AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उत्तर प्रदेश, बिहारमध्ये हिंदी बोलली जाते, मग नोकरी-धंद्यासाठी महाराष्ट्रात का येता? राज ठाकरेंचा सवाल

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मीरा रोडमध्ये झालेल्या सभेत बोलताना उत्तर भारतीयांनी सवाल केला आहे. उत्तर प्रदेश-बिहारमध्ये हिंदी बोलली जाते, मग नोकरी-धंद्यासाठी महाराष्ट्रात का येता? असं राज यांनी म्हटलं आहे.

उत्तर प्रदेश, बिहारमध्ये हिंदी बोलली जाते, मग नोकरी-धंद्यासाठी महाराष्ट्रात का येता? राज ठाकरेंचा सवाल
Raj Thackeray Mira Road
| Updated on: Jul 18, 2025 | 8:47 PM
Share

राज ठाकरेंनी आज मीरा रोडमध्ये सभा घेतली. यावेळी बोलताना त्यांनी हिंदी ही सक्तीची तिसरी भाषा करणार यावरून सरकारवर सडकून टीका केली. उत्तर प्रदेश-बिहारमध्ये हिंदी बोलली जाते, मग नोकरी-धंद्यासाठी महाराष्ट्रात का येता? असा सवालही उपस्थित केला आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलं ते सविस्तर जाणून घेऊयात.

यावेळी बोलताना राज ठाकरेंनी म्हटले की, ‘विषय भाषेचा आहे. जगातील सत्य, भाषा मेली आणि पायाखालची जमीन गेली तर तुम्ही कोणीही नसता जगात. तुम्हाला कोणीही विचारणार नाही. तुमची भाषा टिकवणं महत्त्वाचं आहे. फक्त मुंबईत काही झालं, तर देशभर चालू ठेवतात हिंदी चॅनलवाले. हे कसले हिंदी चॅनेलवाले. हे खरं तर सत्ताधाऱ्यांच्या चपलेखालची ढेकणं आहेत. थोड्या वेळात बघा सुरू करतील. राज ठाकरेने उगला जहर. फक्त मुंबईत काही झालं, महाराष्ट्रात काही झालं तर हिंदी चॅनेलवाले कुणाच्या तरी सांगण्यावरून पेटून उठतात.’

हिंदीला 200 तर मराठीला अडीच ते तीन हजार वर्षाचा इतिहास

पुढे बोलताना राज ठाकरे यांनी म्हटले की, ‘इथे एका मिठाईवाल्याच्या कानाखाली मारल्यावर देशाची बातमी झाली. देशात वेगळं चित्र रंगवलं जातं. हे काय राजकारण सुरू आहे हे लक्षात घ्या. कोणती हिंदी घेऊन बसलो. त्याला फक्त 200 वर्षाचा इतिहास आहे. मराठी भाषेला अडीच ते तीन हजार वर्षाचा इतिहास आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. या शिवतीर्थावर मोदींना मी सांगितलं माझ्या पाच गोष्टी आहे. त्यात मराठी भाषेला दर्जा द्या. दिला. पण वर्ष झालं. एक रुपया आला नाही.

उत्तर प्रदेश, बिहारमध्ये हिंदी बोलली जाते, मग नोकरी-धंद्यासाठी महाराष्ट्रात का येता?

एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यायचा असेल तर कमीत कमी ती भाषा 1400 वर्ष जुनी पाहिजे. हिंदीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी 1200 वर्ष आहेत. ती भाषा आमच्यावर आणि मुलांवर लादणार. हिंदी भाषेमुळे हिंदी चित्रपटातील नट नट्यांचं भलं झालं. उत्तर प्रदेश बिहारमध्ये हिंदी बोलली जाते,मग नोकरी धंद्यासाठी हे लोक महाराष्ट्रात का येतात. तुमच्याच भाषेने तुमचं भलं झालं नसेल तुम्हाला दुसऱ्या प्रदेशात जाऊन नोकऱ्या कराव्या लागत असेल, गुजरातमध्ये जाऊन मार खावा लागत असेल तर हिंदीने तुमचं काय भलं केलं? कोणती भाषा घेऊन बसलो आपण. त्या भाषेसाठी म्हणून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पेटला? मला कारणच नाही कळलं. असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.