AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रत्येक प्रेमींचं आवडतं गाणं, 59 वर्षांपासून आहे हिट, ऐकताच जाग्या होतात आठवणी, तुम्ही ऐकलं…

4 मिनिट 12 सेकंदाचं रोमँटिक गाणं. ज्याचे शब्द ऐकून जाग्या होतात जुन्या आठवणी. चित्रपटापेक्षा गाण्याचीच होती प्रचंड चर्चा. प्रत्येकाच्या प्लेलिस्टमध्ये होतं.

प्रत्येक प्रेमींचं आवडतं गाणं, 59 वर्षांपासून आहे हिट, ऐकताच जाग्या होतात आठवणी, तुम्ही ऐकलं...
Image Credit source: Social media
| Updated on: Feb 05, 2026 | 12:32 PM
Share

Romantic Song: रोमँटिक गाणी केवळ चित्रपटांपुरती मर्यादित राहत नाहीत तर ती लाखो लोकांच्या वैयक्तिक आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनतात. विशेषतः जुन्या काळातील गाण्यांमध्ये नात्यांची खोली, भावना आणि प्रामाणिकपणा स्पष्टपणे जाणवतो. ही गाणी ऐकताना असे वाटते जणू कोणी आपलीच प्रेमकथा सांगत आहे. म्हणूनच आजच्या डिजिटल युगातही ही गाणी लाखो लोकांच्या प्लेलिस्टमध्ये हमखास दिसतात. असंच एक अत्यंत रोमँटिक, मधुर आणि काळाच्या कसोटीवर उतरलेलं गीत म्हणजे ‘आजा पिया तोहे प्यार दूं’.

हे गाणे 1960–70 च्या दशकात प्रदर्शित झाले आणि रिलीज होताच प्रेक्षकांच्या ओठांवर रुळले. 1967 साली प्रदर्शित झालेल्या ‘बहारों के सपने’ या चित्रपटातील हे गाणे आजही प्रेमगीतांच्या यादीत आपले खास स्थान टिकवून आहे. गाण्याची लोकप्रियता इतकी प्रचंड होती की ते त्या काळात रेडिओ हे गाणं सतत वाजत असे.

आशा पारेख आणि राजेश खन्नांची मोहक केमिस्ट्री

हे गाणे आशा पारेख आणि राजेश खन्ना यांच्यावर चित्रित करण्यात आले होते. जरी हा काळ ब्लॅक अँड व्हाइट सिनेमाचा असला तरी गाण्यात आशा पारेख यांचे सौंदर्य आणि भावभावना प्रेक्षकांना भुरळ घालणाऱ्या होत्या. त्यांच्या साध्या अभिनयाने आणि निरागस भावांनी गाण्याला वेगळीच उंची दिली.

या गाण्याला अजरामर बनवण्यात लता मंगेशकरांच्या मधुर आवाजाचा मोठा वाटा आहे. त्यांच्या स्वरांनी गाण्यातील प्रेमभावना अधिक खोलवर पोहोचवल्या. याशिवाय, आर. डी. बर्मन यांनी दिलेले संगीत आणि मजरूह सुल्तानपुरी यांनी लिहिलेले हृदयस्पर्शी बोल यामुळे हे गाणे काळाच्या पलीकडे गेले.

साधेपणा आणि भावनिक खोली

‘आजा पिया तोहे प्यार दूं’ या गाण्याची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्याची साधी पण भावनिक मांडणी. त्यामुळे प्रेक्षक थेट कथेशी जोडले गेले. गाण्यातील प्रेम, ओढ आणि समर्पण आजही तितक्याच तीव्रतेने जाणवते.

आजच्या डिजिटल काळातही या गाण्याची लोकप्रियता कमी झालेली नाही. यूट्यूब, सोशल मीडिया, रील्स आणि शॉर्ट व्हिडिओजच्या माध्यमातून हे गाणे नव्या पिढीपर्यंत पोहोचत आहे. कोट्यवधी वेळा हे गाणे पाहिले आणि ऐकले गेले आहे.

महापौरपदाच्या निवडणुकीत गडबड होऊ नये म्हणून ठाकरेंचे नगरसेवकांना व्हीप
महापौरपदाच्या निवडणुकीत गडबड होऊ नये म्हणून ठाकरेंचे नगरसेवकांना व्हीप.
गटारातील पाण्यात फळे धुतली; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
गटारातील पाण्यात फळे धुतली; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल.
मुंबई-पुणे वाहतूक कोंडीवर राज ठाकरेंकडून ट्विट करत टीका
मुंबई-पुणे वाहतूक कोंडीवर राज ठाकरेंकडून ट्विट करत टीका.
पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी! 2 तासांत 2 किलोमीटर अंतर पार
पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी! 2 तासांत 2 किलोमीटर अंतर पार.
थोड्या दिवसात जयंत पाटील भाजपात येतील! सदाभाऊ खोत यांचं मोठं विधान
थोड्या दिवसात जयंत पाटील भाजपात येतील! सदाभाऊ खोत यांचं मोठं विधान.
पार्थ पवारांनी चौकशीला सामोरं जात...; संजय राऊतांचं विधान
पार्थ पवारांनी चौकशीला सामोरं जात...; संजय राऊतांचं विधान.
मुंबईत भाजपचा महापौर बसणं हा महाराष्ट्रासाठी काळा दिवस असेल
मुंबईत भाजपचा महापौर बसणं हा महाराष्ट्रासाठी काळा दिवस असेल.
सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवर शेकापच्या जयंत पाटलांची टीका
सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवर शेकापच्या जयंत पाटलांची टीका.
पवारांनी मोठे केलेले लोक आज त्यांनाच सल्ले देताय! राऊतांचा खोचक टोला
पवारांनी मोठे केलेले लोक आज त्यांनाच सल्ले देताय! राऊतांचा खोचक टोला.
24 तासांपासून महाराष्ट्राच्या 'विकासा'चा मार्ग बंद;
24 तासांपासून महाराष्ट्राच्या 'विकासा'चा मार्ग बंद;.