AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्या कोण-कोण शपथ घेणार? किती वाजता राज्यपालांकडे जाणार? विजय रुपानी यांनी दिली महत्त्वाची माहिती

Maharashtra Govt Formation : महाराष्ट्रात भाजपाचे केंद्रीय निरीक्षक म्हणून आलेले विजय रुपानी यांनी सत्ता स्थापनेसंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. उद्या कोण-कोण शपथ घेणार? सरकार स्थापनेसाठी राज्यपालांना किती वाजता भेटणार? ते त्यांनी सांगितलं.

उद्या कोण-कोण शपथ घेणार? किती वाजता राज्यपालांकडे जाणार? विजय रुपानी यांनी दिली महत्त्वाची माहिती
Maharashtra Govt Formation
| Updated on: Dec 04, 2024 | 1:47 PM
Share

“आज विधानसभा संसदीय पक्षाचे नेते म्हणून सर्व सहमतीने, एकमताने देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली” असं भाजप नेते विजय रुपानी यांनी सांगितलं. “संसदीय नेता निवडीची प्रक्रिया उत्साहात, आनंदाच्या वातावरणात संपन्न झाली” असं विजय रुपांनी म्हणाले. ते दिल्लीहून केंद्रीय निरीक्षक म्हणून आले होते. त्यांच्या आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्या उपस्थितीत भाजप विधिमंडळ पक्षाच्या गटनेत्याची निवड करण्यात आली. भाजप महायुतीमधला मोठा पक्ष आहे. मुख्यमंत्री त्यांचाच होणार. भाजप विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड होणं, म्हणजे ते महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असतील.

केंद्रीय निरीक्षक म्हणून आलेल्या विजय रुपानी यांना सरकार स्थापनेला विलंब का झाला? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर ते म्हणाले की, “आमचा पक्ष सामूहीक निर्णय घेतो. त्यामुळे कधीकधी विलंब होतो. आमच्याकडे हुकूमशाही नाही. आघाडी म्हणून निवडणूक लढवली. सर्वांशी चर्चा करुन विचार विनिमय करुन निर्णय झाला. म्हणून थोडा विलंब झाला”

सरकार स्थापनेचा दावा कधी?

उद्या कोण शपथ घेणार? मंत्रिमंडळातील सदस्य सुद्धा शपथ घेणार का? यावर सुद्धा विजय रुपानी बोलले. “ते संध्याकाळी हायकमांडशी चर्चा झाल्यानंतर ठरेल. उद्या आझाद मैदानात मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री नक्की शपथ घेतील” असं त्यांनी सांगितलं. सरकार स्थापनेचा दावा कधी करणार? यावर आज दुपारी 3 वाजता राज्यपालांना भेटून सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याच त्यांनी सांगितलं.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.