AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजीनाम्या मागचं खरं कारण कोणतं? शरद पवार यांनी दिलं एक, तर ठाकरे गटाने सांगितलं दुसरंच कारण; दैनिक ‘सामना’तील दावा काय?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केली. त्यानंतर त्यांनी आपला निर्णय मागे घेतला. त्यावर आजच्या 'सामना'च्या अग्रलेखातून भाष्य करण्यात आलं आहे. तसेच या घटना घडामोडींची कारण मिमांसाही केली आहे.

राजीनाम्या मागचं खरं कारण कोणतं? शरद पवार यांनी दिलं एक, तर ठाकरे गटाने सांगितलं दुसरंच कारण; दैनिक 'सामना'तील दावा काय?
sharad pawarImage Credit source: tv9 marathi
| Updated on: May 08, 2023 | 8:22 AM
Share

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि नंतर तो मागे घेतला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय तणाव निवळला आहे. मात्र, शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा का दिला? याचं गूढ अजूनही उकलेलं नाही. पवारांनी राजीनामा का दिला यावर अजूनही खल सुरूच आहे. राजकारणाचा एक मोठा पल्ला पार पाडल्यानंतर कुठे तरी थांबलं पाहिजे, असं वाटल्याने आपण पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचं शरद पवार यांनी कालच सांगितलं. मात्र, दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून शरद पवार यांच्या राजीनाम्याचं भलतंच कारण सांगण्यात आलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पवार यांच्या राजीनाम्याची चर्चा रंगली आहे.

शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपच्या तंबूत न्यावा आणि आपल्या सहकाऱ्यांना ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सच्या छळातून सुटका करावी, असा राष्ट्रवादीतील एका गटाचा आग्रह होता. पण शरद पवारांनी त्याला नकार दिला. उलट पक्षाच्या प्रमुख पदावरून शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केली. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांना विजेचा झटका बसला, असं दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून म्हटलं आहे. राष्ट्रवादीचा एक गट भाजपसोबत सोयरीक जुळवण्यास उत्सुक होता म्हणूनच पवारांना राजीनाम्याचं हत्यार उपसावं लागल्याचं अग्रलेखातून सूचवण्यात आलं आहे.

भाजपशी संधान असणारे

नवा अध्यक्ष नेमण्यासाठी शरद पवार यांनी एक कार्यकारिणी नेमली. या कार्यकारिणीत त्यांनी भाजपमध्ये जाण्याचे संधान ज्यांनी बांधले होते, त्यातील बऱ्याच जणांना घेतले. पण कार्यकर्त्यांच्या रेट्यामुळे या कार्यकारिणीतील नेत्यांनाही पवारांकडेच अध्यक्षपद सोपवावे लागल्याचं अग्रलेखात म्हटलं आहे. तिसऱ्या अंकाची घंटा वाजण्याआधीच पवारांनी नाटकाचा पडदा पाडल्याचं सूचक विधानही अग्रलेखातून करण्यात आलं आहे.

पवारांना अंदाज आला

पवारांच्या निर्णयाने सर्वांनाच हायसे वाटले. पण या निमित्ताने पक्ष कोठे आहे आणि आपल्याभोवती फिरणाऱ्यांची मने नेमकी कोठे फिरत आहेत, याचा अंदाजही पवार यांनी घेतला. राष्ट्रवादी सोडून ज्यांना जायचे त्यांनी जावे. त्यांना थांबवणार नाही, असं पवार यांनी सांगितल्याचं सांगतानाच राष्ट्रवादीतून जे जाणार होते ते आता तूर्तास थांबल्याचंही नमूद करण्यात आलं आहे.

त्यांची अवस्था कुत्र्यांपेक्षाही वाईट

शरद पवार यांच्या खेळीने भाजपचे लॉजिंग बोर्डिंग रिकामेच राहिले. कितीही मोठा सरदार असो लोकच त्याला संपवतात. शिवसेना सोडून गेले त्यांची अवस्था उकिरड्यावरील बेवारस कुत्र्यांपेक्षेही वाईट आहे. भाजपकडे नैतिकता औषधालाही शिल्लक नाही. लोकशाही मार्गाने निवडणुका जिंकण्याची भाजपची कुवत नाही. केंद्रीय संस्थाचा वापर करून ते राजकारण करत आहेत.

शरद पवार, उद्धव ठाकरे, लालूप्रसाद यादव, केसी चंद्रशेखर राव, ममता बॅनर्जी आणि स्टॅलिन हे नेते लढायला उतरले आहेत. कार्यकर्तेच लढत असतात. बॅगा भरून जे निघाले त्यांच्यावर पक्ष उभा नसतो. सर्वच पक्षातील डरपोक सरदारांनी स्वतंत्र पक्ष स्थापन करावा. म्हणजे लोकांना कळेल खरे मर्द कोण? असा सवालही त्यांनी केला आहे.

Follow Us
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...
राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार? पुण्यातील गुप्त बैठकीत नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार? पुण्यातील गुप्त बैठकीत नेमकं काय घडलं?.