AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नव्या पंतप्रधानाच्या शपथविधीपूर्वीच बांगलादेशमधून भारतासाठी आली सर्वात मोठी गुडन्यूज, पाकिस्तान, चीनचा नुसता जळफळाट

बांगलादेशमध्ये नुकत्याच निवडणुका पार पडल्या या निवडणुकीमध्ये बीएनपीने मोठं यश मिळवलं आहे. मंगळवारी नव्या पंतप्रधानांचा शपथविधी सोहळा आहे, मात्र त्यापूर्वीच आता बांगलादेशमधून भारतासाठी गुडन्यूज आली आहे.

नव्या पंतप्रधानाच्या शपथविधीपूर्वीच बांगलादेशमधून भारतासाठी आली सर्वात मोठी गुडन्यूज, पाकिस्तान, चीनचा नुसता जळफळाट
Tariq RahmanImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 16, 2026 | 8:09 PM
Share

बांगलादेशमध्ये नुकतीच लोकसभेची निवडणूक पार पडली, या निवडणुकीमध्ये तारिक रहमान यांच्या नेतृत्वात बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी BNP ने दणदणीत यश मिळवलं. आता लवकरच बांगलादेशमध्ये बीएनपी सरकार स्थापन करणार आहे. तारिक रहमान हे मंगळवारी बांगलादेशच्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. तारिक रहमान यांच्या शपथविधी सोहळ्याची सध्या संपूर्ण जगभरात चर्चा सुरू असून, या शपथविधी सोहळ्यासाठी भारतासह जागातील प्रमुख देशांना निमंत्रण देण्यात आलं आहे. दरम्यान तारिक रहमान यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर बांगलादेशचे भारतासोबत संबंध कसे असतील? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे, या पार्श्वभूमीवर आता मोठी बातमी समोर आली आहे.

ऑगस्ट 2024 मध्ये शेख हसीना यांचं सरकार कोसळलं, तेव्हापासून भारत आणि बांगलादेशच्या संबंधांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला आहे. सरकार कोसळल्यानंतर शेख हसीना या भारताच्या आश्रयाला आल्या आहेत, शेख हसीना यांना भारताने आश्रय दिला आहे. त्यावरून बांगलादेशमधील काळजीवाहू सरकार आणि भारतामधील संबंध चांगलेच ताणले गेल्याचं पहायला मिळालं, मात्र आता बांगलादेशमध्ये नवीन सरकार आलं आहे. तारिक रहमान हे मंगळवारी पंतप्रधानपदाची थपथ घेणार आहेत. दरम्यान शेख हसीना यांच्या मुद्द्यावर बांगलादेशच्या नव्या सरकारची नेमकी भूमिका काय असणार? याबाबत उत्सुकता निर्माण झाली असतानाच आता बांगलादेशमधून अधिकृत स्टेटमेंट आलं आहे.

यावर बोलताना बीएनपीचे महासचिव मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर यांनी मोठं विधान केलं आहे. शेख हसीना या भारतामध्ये आहेत, मात्र त्यामुळे भारत आणि बांगलादेशमधील संबंधांवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. भारत आणि बांग्लादेशमधील संबंध आणखी मजबूत होतील, असं त्यांनी म्हटलं आहे. ते एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की आम्ही हे मान्य करतो की शेख हसीना यांनी मानवाधिकाराच गंभीर उल्लंघन केलं आहे. त्यांना शिक्षा व्हावी अशी येथील नागरिकांची इच्छा आहे. मात्र सध्या शेख हसीना या भारतामध्ये आहेत, आणि त्यांची भारतामध्ये असलेली उपस्थितीचा भारत बांगलादेश संबंधांवर कोणताही परिणाम होणार नाही. भारतानं शेख हसीना यांचं प्रत्यार्पण केलं नाही तरी देखील भारत आणि बांगलादेशमधील व्यापारी संबंध हे मजबूत राहातील असं मिर्झा फखरुल इस्लाम यांनी म्हटलं आहे. दरम्यान बीएनपीकडून आलेली ही प्रतिक्रिया पाकिस्तान आणि चीनसाठी मोठा झटका मानली जात आहे.

गणेश नाईक यांच्या आरोपांवर एकनाथ शिंदेंचे पहिल्यांदाच भाष्य, नेमकं काय
गणेश नाईक यांच्या आरोपांवर एकनाथ शिंदेंचे पहिल्यांदाच भाष्य, नेमकं काय.
अजित पवार यांचं विमान पडलं, त्यानंतर पुन्हा 3 स्फोट? नेमकं काय घडलं?
अजित पवार यांचं विमान पडलं, त्यानंतर पुन्हा 3 स्फोट? नेमकं काय घडलं?.
जळालेल्या ब्लॅक बॉक्सचा डेटा परदेशात तपासणीसाठी पाठवण्याची शक्यता
जळालेल्या ब्लॅक बॉक्सचा डेटा परदेशात तपासणीसाठी पाठवण्याची शक्यता.
DGCA चा प्राथमिक अहवाल तत्काळ जाहीर करा, रोहित पवारांची मागणी
DGCA चा प्राथमिक अहवाल तत्काळ जाहीर करा, रोहित पवारांची मागणी.
अमरावतीत बस स्थानकाची दुर्दशा; जीर्ण इमारतीमुळे प्रवाशांमध्ये चिंता
अमरावतीत बस स्थानकाची दुर्दशा; जीर्ण इमारतीमुळे प्रवाशांमध्ये चिंता.
महायुतीत वाद पुन्हा तापला; रवींद्र धंगेकरांची गणेश नाईकावर जोरदार टीका
महायुतीत वाद पुन्हा तापला; रवींद्र धंगेकरांची गणेश नाईकावर जोरदार टीका.
सत्तारांच्या मंदिर भेटीवरून अंबादास दानवेंची मोठी प्रतिक्रिया
सत्तारांच्या मंदिर भेटीवरून अंबादास दानवेंची मोठी प्रतिक्रिया.
छत्रपती संभाजीनगरचे आमदार, नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या भेटीला
छत्रपती संभाजीनगरचे आमदार, नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या भेटीला.
...तर वनमंत्री काय कामाचे? गणेश नाईकांच्या भूमिकेवर नीलेश राणे संतापले
...तर वनमंत्री काय कामाचे? गणेश नाईकांच्या भूमिकेवर नीलेश राणे संतापले.
रायगडावरील शिवरायांचे समाधीस्थळ अंधारात, आमदार गोपीचंद पडळकरांकडून दखल
रायगडावरील शिवरायांचे समाधीस्थळ अंधारात, आमदार गोपीचंद पडळकरांकडून दखल.