AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : शरद पवारांचा राज्यपाल कोश्यारींना जोरदार टोला, तर फडणवीसांचं पवारांना प्रत्युत्तर

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा राज्यपाल कोश्यारी यांच्यावर जोरदार टोलेबाजी केलीय. 'भगतसिंह कोश्यारी यांच्यासारखे कर्तृत्ववान राज्यपाल पाहिले नाहीत. केंद्र सरकार घसरून कोणत्या पातळीवर जात आहे याचं उदाहरण महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे, अशी टीका पवारांनी केलीय.

Video : शरद पवारांचा राज्यपाल कोश्यारींना जोरदार टोला, तर फडणवीसांचं पवारांना प्रत्युत्तर
शरद पवार, भगतसिंह कोश्यारीImage Credit source: TV9
sagar joshi
sagar joshi | Updated on: Mar 05, 2022 | 6:16 PM
Share

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) आणि महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारमधील संघर्ष सातत्याने पाहायला मिळतोय. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा संघर्ष पुन्हा एकदा दिसून आला. सत्ताधाऱ्यांच्या गोंधळात राज्यपाल अभिभाषण अर्धवट सोडत निघून गेले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पुन्हा एकदा राज्यपाल कोश्यारी यांच्यावर जोरदार टोलेबाजी केलीय. ‘भगतसिंह कोश्यारी यांच्यासारखे कर्तृत्ववान राज्यपाल पाहिले नाहीत. केंद्र सरकार घसरून कोणत्या पातळीवर जात आहे याचं उदाहरण महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे, अशी टीका पवारांनी केलीय.

हल्लीच्या राज्यपालांवर न बोललेलं बरं- पवार

राज्यपाल कोश्यारी यांच्यावर टीका करताना पवार म्हणाले की, हल्लीच्या राज्यपालांवर न बोललेलं बरं. केंद्र सरकार कोणत्या पातळीवर जात आहे हे महाराष्ट्रात पाहायला मिळतंय. राज्य मंत्रिमंडळाला विधान परिषदेवर सभासद नेमण्याचा अधिकार आहे. मात्र, वर्ष होऊन गेलं तरी 12 आमदारांच्या बाबतीत निर्णय घेतला जात नाही. याचा अर्थ काय? असा सवाल पवारांनी केलाय. ज्या पदाची प्रतिष्ठा महाराष्ट्रात अनेकांनी सांभाळली, ती आम्ही ठेवणारच नाही हा निर्धार ठेवून कुणी काम करत असेल तर त्यावर भाष्य न केलेलं बरं. राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनीही याचा विचार केला पाहिजे, असेंही पवार म्हणाले.

देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर

दरम्यान, शरद पवार यांनी राज्यपालांवर केलेल्या टीकेला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलंय. ‘मला असं वाटतं की जाणीवपूर्वक असंविधानिक कृती करायच्या आणि राज्यपालांविरोधात बोलायचं. एकप्रकारे वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न हा सातत्याने सुरु आहेय. पण मला असं वाटतं की राज्यपाल हे एका संविधानिक पदावर बसलेली व्यक्ती आहे. ते संविधानानेच काम करतात. त्यामुळे अशाप्रकारे त्यांना टार्गेट करणं हे अतिशय अयोग्य आहे’, अशा शब्दात फडणवीसांनी शरद पवार आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना प्रत्युत्तर दिलंय.

इतर बातम्या :

UP Election 2022 : उत्तर प्रदेशात शेवटच्या टप्प्यात भाजपला मोठा झटका, रीटा बहुगुणा जोशींच्या मुलाचा समाजवादी पार्टीत प्रवेश!

VIDEO: राणे पिता पुत्रांची मुंबईत पोलीस ठाण्यात हजेरी, फडणवीस न बोलता का निघून गेले?

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली