदे  (CM Eknath Shinde)यांच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप अखेरीस रविवारी जाहीर झाले. या खातेवाटपात भाजपाकडे(BJP) चांगली खाती गेल्याचे आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे कमी महत्त्वाची खाती गेल्याची चर्चा सुरु आहे. त्यातच एकनाथ शिंदे गटातील तीन मंत्री त्यांना मिळालेल्या खातेवाटपावर नाराज (upset)असल्याची चर्चा होती. एकनाथ शिंदे यांच्या गटातील काही मंत्र्यांना कमी महत्त्वाची खाती मिळाल्याने ते नाराज असल्याची चर्चा होती. त्यात शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, रोहयो आणि फलोत्पादनमंत्री संदीपान भुमरे आणि बंदरे आणि खनीकर्म मंत्री दादा भुसे हे नाराज असल्याची चर्चा होती. या तिन्ही नेत्यांनाही कमी महत्त्वाची खाती पदरात पडल्याने ते नाराज असल्याचे सांगण्यात येत होते, अखेरीस या तिन्ही मंत्र्यांनी आज समोर येत, खातेवाटपावर नाराज नसल्याचे स्पष्ट केले आहे. हे तिन्ही मंत्री काय म्हणालेत ते ही पाहूयात.

अजिबात नाराजी नाही – दीपक केसरकर

मंत्रिमंडळाच्या खातेवाटपानंतर नाराज नसल्याचे दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले आहे. शालेय शिक्षण खात्यावर समाधानी असल्याचे त्यांनी सांगितले. राज्याच्या शिक्षण खात्यात सुधारणा करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षण खात्यात धोरणे सातत्याने बदलू शकत नाहीत, त्यामुळे माजी शिक्षणमंत्री आणि इतरांशी चर्चा करुन काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मंत्रिमंडळात मिळालेल्या खात्याबाबत कोणतीही नाराजी नसल्याचेही त्यांनी सांगितले आहे. तसेच शिंदे गटाला पर्यटन सोडून आरोग्य हे चांगले खाते मिळाले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. आगामी काळात मराठवाड्यातील शिक्षणाकडे अधिक लक्ष देणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत.

वेगळ्या खात्याची केली होती मागणी – दादा भुसे

उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात दादा भुसे यांच्याकडे कृषी खाते होते. मात्र प्रवासामुळे प्रकृतीवर परिणाम होत होता. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून उद्धव ठाकरे यांच्याकडेही वेगळ्या विभागाची मागणी करत होतो, असे दादा भुसे यांनी स्पष्ट केले आहे. जेव्हा आपल्याकडे एखादी जबाबदारी येते त्यावेळी जर आपण त्याला वेळ देऊ शकणार नसल्यास, ते योग्य नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे कृषी खाते न मिळाल्याने नाराज नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

खाते कुठले हे महत्त्वाचे नाही – भुमरे

रोहयो खाते हे गरिबाचे आणि शेतकऱ्याचे खाते आहे. या खात्यामार्फत गोरगरिबांची कामे करण्याची संधी आपल्याला मिळाली असल्याचे संदीपान भुमरे यांनी स्पष्ट केले आहे. मिळालेल्या खात्याबाबत समाधानी असल्याचेही भुमरे यांनी सांगितले. खातं कोणतं मिळालं हे महत्त्वाचे नाही, तर खात्यामार्फत काम का करायचं हे महत्त्वाचं आहे, असे त्यांनी सांगितले. एका शिवसैनिकाला दुसऱ्यांना कॅबिनेट खाते मिळआले हे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्ष्ट केले आहे.

नाराजीची चर्चा, शिवसेनेची टीका

शिवसेनेने शिंदे गटाला मिळालेल्या खात्यांवरुन टीका केली आहे. भाजपा तुपाशी आणि शिंदे गट उपाशी अशी टीका शिवसेनेने मुखपत्र समानातून केली आहे. तसेच कालपासून झालेल्या विस्तारानंतर शिंदे गटातील मंत्रज्ञी नाराज असल्याची चर्चा रंगली होती. तर खातेवाटपावर होत असलेल्या नाराजीवर अजित पवारांनीही टीका केली आहे. मुख्यमंत्रीपद हे एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे, त्यामुळे ते ठरवतील तेच मंत्री असतील असे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.

खाते कोणतं त्यापेक्षा न्याय काय देता, हे महत्त्वाचे – मुख्यमंत्री

खाते कोणते आहे, त्यापेक्षा त्या खात्याला आपण न्याय कसा देतो हे महत्त्वाचे आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही स्पष्ट केले आहे. त्यामुळे ज्या ज्या मंत्र्यांना जबाबदारी दिली आहे, ते यशस्वीपणे जबाबदारी पर पाडतील आणि राज्यातील जनतेला न्याय देतील, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. मंत्री झाल्यानंतर तो राज्याचा मंत्री असतो, त्यामुळे त्यांच्या माध्यमातून सर्वांगिण विकासाचं काम होईल असा विश्वासही एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

Follow Us
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवानाच रद्द केला
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवाना रद्द केला, नेमकं कारण काय?
काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात
Eknath shinde | काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात, 45 सरकारांचा दाखला देत म्हणाले...
शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल
Nagpur Farmer | शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! नागपूरच्या शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल चर्चेत, व्हिडिओ होतोय व्हायरल
राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे...
Rahul Gandhi | राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे परराष्ट्र धोरण नाही म्हणत मोदींवर निशाणा
शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
तू तेव्हा वाचला आहेस, आता वाचणार नाहीस! शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल
MNS Protest | केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल; आंदोलन पेटलं
हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Ramp Walk | हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! आत्मसमर्पित महिला नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन....
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन; रेशीम उद्योगाला मिळणार नवी झेप
राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
Supriya Sule | राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाल्या...
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश