मोदींनंतर आता उद्धव ठाकरेंकडून सैनिकांच्या नावाने मतांचा जोगवा

कल्याण (ठाणे) : श्रीकांत शिंदेंना मत म्हणजे मोदींना मत, श्रीकांत शिंदेंना मत म्हणजे भगव्य युतीला मत आणि श्रीकांत शिंदेंना मत म्हणजे आपल्या लढणाऱ्या सैनिकांना हिंमत, असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सैनिकांच्या नावाने मतांचा जोगवा मागितला आहे. कल्याण लोकसभेचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारसभेसाठी कल्याण पूर्वेतील चक्कीनाका परिसरात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी […]

मोदींनंतर आता उद्धव ठाकरेंकडून सैनिकांच्या नावाने मतांचा जोगवा
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:00 PM

कल्याण (ठाणे) : श्रीकांत शिंदेंना मत म्हणजे मोदींना मत, श्रीकांत शिंदेंना मत म्हणजे भगव्य युतीला मत आणि श्रीकांत शिंदेंना मत म्हणजे आपल्या लढणाऱ्या सैनिकांना हिंमत, असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सैनिकांच्या नावाने मतांचा जोगवा मागितला आहे. कल्याण लोकसभेचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारसभेसाठी कल्याण पूर्वेतील चक्कीनाका परिसरात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली. याआधी लातुरातील औसा येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैनिकांच्या नावाने जाहीरिरित्या मतं मागितली होती. आता सैनिकांच्या नावे मतं मागणाऱ्या पंतप्रधान मोदींच्या रांगेत उद्धव ठाकरेही जाऊन बसले आहेत.

“देशद्रोहाचा कायदा रद्द करणार असाल, तर मग हे सगळे कशासाठी, देशाच्या सुरक्षेशी छेडछाड करणाऱ्याला निवडणूक लढवायचा अधिकार असता कामा नये. देशद्रोहाचा खटला रद्द करणार सांगणाऱ्याला निवडणूक लढण्याचा अधिकार असता कामा नये. हीच निवडणुकीची खरी आचार संहिता असेल.”, असेही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले.

मोदींकडून सैनिकांच्या नावाने मतांचा जोगवा

पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या नवमतदारांनी पहिलं मत बालाकोटमध्ये दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैनिकांना समर्पित करावं, असं आवाहन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लातुरातील औसा येथील सभेत सैनिकांच्या नावाने मतं मागितली होती.

“पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांना मी आवाहन करतो की, तुम्ही तुमचं पहिलं मत बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक करणाऱ्या वीर जवानांसाठी समर्पित करु शकता ना? तुम्ही तुमचं पहिलं मतदान पुलवामात शहीद झालेल्या वीर जवानांसाठी समर्पित करु शकता ना?” असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैनिकांच्या नावे मतांचा जोगवा मागितला आहे.

संबंधित बातमी  : लातूरच्या सभेत मोदींकडून सैनिकांच्या नावाने मतांचा जोगवा

तसेच, पहिलं मत देशासाठी द्या, पहिलं मत देश कणखर करण्यासाठी द्या, पहिलं मत देशात कणखर सरकार बनवण्यासाठी द्या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

एकीकडे निवडणूक आयोगन सैन्याचा फोटो किंवा त्यांच्या उल्लेख प्रचारात टाळण्याचं आवाहन करत असताना, थेट देशाच्या पंतप्रधानांनीच निवडणूक आयोगाच्या आवाहनाला केराची टोपली दाखवली होती. त्यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही त्याच रांगेत जाऊन बसले आहेत.

Non Stop LIVE Update
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.