AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उत्तर प्रदेश, बिहारमध्ये हिंदी बोलली जाते, मग नोकरी-धंद्यासाठी महाराष्ट्रात का येता? राज ठाकरेंचा सवाल

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मीरा रोडमध्ये झालेल्या सभेत बोलताना उत्तर भारतीयांनी सवाल केला आहे. उत्तर प्रदेश-बिहारमध्ये हिंदी बोलली जाते, मग नोकरी-धंद्यासाठी महाराष्ट्रात का येता? असं राज यांनी म्हटलं आहे.

उत्तर प्रदेश, बिहारमध्ये हिंदी बोलली जाते, मग नोकरी-धंद्यासाठी महाराष्ट्रात का येता? राज ठाकरेंचा सवाल
Raj Thackeray Mira Road
| Updated on: Jul 18, 2025 | 8:47 PM
Share

राज ठाकरेंनी आज मीरा रोडमध्ये सभा घेतली. यावेळी बोलताना त्यांनी हिंदी ही सक्तीची तिसरी भाषा करणार यावरून सरकारवर सडकून टीका केली. उत्तर प्रदेश-बिहारमध्ये हिंदी बोलली जाते, मग नोकरी-धंद्यासाठी महाराष्ट्रात का येता? असा सवालही उपस्थित केला आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलं ते सविस्तर जाणून घेऊयात.

यावेळी बोलताना राज ठाकरेंनी म्हटले की, ‘विषय भाषेचा आहे. जगातील सत्य, भाषा मेली आणि पायाखालची जमीन गेली तर तुम्ही कोणीही नसता जगात. तुम्हाला कोणीही विचारणार नाही. तुमची भाषा टिकवणं महत्त्वाचं आहे. फक्त मुंबईत काही झालं, तर देशभर चालू ठेवतात हिंदी चॅनलवाले. हे कसले हिंदी चॅनेलवाले. हे खरं तर सत्ताधाऱ्यांच्या चपलेखालची ढेकणं आहेत. थोड्या वेळात बघा सुरू करतील. राज ठाकरेने उगला जहर. फक्त मुंबईत काही झालं, महाराष्ट्रात काही झालं तर हिंदी चॅनेलवाले कुणाच्या तरी सांगण्यावरून पेटून उठतात.’

हिंदीला 200 तर मराठीला अडीच ते तीन हजार वर्षाचा इतिहास

पुढे बोलताना राज ठाकरे यांनी म्हटले की, ‘इथे एका मिठाईवाल्याच्या कानाखाली मारल्यावर देशाची बातमी झाली. देशात वेगळं चित्र रंगवलं जातं. हे काय राजकारण सुरू आहे हे लक्षात घ्या. कोणती हिंदी घेऊन बसलो. त्याला फक्त 200 वर्षाचा इतिहास आहे. मराठी भाषेला अडीच ते तीन हजार वर्षाचा इतिहास आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. या शिवतीर्थावर मोदींना मी सांगितलं माझ्या पाच गोष्टी आहे. त्यात मराठी भाषेला दर्जा द्या. दिला. पण वर्ष झालं. एक रुपया आला नाही.

उत्तर प्रदेश, बिहारमध्ये हिंदी बोलली जाते, मग नोकरी-धंद्यासाठी महाराष्ट्रात का येता?

एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यायचा असेल तर कमीत कमी ती भाषा 1400 वर्ष जुनी पाहिजे. हिंदीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी 1200 वर्ष आहेत. ती भाषा आमच्यावर आणि मुलांवर लादणार. हिंदी भाषेमुळे हिंदी चित्रपटातील नट नट्यांचं भलं झालं. उत्तर प्रदेश बिहारमध्ये हिंदी बोलली जाते,मग नोकरी धंद्यासाठी हे लोक महाराष्ट्रात का येतात. तुमच्याच भाषेने तुमचं भलं झालं नसेल तुम्हाला दुसऱ्या प्रदेशात जाऊन नोकऱ्या कराव्या लागत असेल, गुजरातमध्ये जाऊन मार खावा लागत असेल तर हिंदीने तुमचं काय भलं केलं? कोणती भाषा घेऊन बसलो आपण. त्या भाषेसाठी म्हणून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पेटला? मला कारणच नाही कळलं. असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.