AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raju Shetti : ‘मविआ’ बद्दल दु:ख नाही अन् भाजपाचे देणे घेणे नाही, राजकीय अस्थिरतेबद्दल काय म्हणाले राजू शेट्टी ?

महाविकास आघाडी सरकारबद्दल आता जो तो प्रश्न उपस्थित करु लागला आहे. मात्र, काही काळ महाविकास आघाडीबरोबर सत्तेत राहणाऱ्या राजू शेट्टी यांचा अंदाज काही वेगळाच आहे. महाविकास आघाडी सरकार पडतंय याबाबत आपल्याला अजिबात दु:ख नाही. कारण हे सरकार काही जनताभिमुख नव्हते. तर अनैसर्गिक युतीमधून झालेले हे सरकार होते.

Raju Shetti : 'मविआ' बद्दल दु:ख नाही अन् भाजपाचे देणे घेणे नाही, राजकीय अस्थिरतेबद्दल काय म्हणाले राजू शेट्टी ?
| Edited By: | Updated on: Jun 24, 2022 | 10:14 AM
Share

सांगली : राज्याच्या राजकीय अस्थिरतेबद्दल आता घटक पक्ष देखील आपले मत व्यक्त करु लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून (Eknath Shinde) एकनाथ शिंदे यांनी बंडखोर आमदारांना घेऊन आपला एक स्वतंत्र गट निर्माण केला आहे. त्यामुळे सरकारचे काय होणार असा सवाल उपस्थित होत असतानाच मात्र, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Raju Shetti) राजू शेट्टी यांनी सत्ताधारी आणि विरोधकांवरही बोचरी टिका केली आहे. सध्याच्या वातावरणावरुन जो तो आपले राजकीय स्वार्थ साधत आहे. (Maharashtra Politics) राज्याचे किंवा राष्ट्राच्या हिताचे कुणालाही देणे-घेणे राहिलेले नाही. या वर्चस्वाच्या लढाईत मात्र लोकशाही ही टिकून राहणार की नाही याबाबत त्यांनी शंका उपस्थित केली आहे. राज्याच्या राजकारणाला वेगळी परंपरा आहे. याचा विसर राजकिय पक्षांना पडलेला आहे. पण जनतेच्या दृष्टीकोनातून घातक असून हेच लोक लोकशाहीचा खून करतील अशी शंका देखील शेट्टी यांनी उपस्थित केलीय.

ये तो होना ही था..!

महाविकास आघाडी सरकारबद्दल आता जो तो प्रश्न उपस्थित करु लागला आहे. मात्र, काही काळ महाविकास आघाडीबरोबर सत्तेत राहणाऱ्या राजू शेट्टी यांचा अंदाज काही वेगळाच आहे. महाविकास आघाडी सरकार पडतंय याबाबत आपल्याला अजिबात दु:ख नाही. कारण हे सरकार काही जनताभिमुख नव्हते. तर अनैसर्गिक युतीमधून झालेले हे सरकार होते. त्यामुळेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दोन महिन्यापूर्वीच पाठिंबा काढून घेतला होता. सध्याच्या राजकीय घडामोडीमुळे मात्र सर्वसामान्य जनतेचे प्रश्न हे बाजूला राहिले आहेत. शिवाय याबाबत ना सत्ताधाऱ्यांना घेणे-देणे आहे ना विरोधकांना. आता जनतेनेच योग्य विचार कऱणे गरजेचे असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले आहे.

सत्तेसाठी भाजप कोणत्याही स्थराला

सत्तेसाठी भाजप हे कोणत्याही स्थराला जाऊ शकते. यावेळीच नाहीतर यापू्र्वीही मध्य प्रदेश, कर्नाटकात हे घडून आले आहे. आता ते महाविकास आघाडीच्या बाबतीत होताना दिसत आहे. भाजपाकडून ज्या पध्दतीने पाशवी वृत्ती दाखवून सरकार हस्तगत करतेय हे लोकशाहीच्या दृष्टिकोनातून घातक आहे. त्यामुळे महाविकास आघाडीवर ही नामुष्की ओढावली आहे तर भाजप केंद्रातील सत्तेचा उपयोग कोणत्याही परस्थितीमध्ये राजकीय स्वार्थ साधण्यासाठी करीत आहे.

लोकशाहीबद्दल मात्र चिंता व्यक्त

राजकीय पक्षांच्या भूमिकेमुले लोकशाहीची व्याख्याच बदलत आहे. हे सरकार जनतेसाठी नाही स्वत:च्या स्वार्थासाठी सत्तेचा उपयोग करीत आहे. हे आता नारगिकांपासूनही लपून राहिलेले नाही. गेल्या अडीच राज्याच्या हिताचे कोणते निर्णय झाले नाही तर आता या राजकीय घडामोडीत विकासाची काय कामे होणार असा सवाल उपस्थित करीत राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी आणि भाजपावर सडकून टिका केली आहे. सध्याच्या राजकीय स्थितीमुळे मात्र, लोकशाही धोक्यात असल्याचे सांगत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.