AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘पेढे कोण कुणाला भरवतोय ते कळेलच’, विधान परिषद निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंच सूचक वक्तव्य

Maharashtra Legislative Council Election : पुढच्या महिन्यात विधान परिषद निवडणूक होणार आहे. त्याची रणनिती आखण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात विधान परिषदेच्या एकूण 11 जागा आहेत. उद्धव ठाकरे आज विधान भवनात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विधान परिषदेबद्दल सूचक वक्तव्य केलं.

'पेढे कोण कुणाला भरवतोय ते कळेलच', विधान परिषद निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंच सूचक वक्तव्य
देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरेImage Credit source: PTI
| Updated on: Jun 27, 2024 | 1:58 PM
Share

“विधान परिषद निवडणुकी संदर्भात उद्धव ठाकरे यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. 16 मते आहेत. 11 जागा आहेत. शिवसेनेचा एक येऊ शकतो. एनसीपीने नीट गणित मांडलं तर त्यांचा एक येऊ शकतो. काँग्रेसचा एक येऊ शकतो. शेकापचे एक येऊ शकतो. जयंत पाटील यांना एनसीपी तिकीट देत असेल तर त्यांचाही येईल. आमचं गणित पक्क आहे. 11 जागेत आमच्या तीन पक्षाच्या तीन येतात. आम्ही एक-एकाची खात्री देत आहोत. त्यामुळे त्यांची मते त्यांना संभाळायची आहेत. कारण लोकसभा निवडणुकीनंतर बऱ्याच हालचाली झाल्या आहेत” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“विधान परिषदेची निवडणूक झाली तर गंमतीशीर होणार. पेढे कोण कुणाला भरवतोय ते कळेलच” असं उद्धव ठाकरे म्हणाले. विधान परिषदेचे 11 सदस्य पुढच्या महिन्यात निवृत्त होणार आहेत. विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम मागच्या आठवड्यात जाहीर झाला. विधान परिषदेवर आता सर्वच पक्षांकडून कोणाला संधी मिळते? याची उत्सुक्ता आहे.

मतदान किती तारखेला?

विधानसभा सदस्य विधान परिषदेतील आमदारांची निवड करणार आहेत. 25 जून पासून 2 जुलै पर्यंत अर्ज भरण्याची मुदत असणार आहे. पाच जुलै रोजी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असेल. 12 जुलै रोजी रोजी मतदान होणार आहे. सकाळी 9 ते संध्याकाळी चार या वेळेत मतदान पार पडणार आहे. 12 जुलै रोजीच होणार पाच वाजल्यानंतर मतमोजणी सुरुवात होईल.

निवृत्त होणारे सदस्य कोण?

सध्या विधान परिषदेवर असणारे 11 सदस्य पुढच्या महिन्यात 27 जुलै रोजी निवृत्त होणार आहेत. डॉ. मनिषा कायंदे, विजय गिरकर, अब्दुल्लाह दुरानी, निलय नाईक, अनिल परब, रमेश पाटील, रामराव पाटील, डॉ. वजहत मिर्झा, डॉ. प्रज्ञा सातव, महादेव जानकर, जयंत प्रभाकर पाटील विधान परिषदेतील या 11 सदस्यांचा कार्यकाळ संपणार आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.