AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्न कधी होणार? कंगना राणौतचे नाव घेताच केंद्रीय मंत्री चक्क लाजले…

केंद्रीय मंत्री चिराग पासवान हे राजकारणात येण्यापूर्वी यांनी चित्रपट सृष्टीत काम केले होते. त्यांची मुख्य भूमिका असलेला 'मिले ना मिले हम' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. याच चिराग पासवान यांना लग्नाबद्दल विचारण्यात आले तेव्हा ते चक्क लाजले.

लग्न कधी होणार? कंगना राणौतचे नाव घेताच केंद्रीय मंत्री चक्क लाजले...
chirag paswan and kanganaImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Jul 25, 2024 | 6:09 PM

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर देशाचे सर्वात तरुण केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी समाधान व्यक्त केले. देशात अनेक तरुण आहेत जे बॅचलर आहेत. त्यांच्या भविष्याची सरकारला काळजी आहे. सरकारने आपल्या तरुणांच्या रोजगारासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. मोठ्या संख्येने तरुणांना रोजगार देण्याचा विचार सरकार करत आहे याचा मला आनंद आहे असे ते म्हणाले. याचवेळी चिराग पासवान यांना त्यांच्या लग्नाबद्दल विचारण्यात आले त्यावेळी ते लाजून हसले.

चिराग पासवान यांना विचारण्यात आले की, तुमचा एक चित्रपट ‘मिले ना मिले हम’ रिलीज झाला होता. त्याचवेळी तुम्ही संसदेत आलात. चित्रपटामधील तुमची नायिका यादेखील आता मंडीच्या खासदार आहेत. संसदेत येताना तुमच्या आणि मंडीच्या खासदार कंगना राणौत यांची भेट झाली. त्या फोटोंची बरीच चर्चा आहे. तुमची भावना त्यावेळी काय होती? चिराग पासवान लग्न कधी करणार? असे प्रश्न विचारण्यात आले. हा प्रश्न ऐकून चिराग पासवान लाजले.

चिराग पासवान यांनी या प्रश्नाचे थेट उत्तर देणे टाळले, ते म्हणाले, ‘या सर्व प्रश्नांची उत्तरे यावेळी कोणी देऊ शकेल का? आता माझ्या मनात फक्त राजकारण चालते बाकी काही येत नाही. हो त्यावेळी मी त्यांना भेटलो. निवडणूक प्रचारादरम्यानही त्यांना भेटण्यासाठी मी उत्सुक होतो. चित्रपटानंतर आमची फारशी भेट झाली नाही. गेली तीन वर्षे इतक्या चढउतारांनी भरलेली होती की या काळात आमच्यात बोलणेही झाले नाही. खूप दिवसांनी त्यांची भेट झाली आणि खूप छान वाटले असे त्यांनी सांगितले.

कंगना रनौत आणि चिराग पासवान यांनी मिले ना मिले हम या चित्रपटात एकत्र काम केले होते. हा चित्रपट पूर्णपणे फ्लॉप ठरला. चिरागचा हा पहिला आणि शेवटचा चित्रपट ठरला. याची आठवण करून देत ते म्हणाले, मी फक्त नेता होऊ शकलो मात्र अभिनेता कधीच होऊ शकत नाही.

लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण
लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण.
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली.
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना.
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग.
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!.
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ.
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती.
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?.
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार.
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर.