AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजकारणातला देवमाणूस गेला, राजीव सातवांबद्दल बोलताना वडेट्टीवार ढसाढसा रडले

काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार राजीव सात यांची कोरोनाविरुद्धची लढाई अपयशी ठरलीय. कोरोनावरील उपचारादरम्यान पुण्याच्या जहांगीर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. (Vijay Wadettiwar Emotional  After Rajiv satav pass Away)

राजकारणातला देवमाणूस गेला, राजीव सातवांबद्दल बोलताना वडेट्टीवार ढसाढसा रडले
विजय वडेट्टीवार आणि राजीव सातव
| Updated on: May 16, 2021 | 10:19 AM
Share

मुंबई :  काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार राजीव सातव (Rajiv Satav) यांची कोरोनाविरुद्धची लढाई अपयशी ठरलीय. कोरोनावरील उपचारादरम्यान पुण्याच्या जहांगीर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. “त्यांच्या निधानाने काँग्रेस पक्षाचं कधीही भरुन न येणारं नुकसान झालंय.  राजकारणातला देवमाणूस गेला”, अशा शब्दात मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सातव यांना आदरांजली वाहिली. राजीव यांच्याबद्दलच्या आठवणी सांगताना वडेट्टीवार यांना गहिवरुन आलं. ते बोलता बोलता रडायला लागले. टीव्ही 9 मराठीशी बोलताना त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. (Vijay Wadettiwar Emotional  After Rajiv satav pass Away)

“राजीव सातव तरुण तडफदार होते. अभ्यासू नेते होते. कोणत्याही विषयांवर बोलू शकतील, असं त्यांच्याकडे ज्ञान होतं. जिद्दीने आणि चिकाटीने काम करणं त्यांच्या रक्तात होतं. त्यांच्या कार्यकर्तृत्वाने त्यांनी आपली छाप दिल्लीत सोडली होती. व्यक्ती म्हणून ते हळवे होते. काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांच्या भावना ते समजून घेऊन त्याच्यावर योग्य मार्ग काढत. आम्हाला नेहमी राजीव यांचं मार्गदर्शन लाभायचं. दिल्लीत गेल्यानंतर एक हक्काचा माणूस की ज्यांच्याकडे जाऊन त्यांना आपल्या भावना सांगाव्यात आणि त्यांनी ते प्रश्न सोडवावेत, असा नेता आम्ही गमावला”, असं सांगत असताना वडेट्टीवार यांना अश्रू अनावर झाले.

वयाने छोट्या राजीवने माझी समजूत काढली

महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीची स्थापना झाली. मंत्रिमंडळ बनल्यानंतर मी काहीसा नाराज होतो. फडणवीस सरकार असताना मी विरोधी पक्ष नेता असल्याने आता सरकार आल्यानंतर साहजिक मंत्री बनल्यानंतर माझी खात्याबाबतीत काहीशी अपेक्षा होती. मी खात्यासंदर्भात नाराज आहे ही गोष्ट राजीवजींना समजल्यानंर त्यांनी मला फोन केला. मला दिल्लीला बोलावलं. मी त्यांना सांगितलं सध्या तरी येणं शक्य नाही. पण आणखी काही दिवसांनी मी दिल्लीला येऊन आपली भेट घेतो. त्यानंतर त्यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याशी माझ्याविषयी संवाद साधला.”

“राजीवजींनी फोन करुन मला सांगितलं. तुम्हाला जी जबाबदारी मिळाली आहे, ती नेटाने पार पाडा. तुम्हाला शोभेल अशी तुमच्यावर पुढे मोठी जबाबदारी काँग्रेस पक्ष देईल, काळजीचं काही कारण नाही. त्याची जबाबदारी मी घेतो, असं राजीव सातव मला म्हणाले. लागलीच मी त्यांना होकार दिला आणि पुढे माझं काम सुरु ठेवलं.”

“माझ्यापेक्षा वयाने छोट्या असणाऱ्या राजीवजींनी मला समजावलं. माझ्या समस्येवर मार्ग काढला. माझी खंत जाणून घेऊन त्यावर मार्ग काढण्यासंबंधी आश्वस्त केलं. आज राजकारणातला देवमाणूस गेला”, अशा भावना वडेट्टीवार यांनी व्यक्त केल्या.

दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर हिंगोलीसारख्या छोट्या जिल्ह्यातून पंचायच समिती सदस्य ते थेट खासदार, राहुल गांधींचा विश्वासू सहकारी, देशाचा राजकारण हाकणारा नेता, राजीव सातव यांचा हा प्रवास नक्कीच थक्क करणारा आहे. त्यांच्या कुटुंबाला हे दु:ख सहन करण्याची शक्ती परमेश्वर देवो, अशी प्रार्थना वडेट्टीवार यांनी केली.

(Vijay Wadettiwar Emotional  After Rajiv satav pass Away)

हे ही वाचा :

MP Rajeev Satav Death | काँग्रेस खासदार राजीव सातव यांचे निधन, कोरोनाशी झुंज अपयशी

राजीव सातव यांच्या शरीरात आढळलेला सायटोमॅजिलो व्हायरस नेमका काय? धोका कुणाला?

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.