AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vidhan Parishad Election : असं काय झालं? की दौरा सोडून दिलीप वळसे-पाटील मुंबईकडे रवाना, विधान परिषदेसाठी हलचाली वाढल्या

राज्यचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse Patil) हेही आपला नियोजित दौरा सोडून तातडीने मुंबईकडे रवाना झाले आहेत. तर दुसरीकडे अजित पवारांनीही देवेंद्र फडणवीसांचं आव्हान स्वीकारलं आहे.

Vidhan Parishad Election : असं काय झालं? की दौरा सोडून दिलीप वळसे-पाटील मुंबईकडे रवाना, विधान परिषदेसाठी हलचाली वाढल्या
दिलीप वळसे पाटील, गृहमंत्रीImage Credit source: TV9
| Updated on: Jun 16, 2022 | 7:06 PM
Share

पुणे : राज्यसभा निवडणुकीतला (Rajyasabha Election) एका जागेवरचा पराभव हा महाविकास आघाडीच्या चांगलाच जिव्हारी लागलाय. त्यामुळे विधान परिषदेसाठी (Vidhan Parishad Election) गाफील न राहता महाविकास आघाडीने जोरदार तयारी सुरू ठेवली आहे. तर दुसरीकडे भाजप त्यांच्या पाचही जागा सहज विजयी होतील असा दावा करत आहे. राज्यसभा निवडणुकीआधीही भाजप नेते असाच दावा करत होता. तो दावा भाजपने खरा करून दाखवल्याने आता महाविकास आघाडीतील नेत्यांपुढील आव्हान मोठं असणार आहे. त्यामुळेच आता महाविकास आघाडीच्या गोटातल्या हलचाली आणखी वाढल्या आहेत. मुंबईत महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकावर बैठका सुरू आहेत. राज्यचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse Patil) हेही आपला नियोजित दौरा सोडून तातडीने मुंबईकडे रवाना झाले आहेत. तर दुसरीकडे अजित पवारांनीही देवेंद्र फडणवीसांचं आव्हान स्वीकारलं आहे.

वळसे पाटलांच्या दौऱ्याचं नेमकं काय झालं?

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील हे दोन दिवसांच्या दौऱ्यावर होते. आंबेगाव तालुक्यातील दोन दिवस दौऱ्या असणारे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आपला दौरा सोडून तातडीने मुंबईकडे रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे. विधान परिषद निवडणुकीच्या पाश्वभुमीवर मुंबईत महाविकास आघाडीच्या नेत्यांची महत्वाची बैठक असल्याने वळसे-पाटलांना हा दौरा रद्द करावा लागलाय. तर दुसरीकडे भाजपची एक महत्वाची बैठक दुपारीच मुंबईत पार पडलीय. भाजपच्या नेत्यांनी ही बैठक लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी असल्याचे जरी सांगण्यात आले असले तरी या बैठकीत विधान परिषदेवरही नक्कीच चर्चा झाली असणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीही जोमाने कामाला लागली आहे.

अजित पवारही घेणार आमदारांची बैठक

दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारही आमदारांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत आमदारांना मार्गदर्शन केले जाणार आहे. तर दुसरीकडे खडसेंना हरवण्यासाठी भाजप जाळं टाकत असल्याचा गोप्यस्फोत इम्तियाज जलील यांनी केल्यानेही महाविकास आघाडी जास्त सावध झाली आहे.

भाजप नेते म्हणतात…

भाजप नेत्यांनी मात्र जलील यांचा हा दावा फेटाळून लावला आहे. आम्हाला कुणालाही पाळण्याची गरज नाही. आमचा पाचवी उमेदवार संपूर्ण ताकदीने बहुमताने आणि अपेक्षित आहे. त्यापेक्षाही जास्त बहुमताने निवडून येतील त्याची तयारी केली आहे, कुणालाही पाडण्यात त्याला आमचा नादच नाही, अशी प्रतिक्रिया जलील यांच्या दाव्यावर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. तर फडणवीसांनीही यावरून एमआयएमवर जोरदार टीका केली आहे.

Follow Us
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार.
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण.
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक...
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक....
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल.
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण.
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?.
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी.
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी.
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?.
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण.