AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Politics: संध्याकाळी 5 च्या बैठकीत काय घडणार? उद्धव ठाकरेंचं वर्षा बंगल्यावर आमदार-खासदारांना आमंत्रण!

महाविकास आघाडी सरकारवर आलेलं हे संकट, उत्तम राजकीय पटू असलेले शरद पवार आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे कसं दूर करतील, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Maharashtra Politics: संध्याकाळी 5 च्या बैठकीत काय घडणार? उद्धव ठाकरेंचं वर्षा बंगल्यावर आमदार-खासदारांना आमंत्रण!
| Updated on: Jun 22, 2022 | 11:18 AM
Share

मुंबईः महाविकास आघाडीचं (Mahavikas Aghadi) सरकार अस्थिर करण्यासाठी महाराष्ट्रात घमासान सुरु आहे. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर गुजरात आणि आसाममध्येही यासाठीची मोठी खलबतं सुरु आहेत. मात्र महाराष्ट्राची राजधानी मुंबईत महाविकास आघाडी सरकार टिकवून ठेवण्यासाठी अखेरचे प्रयत्न सुरु आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या वर्षा निवासस्थानावर शिवसेनेच्या सर्व आमदार आणि खासदारांची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. अर्थात संध्याकाळी पाच वाजता ही बैठक ठेवण्यात आली आहे. त्यामुळे वर्षा निवासस्थानापर्यंत येण्यासाठी आमदार आणि खासदारांना (ShivSena MLA and MP) पुरेसा वेळ देण्यात आल्याचं निश्चित आहे. तसंच सध्या आहेत त्यापेक्षा आणखी काही आमदारांची मनधरणी करण्यासाठीही या वेळात प्रयत्न केले जातील. महाविकास आघाडी सरकार टिकवून ठेवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शर्थीचे प्रयत्न करत आहे.

उद्धव ठाकरेच्या निर्णयाकडे लक्ष

संध्याकाळी पाच वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षी निवासस्थानावर शिवसेनेचे सर्व आमदार आणि खासदारांची बैठक बोलावली आहे. यावेळी महाविकास आघाडी सरकार पडण्याची स्थिती उद्भवल्यास पुढची रणनीती काय असेल, यावर चर्चा होईल. 45 आमदार माझ्यासोबत आहेत, असा दावा करणाऱ्या एकनाथ शिंदेंनी खरंच भाजपसोबत सत्ता स्थापनेचा दावा केला तर ठाकरे सरकारसाठी आता काऊंटडाऊन सुरु झालंय, असंच म्हणावं लागेल. त्यामुळे ठाकरे आणि सहकाऱ्यांनी यासाठी मनाची तयारी केली असल्याचं दिसून येतंय.

काँग्रेस-राष्ट्रवादीत आज दुपारी चर्चा

दरम्यान, महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेससोबत काँग्रेसदेखील अलर्ट मोडवर गेला आहे. वरिष्ठ नेतृत्वाने कमलनाथ यांना तडकाफडकी महाराष्ट्रातील राजकारणावर निरीक्षक म्हणून पाठवले आहे. आज दुपारी कमलनाथ आणि शरद पवार यांची महत्त्वाची बैठक होणार आहे. राज्यातील घडामोडींना धरून इथे चर्चा होईल. या बैठकीला अजित पवार, जयंत पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे पाटीलही उपस्थित राहणार आहेत. महाविकास आघाडी सरकारवर आलेलं हे संकट, उत्तम राजकीय पटू असलेले शरद पवार कसं दूर करतील, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Follow Us
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर.
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले.
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले.
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची..
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची...
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा.
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल.
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना....
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना.....
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या...
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या....
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना.
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ.