AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पवार ‘इथून’ लढले असते, तर त्यांच्या प्रचाराला गेलो असतो : प्रकाश आंबेडकर

मुंबई : माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जर नागपुरातून निवडणूक लढली असती, तर मी त्यांच्या प्रचाराला गेलो असतो. पण शरद पवार नागपुरातून प्रचारालाही गेले आहेत, असे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर म्हणाले. त्यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी खास बातचीत केली. नागपुरात भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले […]

पवार 'इथून' लढले असते, तर त्यांच्या प्रचाराला गेलो असतो : प्रकाश आंबेडकर
| Edited By: | Updated on: May 22, 2019 | 12:43 PM
Share

मुंबई : माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जर नागपुरातून निवडणूक लढली असती, तर मी त्यांच्या प्रचाराला गेलो असतो. पण शरद पवार नागपुरातून प्रचारालाही गेले आहेत, असे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर म्हणाले. त्यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी खास बातचीत केली.

नागपुरात भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांच्यात लढत झाली.

काँग्रेस-राष्ट्रवादीनं मला पाडायची रणनीती आखली, असा आरोप करत प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले, ” आम्हाला बी टीम म्हणून हिणवलं गेलं, पण आम्ही आमची मतं मिळवणार आणि जरी काँग्रेसनं आमचा खिमा केला, तरी आम्ही धर्मनिरपेक्ष ताकदीबरोबर राहणार.” तसेच, ना भाजप, ना काँग्रेस, प्रादेशिक पक्षांना या निवडणुकीनंतर महत्त्व असेल, असा अंदाज प्रकाश आंबेडकरांनी वर्तवला.

एक्झिट पोलबाबत प्रकाश आंबेडकरांना विचारले असता, ते म्हणाले, “एक्झिट पोल हे तज्ञ लोक बनवतात. त्यांना मी चॅलेंज करु शकत नाही. एक्झिट पोलवर विश्वास नाही. निकाल आल्यावर सर्वांना कळेल.”

निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर पहिल्यांदा प्रश्न उभे राहिलेत. निवडणूक आयोगाची आधीची भूमिका आणि आताची भूमिका यात तफावत आहे. ईव्हीएम हॅक केलं जाऊ शकते, यापूर्वीही असं घडलेलं आहे, असे सांगत प्रकाश आंबेडकरांनीही ईव्हीएमवर संशय व्यक्त केला. शिवाय, जर ईव्हीएम नीट चाललं तर भाजपचा पराभव अटळ आहे, असेही ते म्हणाले.

भाजप आताच सेलिब्रेशन करतेय, पण मुल जिवंत की मेलेलं आहे हे पाहण्यासाठी वाट पाहायला हवी होती, असा टोलाही प्रकाश आंबेडकरांनी एक्झिट पोलवर सेलिब्रेशन करणाऱ्या भाजपला लगावला.

तसेच, वंचित बहुजन आघाडी लढवलेल्या सर्वच्या सर्व जागा जिंकेल, असा विश्वासही प्रकाश आंबेडकर यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना व्यक्त केला.

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली