AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फडणवीस आणि ठाकरे सरकारच्या कर्जमाफीतील महत्त्वाचे फरक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (21 डिसेंबर) हिवाळी अधिवेशनात कर्जमाफीची घोषणा (Shivsena farmer loan waiver vs fadnavis loan waiver) केली. मात्र या दोन्ही कर्जमाफीचे निकष हे वेगवेगळे होते.

फडणवीस आणि ठाकरे सरकारच्या कर्जमाफीतील महत्त्वाचे फरक
| Updated on: Dec 22, 2019 | 11:19 PM
Share

नागपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (21 डिसेंबर) हिवाळी अधिवेशनात कर्जमाफीची घोषणा (Shivsena farmer loan waiver vs fadnavis loan waiver) केली. उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांची 2 लाखापर्यंतची कर्जमाफी केल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे. तर फडणवीस सरकारने सुद्धा ऐतिहासिक कर्जमाफी म्हणत दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी दिली होती. मात्र या दोन्ही कर्जमाफीचे निकष हे वेगवेगळे (Shivsena farmer loan waiver vs fadnavis loan waiver) होते.

पाच वर्षांपूर्वी युतीचं सरकार राज्यात असताना त्यांना शेतकऱ्यांसाठी दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी केली होती. ही कर्जमाफी करत असताना ऑनलाईन पद्धतीचा वापर करण्यात आला होता. मात्र युती तुटली. दोन्ही पक्ष वेगवेगळे झाले.

राज्यात नवीन आघाडी तयार झाली, सत्तासंघर्ष झाला आणि महाविकासआघाडीच सरकार आलं. या सरकारसमोर खरं आव्हान होत ते म्हणजे शेतकरी कर्जमाफीचं. त्यानुसार ठाकरे सरकारने पावलं उचलत 2 लाख पर्यंत ची कर्जमाफी जाहीर केली. ही कर्जमाफी जाहीर करत असताना शेतकऱ्यानं अडचणीचं ठरणारी ऑनलाईन पद्धत बंद करून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे शेतकऱ्यांचं वेळ वाया जाणार नाही. तसेच कागद पत्रांची जुळवाजुळव करावी लागणार नाही.

कागदपत्रांची जुळवाजुळव आणि ऑनलाईन पद्धत 

फडणवीस सरकारच्या कर्जमाफीच्यावेळी कागद पात्रांच्या जुळवाजुळवीमुळे आणि ऑनलाईन पद्धतीमुळे अनेक शेतकरी यापासून वंचित राहिले होते. या ठाकरे सरकारची कर्जमाफी आता जरी सुटसुटीत वाटत असली तरी यात आणखी काही निकष घातले जातात का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने झाली तर फडणवीस यांच्या कर्जमाफीपेक्षाही सरस ठरेल, असं शेतकरी नेते (Shivsena farmer loan waiver vs fadnavis loan waiver) सांगतात.

मदत सरळ शेतकऱ्यांच्या खात्यात

फडणवीस सरकारची कर्जमाफी होत असताना त्याचा गाजावाजा मोठा झाला. होर्डिंगबाजी झाली, मात्र शेतकऱ्यांपर्यंत मात्र पाहिजे तशी पोहोचलीच नाही. तर उद्धव ठाकरे सरकारने याचा मात्र गाजावाजा न करता घोषणा केली. सोबतच एकरी मदतीचा निकष न ठेवता मदत सरळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल असे सांगितले. त्यामुळे इतर शेतकऱ्यांप्रमाणे कोरडवाहू शेतकऱ्यानांही याचा फायदा होईल. कारण कोरडवाहू शेती जास्त असते. मात्र त्यात मिळणार उत्पादन कमी आणि नुकसान जास्त होते. त्यामुळे त्यांना सुद्धा याचा फायदा होईल असं शेती विषयाचे अभ्यासक सांगतात.

फडणवीस सरकार आणि ठाकरे सरकार यांनी कर्जमाफी तर केली. मात्र फडणवीसांच्या कार्यकाळातील कर्जमाफीत सुटलेले शेतकऱ्यांचा यात समावेश होणार का? ज्याने कर्ज भरलं, त्यांना सुद्धा याचा फायदा होईल का? हे सुद्धा महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज, पवारांची प्रकृती....
शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज, पवारांची प्रकृती.....
गिधाड धमक्या देऊ नका, तुम्ही संप पुकारलात तर आम्हीही रस्त्यावर उतरू...
गिधाड धमक्या देऊ नका, तुम्ही संप पुकारलात तर आम्हीही रस्त्यावर उतरू....
बीड कारागृहातून धक्कादायक माहिती, आणखी एक ऑडिओ क्लिप समोर
बीड कारागृहातून धक्कादायक माहिती, आणखी एक ऑडिओ क्लिप समोर.
गांधी हत्येचं मुनींकडून समर्थन, हर्षवर्धन सपकाळ भयंकर संतापले....
गांधी हत्येचं मुनींकडून समर्थन, हर्षवर्धन सपकाळ भयंकर संतापले.....
सदावर्ते यांच्या मराठी विरोधातील भूमिकेला मनसे कार्यकर्त्यांचा विरोध
सदावर्ते यांच्या मराठी विरोधातील भूमिकेला मनसे कार्यकर्त्यांचा विरोध.
सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत
सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत.
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड.
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान.
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा.
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.