AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माझ्या नेतृत्वाखालील सरकार खेकड्यांनी फोडलं; उद्धव ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल

चोरवाटेने किंवा चोरून मारून हे उपदव्याप करावेच लागले नसते. ज्यांना मुख्यमंत्री होता आले असते त्यांना दुसऱ्यांना कुणाला तरी मुख्यमंत्री म्हणून स्वीकारावे लागत आहे. उपमुख्यमंत्रीपद वाट्याला येऊनही त्यांना पार्टनर घ्यावा लागतोय.

माझ्या नेतृत्वाखालील सरकार खेकड्यांनी फोडलं; उद्धव ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल
uddhav thackerayImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 26, 2023 | 7:14 AM
Share

मुंबई | 26 जुलै 2023 : गेल्यावर्षी मुसळधार पावसात माझ्या नेतृत्वाखालील सरकार वाहून गेलं नाही. खेकड्यांनी धरण फोडलं. ते धरणातच बसले होते. मातीमध्ये… शेवटी खेकडा हा खेकडाच असतो. त्याला कितीही सरळ चालवण्याचा प्रयत्न केला तरी तोतिरकाच चालतो, अशी घणाघाती टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. खेकड्यांनीच आपलं सरकार फोडलं असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवला.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दैनिक ‘सामना’ला परखड मुलाखत दिली आहे. खासदार आणि दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी सध्याच्या राज्यातील आणि देशाच्या राजकारणावर भाष्य केलं. इंडिया आघाडीवर आपली भूमिका मांडली. तसेच इर्शाळगड दुर्घटनेवरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केलीय. याच मुलाखतीतून उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. खेकड्यांची एक मानसिकता असते. ज्या टोपलीत खेडके असतात त्या टोपलीवर झाकण ठेवण्याची गरज नसते. एखादा खेकडा वर जायला गेला की बाकीचे त्याला खाली खेचतात. तसेच हेही खेकडेच आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

तर पार्टनर सोबत घ्यावा लागला नसता

यावेळी त्यांनी अडीच अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाच्या फॉर्म्युल्यावरूनही भाजपवर हल्ला चढवला. 2019 मध्ये अडीच अडीच वर्षाचा फॉर्म्युला ठरला होता. तो पाळला असता तर आधी शिवसेना किंवा भाजपचा मुख्यमंत्री झाला असता. नंतरच्या अडीच वर्षात ज्यांचा काळ उरला त्यांचा मुख्यमंत्री झाला असता. दिमाखाने मुख्यमंत्रीपदावर बसला असता.

चोरवाटेने किंवा चोरून मारून हे उपदव्याप करावेच लागले नसते. ज्यांना मुख्यमंत्री होता आले असते त्यांना दुसऱ्यांना कुणाला तरी मुख्यमंत्री म्हणून स्वीकारावे लागत आहे. उपमुख्यमंत्रीपद वाट्याला येऊनही त्यांना पार्टनर घ्यावा लागतोय. ही अशी वेळ त्यांच्यावर आली नसती, असा टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपला आणि देवेंद्र फडणवीस यांना नाव न घेता लगावला.

फक्त गद्दार उरलेत

एनडीएच्या बैठकीवरही त्यांनी सडकून टीका केली. गेल्या आठवड्यात एनडीए नावाचा अमिबा जिवंत आहे हे कळलं. आपली इंडिया नावाची आघाडी तयार झाली आहे. आपल्या आघाडीला उत्तर देण्यासाठी मोदींनी एनडीएची जेवणावळ घातली. 36 पक्षांना त्यांनी एकत्र केलं. खरं म्हणजे त्यांना एवढे पक्ष एकत्र आणण्याची गरज नव्हती.

ईडी, इन्कम टॅक्स आणि सीबीआय हे तीन पक्षच एनडीएत आहेत. तेच शिल्लक उरलेत, अशी टीका करतानाच एनडीएतील इतर पक्षांचा एकही खासदार नाही. खरी शिवसेना तरी कुठे एनडीएत आहे. तिथे फक्त गद्दार आहेत, असा हल्लाबोलही उद्धव ठाकरे यांनी केला.

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.