AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : ‘ही भाजपाची अधिकृत भूमिका असेल तर…’ नारायण राणेंच्या शरद पवारांवरील टीकेवरून संजय राऊत संतापले

संजय राऊत यांनी ट्विट करत नारायण राणे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. नारायण राणेंची भाषा अस्वीकारार्ह आहे. शरद पवार हे एक ज्येष्ठ नेते आहेत. शरद पवार यांच्याबाबत अशी भाषा महाराष्ट्राला मान्य नाही, असा संताप शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केला आहे.

Sanjay Raut : 'ही भाजपाची अधिकृत भूमिका असेल तर...' नारायण राणेंच्या शरद पवारांवरील टीकेवरून संजय राऊत संतापले
संजय राऊत/शरद पवार/नारायण राणेImage Credit source: tv9
| Updated on: Jun 24, 2022 | 9:50 AM
Share

मुंबई : महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi Government) वाचवण्याचा प्रयत्न केला तर शरद पवार यांना घरी जाऊ देणार नाही. रस्त्यात अडवू, अशी धमकी भाजपाचा एक केंद्रीय मंत्री देतो. ही भाजपाची अधिकृत भूमिका असेल तर तसे जाहीर करा. सरकार टिकेल किंवा जाईल, पण शरद पवार यांच्याबाबत अशी भाषा महाराष्ट्राला मान्य नाही, असा संताप शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केला आहे. भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची शिवसेनेच्या अंतर्गत बंडाळीवरून काल प्रतिक्रिया आली होती. एकनाथ शिंदे गटाला समर्थन देणाऱ्या आमदारांच्या केसालाही धक्का लागला तर घर गाठणेही कठीण होईल, असा इशारा काल नारायण राणे (Narayan Rane) यांनी दिला होता. त्यावरून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे. आता शिवसेनेतूनही यावर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

संजय राऊत यांचा हल्लाबोल

संजय राऊत यांनी ट्विट करत नारायण राणे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. नारायण राणेंची भाषा अस्वीकारार्ह आहे. शरद पवार हे एक ज्येष्ठ नेते आहेत. महाराष्ट्रात आणि देशात त्यांचे योगदान सर्वश्रृत आहे. एकीकडे शिवसेनेतून बंड करून एकनाथ शिंदे आसाममधील गुवाहाटीत तळ ठोकून आहेत. त्यांच्यासोबत 37हून अधिक आमदार आहेत, असा दावा केला जात आहे. शिवसेनेकडून त्यांना परत येवून बोलण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र अद्याप ते राज्यात परतलेले नाहीत. काल शरद पवार यांनी बंडखोर आमदारांना महाराष्ट्रात यावेच लागेल, असे म्हटले होते. त्यावर राणे यांनी तिखट प्रतिक्रिया दिली होती. यावर आता संजय राऊत यांनी पीएमओला उद्देशून एक ट्विट केले आहे आणि सवाल विचारला आहे.

काय आहे ट्विट?

काय म्हणाले होते नारायण राणे?

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना मुंबईत येऊ द्या. त्यातील अनेक आमदार एकनाथ शिंदे यांचा पाठिंबा काढून घेतील आणि आम्ही बहुमत सिद्ध करू, असा दावा काल शरद पवार यांनी केला होता. त्यांना मुंबईत तरी यावेच लागेल, असे विधान त्यांनी केले होते. यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले.

नारायण राणेंचे ट्विट

माननीय शरद पवार साहेब या सर्वांना धमक्या देत आहेत, सभागृहात येऊन दाखवा, ते येणारच आहेत. त्यांच्या मनाप्रमाणे मतदान करणार आहेत. मात्र त्यांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणे कठीण होईल, असे नारायण राणे म्हणाले होते. ट्वीट करत त्यांनी पवारांना लक्ष्य केले होते.

Follow Us
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.
शहरातही आता चुलींना मागणी वाढली, गॅस सिलिंडर टंचाईवर शोधला उपाय
शहरातही आता चुलींना मागणी वाढली, गॅस सिलिंडर टंचाईवर शोधला उपाय.
खरातवर आणखी दोन गुन्हे दाखल, एकूण गुन्ह्यांची संख्या १०, हवाला रॅकेट..
खरातवर आणखी दोन गुन्हे दाखल, एकूण गुन्ह्यांची संख्या १०, हवाला रॅकेट...
रुपाली चाकणकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार ? काय म्हणाल्या अंधारे?
रुपाली चाकणकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार ? काय म्हणाल्या अंधारे?.
'ऑल पार्टी मिटींगला जे उपस्थित नाहीत ते...', राऊत यांची मोदींवर टीका
'ऑल पार्टी मिटींगला जे उपस्थित नाहीत ते...', राऊत यांची मोदींवर टीका.
रत्नागिरीत अवकाळी पावसाचा आंब्यांना फटका, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
रत्नागिरीत अवकाळी पावसाचा आंब्यांना फटका, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान.
'कर्माचे फळ...,' चाकणकरांच्या राजीनाम्यावर दमानिया यांची प्रतिक्रीया
'कर्माचे फळ...,' चाकणकरांच्या राजीनाम्यावर दमानिया यांची प्रतिक्रीया.
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही.
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?.
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा.