AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजित पवारांचा मृत्यू धुक्याने झाला की धोक्याने? राज ठाकरेंकडून शंका अन् प्रश्न

अजित पवारांचा मृत्यू धुक्याने झाला की धोक्याने? राज ठाकरेंकडून शंका अन् प्रश्न

| Updated on: Feb 27, 2026 | 2:12 PM
Share

राज ठाकरे यांनी अजित पवार यांच्या मृत्यू प्रकरणी एफआयआर नोंदवण्यास येत असलेल्या अडथळ्यांवरून सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तीन ठिकाणी प्रयत्न करूनही एफआयआर घेतला जात नाही, असा आरोप त्यांनी केला. सरकार एफआयआरला का घाबरते, असा सवाल करत, महाराष्ट्राला यामागील सत्य कळाले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या मृत्यू प्रकरणातील एफआयआर नोंदणीस होत असलेल्या अडथळ्यांवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. रोहित पवार यांनी तीन ठिकाणी एफआयआर नोंदवण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रत्येक ठिकाणी सरकारी दबावामुळे एफआयआर घेतला गेला नाही, असा आरोप ठाकरे यांनी केला. मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात तर डीसीपीने एफआयआर नोंदवण्यास अडवले, अशी माहिती त्यांनी दिली.

ठाकरे म्हणाले की, “जर हा अपघात निव्वळ नैसर्गिक असेल, तर सरकार एफआयआर नोंदवण्यास का अडवत आहे?” एक महिना उलटूनही प्राथमिक अहवाल सादर न झाल्याने आणि ब्लॅक बॉक्सबद्दल माहिती नसताना, सरकार संशयाचे वातावरण निर्माण करत असल्याचे त्यांनी म्हटले. त्यांनी विधानसभा आणि लोकसभेत या प्रकरणी आवाज उचलण्याची मागणी केली. राज ठाकरे यांनी सरकारला यावर उत्तर देण्याचे आवाहन केले आहे, अन्यथा महाराष्ट्रातील नागरिकांच्या मनात संशय वाढत राहील.

Published on: Feb 27, 2026 02:12 PM
Follow Us