AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजप आमदारांना वेलकम टू मुंबई, विधान परिषद निवडणूक पार्श्वभूमीवर मुक्कामी बोलावलं, 19 तारखेला महत्त्वाची बैठक

निवडणूक जिंकण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला 27 मतांची गरज आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला जिंकण्यासाठी 162 मतांची गरज भासणार आहे. भाजपकडे 106 आमदार असून अपक्षांच्या मदतीनं भाजपचं संख्याबळ 113 पर्यंत जाईल. त्यामुळे भाजपचे चार उमेदवार सहज जिंकून येऊ शकतात. पाच उमेदवार जिंकण्यासाठी 135 आमदारांच्या पाठिंब्याची गरज आहे.

भाजप आमदारांना वेलकम टू मुंबई, विधान परिषद निवडणूक पार्श्वभूमीवर मुक्कामी बोलावलं, 19 तारखेला महत्त्वाची बैठक
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Jun 16, 2022 | 9:49 AM
Share

मुंबईः राज्यसभेनंतर आता येत्या 20 जून रोजी विधान परिषद निवडणुकीचा (Vidhan Parishad Election) आखाडा रंगणार आहे. परिषदेच्या 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात असल्यामुळे ही निवडणूकदेखील चुरशीची होणार आहे. याच पार्श्वभूमीवर मतांची फोडाफोडी होऊ नये, यासाठी भाजपतर्फे (BJP) महाराष्ट्रातील सर्व आमदारांना 18 जूनपासूनच मुंबईत मुक्कामाला येऊन राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 19 जून रोजी भाजपच्या आमदारांची (BJP MLA) मुंबईत महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत मतदान प्रक्रियेची माहिती सर्व आमदारांना दिली जाईल. विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपने राज्यभरातील आमदारांचे वेगवेगळे गट तयार केले आहेत. सर्व गटप्रमुखांनी आपापल्या गटातील आमदारांना मुंबईत येण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार 18 जूनपासून भाजप आमदारांना मुंबईत हॉटेलमध्ये मुक्कामाला ठेवलं जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. आमदारांची विशेष काळजी घेण्याची जबाबदारी आशीष शेलार, गिरीश महाजन आणि प्रवीण दरेकर यांना देण्यात आली आहे.

10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात

विधान परिषदेत निवडणुकीत 10 जागांसाठी एकूण 11 उमेदवार रिंगणात आहेत. काँग्रेसने दुसरा उमेदवार मागे न घेतल्यामुळे आता महाविकास आघाडीविरुद्ध भाजपा असा सामाना रंगणार आहे. कोणत्या पक्षाचे किती आणि कोणते उमेदवार उभे आहेत? शिवसेना- सचिन अहिर, आमशा पाडवी राष्ट्रवादी काँग्रेस- एकनाथ खडसे, रामराजे निंबाळकर काँग्रेस- भाई जगताप, चंद्रकांत हांडोरे भाजप- प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, प्रसाद लाड

कुणाकडे किती संख्याबळ?

विधान परिषदेच्या उमेदवाराला निवडणूक जिंकण्यासाठी 27 मतांची गरज आहे. यासाठी कोणत्या पक्षाकडे किती संख्याबळ आहे हे पाहुयात- शिवसेना- 55 राष्ट्रवादी काँग्रेस- 53 काँग्रेस- 44 भाजप-106

कुणाला किती मतांची आवश्यकता?

निवडणूक जिंकण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला 27 मतांची गरज आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला जिंकण्यासाठी 162 मतांची गरज भासणार आहे. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादीचे दोन उमेदवार सहज जिंकतील. काँग्रेसचाही एक उमेदवार जिंकेल पण दुसऱ्या उमेदवारासाठी अतिरिक्त 10 मतांची गरज आहे. तर भाजपकडे 106 आमदार असून अपक्षांच्या मदतीनं भाजपचं संख्याबळ 113 पर्यंत जाईल. त्यामुळे भाजपचे चार उमेदवार सहज जिंकून येऊ शकतात. पाच उमेदवार जिंकण्यासाठी 135 आमदारांच्या पाठिंब्याची गरज आहे. त्यामुळे अतिरिक्त 22 आदारांचं पाठबळ मिळवणं भाजपसाठी आगत्याचं आहे. यासाठीच भाजपने तगडी रणनिती आखल्याची माहिती समोर येत आहे. मतदान प्रक्रियेची संपूर्ण माहिती आमदारांना देण्यात येईल, तसेच फोडाफोडीच्या राजकारणाला बळी पडू नये, अशी तंबीही भाजप नेत्यांकडून दिली जाण्याची शक्यता आहे.

Follow Us
रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? महाजनांचा मोठा काय?
Girish Mahajan | रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? गिरीश महाजनांचा मोठा दावा काय?
गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक.....
Gondia Rain | गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक शेतकरी चिंतेत
नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
Mumbai | नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! 13 एप्रिलला अटक, आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
Thane Assault Case | ठाण्यातील वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर
Buldhana | लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर; कच्च्या मालाचे नमुने तपासणीसाठी जप्त
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून मोठी भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार, नवे नियम लागू
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
Devendra Fadnavis On Shetkari Karjmafi | कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत संजय राऊतांनाही खोचक टोला
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
Devendra Fadnavis UNCUT | मोदींच्या 12 वर्षांचा महाअहवाल! भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले....
Devendra Fadnavis | भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले मोदी सरकारच्या 12 वर्षांचे रिपोर्ट कार्ड