AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निवडणूक संपली, आता VVPAT चिट्ठ्यांचं पुढे काय होणार?

नवी दिल्ली : यावर्षीची लोकसभा निवडणूक अनेक कारणांनी वेगळी आणि विशेष ठरली. त्यातील एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे देशभरात पहिल्यांदाच EVM सोबत वापरण्यात आलेले VVPAT मशीन. EVM मधील मतदानाची तपासणी करता यावी आणि मतदारांना आपले मत योग्य उमेदवारालाच जात आहे ना हे तपासण्याची सोय म्हणून या निवडणुकीत VVPAT मशीन वापरण्यात आले. लोकसभा निवडणूक संपली आणि आता नव्या […]

निवडणूक संपली, आता VVPAT चिट्ठ्यांचं पुढे काय होणार?
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: May 28, 2019 | 3:13 PM
Share

वी दिल्ली : यावर्षीची लोकसभा निवडणूक अनेक कारणांनी वेगळी आणि विशेष ठरली. त्यातील एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे देशभरात पहिल्यांदाच EVM सोबत वापरण्यात आलेले VVPAT मशीन. EVM मधील मतदानाची तपासणी करता यावी आणि मतदारांना आपले मत योग्य उमेदवारालाच जात आहे ना हे तपासण्याची सोय म्हणून या निवडणुकीत VVPAT मशीन वापरण्यात आले. लोकसभा निवडणूक संपली आणि आता नव्या सरकारच्या शपथविधीचा दिवसही ठरला. मग आता निवडणूक मतदानातील VVPAT चिट्ठ्यांचं पुढे काय होणार? असा प्रश्न अनेकांच्या मनात पडला असणार. या चिट्ठ्या रद्दीत जाणार की यांना सुरक्षित ठेवण्यासाठी काही विशेष उपाययोजना केली जाणार याचेही उत्तरे समजून घ्यायला अनेकांना आवडेल.

एका VVPAT मशीमध्ये जवळजवळ 1400 चिट्ठ्या असतात. केवळ दिल्लीचे उदाहरण घेतले, तर तेथे मतदानादरम्यान 13 हजार 819 VVPAT मशीन वापरण्यात आले होते. मतमोजणी आणि निकालानंतर आता या चिट्ठ्यां पुन्हा VVPAT मध्ये सील करुन ठेवण्यात आल्या आहेत. VVPAT सोबत EVM देखील सील करण्यात आले. मतमोजणी होऊन निकाल घोषित झाल्यानंतर या सर्व EVM आणि VVPAT मशीनला 45 दिवसांसाठी सुरक्षित ठेवले जाते.

VVPAT मधील चिट्ठ्यांवरील शाई उडून जाऊ नये म्हणून हे सर्व मशीन पूर्ण अंधार आहे अशाच जागी ठेवण्यात येईल. मशीन हवा आणि प्रकाश यांच्या संपर्कात येऊ नये म्हणून प्रत्येक मशीन काळ्या पॉलिथीन बॅगमध्ये सील करण्यात आले आहे.

जर कुणाला निवडणुकीबद्दल कोणताही आक्षेप असेल तर त्या व्यक्तीला निकालापासून 45 दिवसांच्या आत याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करता येते. न्यायालयाच्या आदेशानुसारच संबंधित मशीन पुन्हा तपासले जाते किंवा सुरक्षित ठेवले जाते.

जर कोणताही आक्षेप नोंदवला गेला नाही किंवा उच्च न्यायालयाकडून EVM च्या तपासणीचे कोणतेही आदेश नसतील, तर अशावेळी ही मशीन्स पुढील निवडणुकीसाठी तयार करण्याचे काम सुरु केले जाते. पुढील निवडणुकीसाठी EVM तयार करताना प्रत्येक EVM ची बॅटरी बदलली जाते. मतदानादरम्यान EVM मध्ये कोणताही फेरफार होऊ नये म्हणून ते पूर्णपणे सील केले जाते. त्यामुळे जर तिच बॅटरी वापरली तर मशीन मतदान सुरु असतानाच बंद पडण्याचा धोका असतो. म्हणून कोणत्याही नव्या निवडणुकीसाठी EVM तयार करताना सर्वात आधी त्याची बॅटरी बदलली जाते. दुसरीकडे VVPAT ची बॅटरी मतदान सुरु असतानाही बदलता येण्याची सोय उपलब्ध आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...