AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजकीय दबाव टाकल्याचे पुरावे द्या, अन्यथा राजकारण सोडा, उदय सामंतांचं राजन तेलींना आव्हान

माजी आमदार राजन तेली यांनी केलेल्या आरोपाचा उदय सामंत यांनी समाचार घेतला. Uday Samant comment on Shivsena and Rane Supports Conflict

राजकीय दबाव टाकल्याचे पुरावे द्या, अन्यथा राजकारण सोडा, उदय सामंतांचं राजन तेलींना आव्हान
उदय सामंत, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री
| Updated on: Feb 15, 2021 | 5:32 PM
Share

रत्नागिरी: उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उय सामंत यांनी रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधील शिवसेना आणि राणे समर्थकांवरील वादावर प्रतिक्रिया दिली आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांमध्ये गेले काही दिवस राणे-विरुद्ध शिवसेना असा संघर्ष पेटलेला पाहायला मिळाला. पण, या प्रकरणात उदय सामंत यांनी शिवसेनेच्या नेत्यांना ही कानपिचक्या दिल्या आहेत. राजकीय जीवनात काम करत असताना आपल्यामुळे काही गोष्टी वादाच्या निर्माण होणार नाहीत, याची दक्षता प्रत्येकाने घेतली पाहिजे, अशा शेलक्या शब्दात सामंत यांनी शिवसेनेच्या नेत्यांना सुनावलंय. तर संबंधित भाजप नेत्यांनाही टोला लगावला आहे. माजी आमदार राजन तेली यांनी केलेल्या आरोपाचा उदय सामंत यांनी समाचार घेतला. राजन तेलींनी पुरावे द्यावेत अन्यथा राजकार सोडावं असं आव्हान उदय सामंतांनी दिलं. (Uday Samant comment on Shivsena and Rane Supports Conflict )

रत्नागिरी सिंधुदुर्ग शांत राहावेत

रत्नागिरी सिंधुदुर्ग हे दोन्ही जिल्हे शांत राहिले पाहिजेत, ही शासनातील मंत्री म्हणून माझी भूमिका आहे. आमच्या कार्यकर्त्यांची जी काही समजूत काढायची आहे ती मी काढेन, त्यांना समजावण्याचा मी मंत्री म्हणून प्रयत्न करेन, असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे. त्यासबोत समोरच्यांनी देखील मोठेपणा दाखवला पाहिजे, असा टोला ही सामंत यांनी भाजपला म्हणजेच राणे समर्थकांना लगावलाय.

राजन तेलींच्या आरोपांचं खंडण

शिवसेना खासदार विनायक राऊत यांचा पुतळा जाळल्याप्रकरणी भाजप नेत्यांवर गुन्हा दाखल झालाय. गुन्हा दाखल करण्यासाठी राजकीय दबाव टाकला जातोय. माजी आमदार राजन तेली यांनी केलेल्या आरोपाचे खंडन उदय सामंत यांनी केलंय. या प्रकरणातले पुरावे राजन तेली यांनी द्यावेत ते दिल्यास आपण राजकारण सोडू, अन्यथा तुम्ही सोडा असा थेट आव्हान उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिलेय.

अमित शाहांच्या वक्तव्यावरुन भाजपला कोपरखळ्या

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या देखते है याचा परिणाम काय झाला, त्यांना कळलं असेल, असा टोला उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी भाजपला लगावला आहे. देखते है म्हटल्यावर काय परिस्थिती होऊ शकते यावरून त्यांनी बोध घ्यावा, अशी खोपरखळी उदय सामंत यांनी भाजपचं नाव न घेता लगावलीय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बंद खोलीतील चर्चेसंदर्भात अमित शहा यांनी देखते है, असं म्हटलं असणार ते शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना हो, असं वाटलं असणार असा खुलासा केला होता.

संबंधित बातम्या:

‘देखते है’ म्हटलं की काय होतं याचा बोध घ्या, उदय सामंतांची भाजपला कोपरखळी

अमित शाहांच्या ‘देखते हैं’चा अर्थ उद्धव ठाकरेंनी ‘हो’ असा घेतला!, ‘त्या’ बंद दाराआडच्या चर्चेचा चंद्रकांतदादांकडून उलगडा?

(Uday Samant comment on Shivsena and Rane Supports Conflict )

मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.