AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bachhu Kadu : मंत्री पदाविषयी छेडले असता, बच्चू कडू यांचा खुलला चेहरा, लपवाछपवी नाहीच, त्यांनी थेटच सांगून टाकलं की..

Bachhu Kadu : मंत्रीपदाविषयीच्या अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्या भावना काही लपून राहिलेल्या नाहीत..

Bachhu Kadu : मंत्री पदाविषयी छेडले असता, बच्चू कडू यांचा खुलला चेहरा, लपवाछपवी नाहीच, त्यांनी थेटच सांगून टाकलं की..
बच्चू कडूImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Dec 03, 2022 | 8:30 PM
Share

मुंबई : मंत्रीपदाविषयीच्या अपक्ष आमदार बच्चू कडू (MLA Bachhu Kadu) यांच्या भावना कधी लपून राहिलेल्या नाहीत. त्यांनी यापूर्वी ही याविषयीची जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्याशी त्यांचे वाद झाल्यानंतर त्यांनी प्रहार केला. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी केल्यानंतर हे प्रकरण कसेबसे मिटले. परंतु, मंत्रीपदाची (Minister) माळ बच्चू कडूंच्या गळ्यात अजून पडलेली नाही. माध्यमांशी आज बोलताना त्यांना याविषयी छेडले असता, त्यांचा चेहरा खुलला. दिव्यांग मंत्रालयाचं मंत्रीपद मिळाले तर आनंद होईल. तळागाळापर्यंत मंत्री म्हणून नाहीतर सेवक म्हणून काम करेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करुन राज्यात सत्ता स्थापन केली. त्यावेळी त्यांच्यासोबत अपक्ष आमदारांनीही मोट बांधली होती. त्यात अमरावती जिल्ह्यातील अपक्ष आमदार बच्चू कडू यांचा मोठा पुढाकार होता.

बच्चू कडू यांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडेल असे बोलल्या जात होते. पण सत्ता स्थापनेपासून मंत्रीपदाने त्यांना हुलकावणी दिली. मंत्रीमंडळ विस्तारातही त्यांना ही संधी मिळाली नाही. त्यानंतर त्यांनी त्यांचा पक्ष लहान असल्याचा दावा करत जाहीर नाराजी व्यक्त केली होती.

दरम्यान रवी राणा यांच्याशी झालेल्या वादानंतर अमरावती येथे झालेल्या सभेत कडूंनी त्यांची शक्ती दाखवून दिली. राणा आणि कडू यांच्यात समेट घडवून आणण्यात आली. कडूंच्या मतदारसंघातील विकास कामासाठी निधी देण्यात आला. अचलपूर मतदार संघातील सपन प्रकल्पाला 495.29 कोटींची सुधारीत मान्यता देण्यात आली.

पण हे रिटर्न गिफ्ट येथेच संपले नाही. राज्य सरकारने कडू यांच्या आग्रही मान्यतेनंतर देशात पहिल्यांदाच राज्यात दिव्यांग मंत्रालयाची स्थापना केली. अवघ्या 24 दिवसांत मुख्यमंत्र्यांनी या मंत्रालयाला मंजूरी दिल्याचे कडू यांनी सांगितले. 1995 पासून यासाठी लढा सुरु असल्याचे ते म्हणाले.

सध्या मंत्रालयासाठी प्राथमिक टप्प्यात 1100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पण आकडा लवकरच 10 ते 15 हजार कोटी रुपयांवर पोहचले असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सर्वच दिव्यांगाची सेवा या मंत्रालयाच्या मार्फत करण्याची भावना त्यांनी व्यक्त केली.  या मंत्रालयामुळे खोक्यांना ओक्के उत्तर मिळाल्याचे ते म्हणाले.

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...