AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astrology : पत्रिकेत दूर्बल सूर्यामुळे नोकरीत करावा लागतो समस्यांचा सामना, या प्रभावी उपायांनी मिळतो लाभ

सूर्य दूर्बल असेल तर वडिलांशी संबंध मधूर नसतात. नोकरीतून निलंबित होणे किंवा खोटे आरोप लागणे, अपमान होणे इत्यादी समस्या निर्माण होतात. जोतिषशास्त्रात असे अने उपाय आहेत..

Astrology : पत्रिकेत दूर्बल सूर्यामुळे नोकरीत करावा लागतो समस्यांचा सामना, या प्रभावी उपायांनी मिळतो लाभ
पत्रिकेत सूर्यImage Credit source: Social Media
| Updated on: Jun 10, 2023 | 4:50 PM
Share

मुंबई : सूर्य बलवान (Sun In Kundali) असेल तर मान-सन्मान, सुख-समृद्धी मिळते, वडिलांचा सहवास व सहकार्य लाभते. सूर्य दूर्बल असेल तर वडिलांशी संबंध मधूर नसतात. नोकरीतून निलंबित होणे किंवा खोटे आरोप लागणे, अपमान होणे इत्यादी समस्या निर्माण होतात. जोतिषशास्त्रात असे अने उपाय आहेत ज्यामुळे ग्रहांचा राजा सूर्याला पत्रिकेत बळकट करता येते. सूर्याची उर्जा लाभल्याने व्यक्तीची धनहानी टळते या शिवाय अनेक अर्थार्जनाचे मार्ग खुले होतात. जाणून घेऊयी सूर्याला बलवान करण्यासाठी कोणते ऊपाय करावे तसेच पत्रिकेत सूर्य जर दूर्बल असेल तर कसे अनुभव येतात.

पत्रिकेत सूर्य दूर्बल असल्यास येतात असे अनुभव

गुरू आणि वडीलांचा साथ लाभत नाही. खोटे आळ येतात. शिक्षणात अडथळे येतात. नोकरीत अपमान सहन करावा लागतो. सोन्याची चोरी होते. ह्रदयाशी संबंधीत त्रास जाणवतो.

पत्रिकेतील सूर्य ग्रह बलवान करण्याचे उपाय

  1. ज्योतिषशास्त्रानुसार रविवारी ब्रह्म मुहूर्तावर सर्वप्रथम उठून स्नान करावे. यानंतर एका तांब्याच्या गडव्यात पाणी घेऊन त्यात काही अक्षत, फुले आणि दुर्वा टाकून त्या पाण्याने सूर्याला अर्घ्य द्यावे.  असे रोज केल्याने सूर्य ग्रहाशी संबंधित दोष कमी होतात.
  2. ज्योतिष शास्त्रानुसार पत्रिकेतील सूर्याशी संबंधित दोष दूर करण्यासाठी रत्न धारण करणे देखील फायदेशीर मानले जाते. जर तुमच्या पत्रिकेत सूर्य कमजोर असेल तर माणीक रत्न धारण करणे शुभ मानले जाते. कोणत्याही ज्योतिषाच्या सल्ल्याशिवाय रत्ने घालू नये याची विशेष काळजी घ्या.
  3. धार्मिक मान्यतेनुसार पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने सूर्याशी संबंधित दोषही दूर होतात. रविवारी सूर्यास्तानंतर पिंपळाच्या झाडाजवळ तेलाचा दिवा लावणे शुभ मानले जाते. असे केल्याने ग्रह दोष दूर होतात.
  4. ज्यांच्या कुंडलीत सूर्य ग्रहाशी संबंधित दोष आहेत त्यांनी रविवारी व्रत ठेवावे. तसेच रविवारी मीठाचे सेवन करू नये.
  5. ग्रह दोष दूर करण्यासाठी दान आणि दक्षिणा देखील लाभदायक मानली जाते. रविवारी एखाद्या गरजू व्यक्तीला गूळ, सोने, कपडे, गहू इत्यादी वस्तू दान करा.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

रोहित पवारांच्या आरोपांवर प्रफुल पटेलांकडून खुलासा
रोहित पवारांच्या आरोपांवर प्रफुल पटेलांकडून खुलासा.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलिनीकरणावर संभ्रम
शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलिनीकरणावर संभ्रम.
रोहित पवार यांच्या नव्या ट्विटने खळबळ, तो संदर्भ देत म्हणाले...
रोहित पवार यांच्या नव्या ट्विटने खळबळ, तो संदर्भ देत म्हणाले....
उचलली जीभ, लावली दाढीला, असं करू नका! राऊतांचा शिंदेंना खोचक सल्ला
उचलली जीभ, लावली दाढीला, असं करू नका! राऊतांचा शिंदेंना खोचक सल्ला.
सुनेत्रा पवार यांच्या बैठकांचं सत्र; विजयी उमेदवारांना भेटणार
सुनेत्रा पवार यांच्या बैठकांचं सत्र; विजयी उमेदवारांना भेटणार.
अजित पवार यांचं स्वप्न पूर्ण करायचयं! सुनेत्रा पवार यांना अश्रू अनावर
अजित पवार यांचं स्वप्न पूर्ण करायचयं! सुनेत्रा पवार यांना अश्रू अनावर.
कोश्यारींच्या विधानाने नवा राजकीय वाद; राऊतांचा जोरदार पलटवार
कोश्यारींच्या विधानाने नवा राजकीय वाद; राऊतांचा जोरदार पलटवार.
राज्यपाल कोट्यातील रिक्त जागा लवकरच भरणार?
राज्यपाल कोट्यातील रिक्त जागा लवकरच भरणार?.
विलीनीकरण हीच दादांना खरी श्रद्धांजली! शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया
विलीनीकरण हीच दादांना खरी श्रद्धांजली! शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया.
कामं नाही केलीत तर बघतोच; गणेश नाईक पालिका अधिकाऱ्यांवर संतापले
कामं नाही केलीत तर बघतोच; गणेश नाईक पालिका अधिकाऱ्यांवर संतापले.