AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raju Shetti : ‘मविआ’ बद्दल दु:ख नाही अन् भाजपाचे देणे घेणे नाही, राजकीय अस्थिरतेबद्दल काय म्हणाले राजू शेट्टी ?

महाविकास आघाडी सरकारबद्दल आता जो तो प्रश्न उपस्थित करु लागला आहे. मात्र, काही काळ महाविकास आघाडीबरोबर सत्तेत राहणाऱ्या राजू शेट्टी यांचा अंदाज काही वेगळाच आहे. महाविकास आघाडी सरकार पडतंय याबाबत आपल्याला अजिबात दु:ख नाही. कारण हे सरकार काही जनताभिमुख नव्हते. तर अनैसर्गिक युतीमधून झालेले हे सरकार होते.

Raju Shetti : 'मविआ' बद्दल दु:ख नाही अन् भाजपाचे देणे घेणे नाही, राजकीय अस्थिरतेबद्दल काय म्हणाले राजू शेट्टी ?
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Jun 24, 2022 | 10:14 AM
Share

सांगली : राज्याच्या राजकीय अस्थिरतेबद्दल आता घटक पक्ष देखील आपले मत व्यक्त करु लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून (Eknath Shinde) एकनाथ शिंदे यांनी बंडखोर आमदारांना घेऊन आपला एक स्वतंत्र गट निर्माण केला आहे. त्यामुळे सरकारचे काय होणार असा सवाल उपस्थित होत असतानाच मात्र, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Raju Shetti) राजू शेट्टी यांनी सत्ताधारी आणि विरोधकांवरही बोचरी टिका केली आहे. सध्याच्या वातावरणावरुन जो तो आपले राजकीय स्वार्थ साधत आहे. (Maharashtra Politics) राज्याचे किंवा राष्ट्राच्या हिताचे कुणालाही देणे-घेणे राहिलेले नाही. या वर्चस्वाच्या लढाईत मात्र लोकशाही ही टिकून राहणार की नाही याबाबत त्यांनी शंका उपस्थित केली आहे. राज्याच्या राजकारणाला वेगळी परंपरा आहे. याचा विसर राजकिय पक्षांना पडलेला आहे. पण जनतेच्या दृष्टीकोनातून घातक असून हेच लोक लोकशाहीचा खून करतील अशी शंका देखील शेट्टी यांनी उपस्थित केलीय.

ये तो होना ही था..!

महाविकास आघाडी सरकारबद्दल आता जो तो प्रश्न उपस्थित करु लागला आहे. मात्र, काही काळ महाविकास आघाडीबरोबर सत्तेत राहणाऱ्या राजू शेट्टी यांचा अंदाज काही वेगळाच आहे. महाविकास आघाडी सरकार पडतंय याबाबत आपल्याला अजिबात दु:ख नाही. कारण हे सरकार काही जनताभिमुख नव्हते. तर अनैसर्गिक युतीमधून झालेले हे सरकार होते. त्यामुळेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दोन महिन्यापूर्वीच पाठिंबा काढून घेतला होता. सध्याच्या राजकीय घडामोडीमुळे मात्र सर्वसामान्य जनतेचे प्रश्न हे बाजूला राहिले आहेत. शिवाय याबाबत ना सत्ताधाऱ्यांना घेणे-देणे आहे ना विरोधकांना. आता जनतेनेच योग्य विचार कऱणे गरजेचे असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले आहे.

सत्तेसाठी भाजप कोणत्याही स्थराला

सत्तेसाठी भाजप हे कोणत्याही स्थराला जाऊ शकते. यावेळीच नाहीतर यापू्र्वीही मध्य प्रदेश, कर्नाटकात हे घडून आले आहे. आता ते महाविकास आघाडीच्या बाबतीत होताना दिसत आहे. भाजपाकडून ज्या पध्दतीने पाशवी वृत्ती दाखवून सरकार हस्तगत करतेय हे लोकशाहीच्या दृष्टिकोनातून घातक आहे. त्यामुळे महाविकास आघाडीवर ही नामुष्की ओढावली आहे तर भाजप केंद्रातील सत्तेचा उपयोग कोणत्याही परस्थितीमध्ये राजकीय स्वार्थ साधण्यासाठी करीत आहे.

लोकशाहीबद्दल मात्र चिंता व्यक्त

राजकीय पक्षांच्या भूमिकेमुले लोकशाहीची व्याख्याच बदलत आहे. हे सरकार जनतेसाठी नाही स्वत:च्या स्वार्थासाठी सत्तेचा उपयोग करीत आहे. हे आता नारगिकांपासूनही लपून राहिलेले नाही. गेल्या अडीच राज्याच्या हिताचे कोणते निर्णय झाले नाही तर आता या राजकीय घडामोडीत विकासाची काय कामे होणार असा सवाल उपस्थित करीत राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी आणि भाजपावर सडकून टिका केली आहे. सध्याच्या राजकीय स्थितीमुळे मात्र, लोकशाही धोक्यात असल्याचे सांगत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Follow Us
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सातबाऱ्यावर नाव नाही?; सरकारने घेतला निर्णय
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सातबाऱ्यावर नाव नाही?; सरकारने घेतला मोठा निर्णय, व्हिडिओ बघाच
शिवसेना 5 हजार कोटींना विकली! संजय राऊतांचा खळबळजनक दावा
Sanjay Raut | शिवसेना 5 हजार कोटींना विकली! संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?
मुंबईच्या 24 वर्षीय बायकरचा दुर्दैवी अंत; नेमकं काय घडलं?
बस्तर सफरीत काळाचा घाला! मुंबईच्या 24 वर्षीय बायकरचा दुर्दैवी अंत; नेमकं काय घडलं?
बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या....
Kumbh Mela | बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या नावाने नेमकं काय घडलं?
झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी!
Zeeshan Siddique | झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी! थेट मुंबई आयुक्तांना फोन; फडणवीसांनाही दिली माहिती
अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार
Abhijit Dipke | अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार; नेमकं प्रकरण काय?
मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
Mumbai | तुकाराम मुंढे यांचा Domino’s ला दणका! मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा
Eknath Shinde | एकनाथ शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा, नेमकं काय ठरलं?
आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं...
Tv9 Marathi Special Report | फक्त आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं; सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी गठीत केली उच्चस्तरीय समिती