राजीनाम्या मागचं खरं कारण कोणतं? शरद पवार यांनी दिलं एक, तर ठाकरे गटाने सांगितलं दुसरंच कारण; दैनिक ‘सामना’तील दावा काय?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केली. त्यानंतर त्यांनी आपला निर्णय मागे घेतला. त्यावर आजच्या 'सामना'च्या अग्रलेखातून भाष्य करण्यात आलं आहे. तसेच या घटना घडामोडींची कारण मिमांसाही केली आहे.

राजीनाम्या मागचं खरं कारण कोणतं? शरद पवार यांनी दिलं एक, तर ठाकरे गटाने सांगितलं दुसरंच कारण; दैनिक 'सामना'तील दावा काय?
sharad pawarImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 08, 2023 | 8:22 AM

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि नंतर तो मागे घेतला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय तणाव निवळला आहे. मात्र, शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा का दिला? याचं गूढ अजूनही उकलेलं नाही. पवारांनी राजीनामा का दिला यावर अजूनही खल सुरूच आहे. राजकारणाचा एक मोठा पल्ला पार पाडल्यानंतर कुठे तरी थांबलं पाहिजे, असं वाटल्याने आपण पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचं शरद पवार यांनी कालच सांगितलं. मात्र, दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून शरद पवार यांच्या राजीनाम्याचं भलतंच कारण सांगण्यात आलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पवार यांच्या राजीनाम्याची चर्चा रंगली आहे.

शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपच्या तंबूत न्यावा आणि आपल्या सहकाऱ्यांना ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सच्या छळातून सुटका करावी, असा राष्ट्रवादीतील एका गटाचा आग्रह होता. पण शरद पवारांनी त्याला नकार दिला. उलट पक्षाच्या प्रमुख पदावरून शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केली. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांना विजेचा झटका बसला, असं दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून म्हटलं आहे. राष्ट्रवादीचा एक गट भाजपसोबत सोयरीक जुळवण्यास उत्सुक होता म्हणूनच पवारांना राजीनाम्याचं हत्यार उपसावं लागल्याचं अग्रलेखातून सूचवण्यात आलं आहे.

हे सुद्धा वाचा

भाजपशी संधान असणारे

नवा अध्यक्ष नेमण्यासाठी शरद पवार यांनी एक कार्यकारिणी नेमली. या कार्यकारिणीत त्यांनी भाजपमध्ये जाण्याचे संधान ज्यांनी बांधले होते, त्यातील बऱ्याच जणांना घेतले. पण कार्यकर्त्यांच्या रेट्यामुळे या कार्यकारिणीतील नेत्यांनाही पवारांकडेच अध्यक्षपद सोपवावे लागल्याचं अग्रलेखात म्हटलं आहे. तिसऱ्या अंकाची घंटा वाजण्याआधीच पवारांनी नाटकाचा पडदा पाडल्याचं सूचक विधानही अग्रलेखातून करण्यात आलं आहे.

पवारांना अंदाज आला

पवारांच्या निर्णयाने सर्वांनाच हायसे वाटले. पण या निमित्ताने पक्ष कोठे आहे आणि आपल्याभोवती फिरणाऱ्यांची मने नेमकी कोठे फिरत आहेत, याचा अंदाजही पवार यांनी घेतला. राष्ट्रवादी सोडून ज्यांना जायचे त्यांनी जावे. त्यांना थांबवणार नाही, असं पवार यांनी सांगितल्याचं सांगतानाच राष्ट्रवादीतून जे जाणार होते ते आता तूर्तास थांबल्याचंही नमूद करण्यात आलं आहे.

त्यांची अवस्था कुत्र्यांपेक्षाही वाईट

शरद पवार यांच्या खेळीने भाजपचे लॉजिंग बोर्डिंग रिकामेच राहिले. कितीही मोठा सरदार असो लोकच त्याला संपवतात. शिवसेना सोडून गेले त्यांची अवस्था उकिरड्यावरील बेवारस कुत्र्यांपेक्षेही वाईट आहे. भाजपकडे नैतिकता औषधालाही शिल्लक नाही. लोकशाही मार्गाने निवडणुका जिंकण्याची भाजपची कुवत नाही. केंद्रीय संस्थाचा वापर करून ते राजकारण करत आहेत.

शरद पवार, उद्धव ठाकरे, लालूप्रसाद यादव, केसी चंद्रशेखर राव, ममता बॅनर्जी आणि स्टॅलिन हे नेते लढायला उतरले आहेत. कार्यकर्तेच लढत असतात. बॅगा भरून जे निघाले त्यांच्यावर पक्ष उभा नसतो. सर्वच पक्षातील डरपोक सरदारांनी स्वतंत्र पक्ष स्थापन करावा. म्हणजे लोकांना कळेल खरे मर्द कोण? असा सवालही त्यांनी केला आहे.

Non Stop LIVE Update
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा.
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर.
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी.
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार.
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत.
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले...
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले....
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो.
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो.
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका.
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले.