Vidhan Parishad Election Result 2022 : ‘लोकाभिमुख सरकार आणल्यावरच आमचा संघर्ष संपेल’, देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीला थेट इशारा

विजयी जल्लोषानंतर देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) थेट इशाराच दिलाय. विधान परिषदेचा निकाल म्हणजे महाराष्ट्रातील परिवर्तनाची नवी नांदी असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.

Vidhan Parishad Election Result 2022 : 'लोकाभिमुख सरकार आणल्यावरच आमचा संघर्ष संपेल', देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीला थेट इशारा
देवेंद्र फडणवीस यांचा महाविकास आघाडी सरकारला इशाराImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 21, 2022 | 3:59 AM

मुंबई : राज्यसभे पाठोपाठ भाजपनं विधान परिषद निवडणुकीतही (Vidhan Parishad Election) महाविकास आघाडीला चारी मुंड्या चीत केलं आहे. विधान परिषद निवडणुकीत भाजपनं पाच जागा जिंकत महाविकास आघाडीला पुन्हा एकदा जोरदार हादरा दिलाय. भाजपचे चार उमेदवार विजयी होणार हे निश्चित होतं. मात्र, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या रणनितीचा पुन्हा एकदा विजय झालाय. या विजयानंतर भाजपच्या आमदारांनी जोरदार जल्लोष केला. विधान भवन परिसरात देवेंद्र फडणवीस यांच्यासह विजयी उमेदवार आणि भाजपच्या सर्व आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. विजयी जल्लोषानंतर देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) थेट इशाराच दिलाय. विधान परिषदेचा निकाल म्हणजे महाराष्ट्रातील परिवर्तनाची नवी नांदी असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.

विजयी जल्लोषानंतर माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे पाचही उमेदवार निवडून आले आहेत. आम्ही राज्यसभा निवडणुकीत 123 मतं घेतली होती. आता 134 मतं घेतली आहे. मी पहिल्यापासून सांगत होतो की महाविकास आघाडीत प्रचंड नाराजी आहे, समन्वय नाही. सरकारवर आमदारांचा विश्वास नाही. म्हणून आपल्या सदसदविवेक बुद्धीनं आमदार आमच्या पाचव्या उमेदवाराला मत देतील आणि तेच झालं. आमच्या पाचव्या उमेदवाराला एकही मत नव्हतं. पण आमचा पाचवा उमेदवार विजयी झाला.

‘महाराष्ट्रात परिवर्तनाची नवी नांदी पाहायला मिळतेय’

पुन्हा एकदा मी लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांचे आभार मानतो. आमचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी आज महाराष्ट्र उभा आहे. या निकालाने महाराष्ट्रात परिवर्तनाची नवी नांदी पाहायला मिळत आहे. आज सरकारमधील असंतोष बाहेर आलाय. आमचा संघर्ष असाच सुरु राहील. लोकाभिमुख सरकार आणल्यावरच आमचा संघर्ष संपेल, असा इशाराच फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला दिलाय.

‘आमचा संघर्ष सत्तेसाठी नाही, तर जनतेसाठी आणि परिवर्तनासाठी’

राज्यसभा निवडणूक निकालानंतर फडणवीसांचा चमत्कार अशी चर्चा सुरु होती. त्याबाबत विचारलं असता, कुठलाही चमत्कार मी मानत नाही. याठिकाणी सरकारमधील असंतोष मतांमध्ये परिवर्तीत झालाय. असंतोष धुमसत राहिला की काय होतं हे आजच्या निकालानं दाखवून दिल्याचं फडणवीस म्हणाले. इतकंच नाही तर तुम्हाला कुणाची जी मतं फुटलेली दिसतात, तो तुमचा कयास आहे. जे सत्तेत आहेत ते केवळ आम्हाला माहिती आहे. सगळ्या पक्षातील त्या आमदारांचे, अपक्ष आमदारांचे मी आभार मानतो. आमचे पाचही उमेदवार विजयी करण्यात त्यांनी हातभार लावला. आमचा संघर्ष सत्तेसाठी नाही, तर जनतेसाठी आणि परिवर्तनासाठी आहे, अशा शब्दात फडणवीसांनी महाविकास आघाडीला टोला हाणलाय.

विधान परिषद निवडणुतील विजयी उमेदवार

भाजप

>> प्रवीण दरेकर – 29 मते >> श्रीकांत भारतीय – 30 मते >> राम शिंदे – 30 मते >> उमा खापरे – 27 मते >> प्रसाद लाड – 28 मते

राष्ट्रवादी काँग्रेस

>> रामराजे नाईक निंबाळकर – 29 मते >> एकनाथ खडसे – 28 मते

काँग्रेस

>> भाई जगताप – 26 मते >> चंद्रकांत हंडोरे – 22 मते (पराभूत)

शिवसेना

>> सचिन अहिर – 26 मते >> आमशा पाडवी – 26 मते

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.