AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astrology: नोकरी-व्यवसायात थांबली असेल प्रगती, तर या रत्नाने चमकेल नशीब

बऱ्याचदा नोकरी किंवा व्यवसायात कितीही मेहनत केली तरी प्रगती होत नाही. तुम्ही देखील या समस्यांचा सामना करीत आहेत का?

Astrology: नोकरी-व्यवसायात थांबली असेल प्रगती, तर या रत्नाने चमकेल नशीब
पन्ना Image Credit source: Social Media
| Updated on: Sep 21, 2022 | 6:53 PM
Share

मुंबई,  रत्नशास्त्रानुसार प्रत्येक रत्न (Gemstone) हा कोणत्या ना कोणत्या ग्रहाचा (Planet) मालक असतो. या रत्नांमध्ये ग्रहांची स्थिती आणि दिशा बदलण्याची क्षमता आहे. राशीनुसार (Horoscope) रत्न धारण केल्याने त्याचे शुभ परिणाम मिळतात. ज्योतिषशास्त्रानुसार (Astrology), पन्ना हे बुध ग्रहाचे रत्न मानले जाते, जो वाणी, बुद्धिमत्ता आणि व्यवसायाचा कारक ग्रह आहे. पन्ना रत्न समस्यांवर मात करण्यासाठी, आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी आणि जीवन आनंदी आणि यशस्वी करण्यासाठी उपयुक्त मानले जाते. चला जाणून घेऊया पन्ना धारण केल्याने कोणते फायदे होतात आणि ते कोणी परिधान करावे.

भाग्य बदलणारा रत्न

रत्न शास्त्रामध्ये पन्नाला खूप शक्तिशाली मानले जाते. पन्ना धारण केल्याने कुंडलीत बुधाची स्थिती मजबूत होते. पन्ना बुद्धिमत्ता, तर्कशास्त्र, संवाद आणि संपत्ती वाढवते. कुंडलीत बुधाची अंतरदशा किंवा महादशा चालू असेल तर पन्ना धारण करणे खूप फायदेशीर आहे. बुध ग्रह व्यवसायाचा करक ग्रह मानला जातो. त्यामुळे व्यावसायिकांना त्याचा विशेष फायदा होतो. पन्ना योग्य निर्णय घेण्यास मदत करतात. व्यापारी पाचू घालताच व्यवसायात जोरदार नफा कमवू लागतात. तथापि, पन्ना नेहमी रत्न तज्ञांच्या सल्ल्यानेच परिधान करावा.

या लोकांना लाभदायक

ज्योतिषशास्त्रानुसार कन्या किंवा मिथुन राशीचे लोक पन्ना रत्न घालू शकतात. जर कुंडलीत बुधाची महादशा असेल आणि बुध ग्रह 8 व्या किंवा 12 व्या भावात नसेल तर ती व्यक्ती पन्ना धारण करू शकते. कुंडलीत बुध, मंगळ, शनि, राहू किंवा केतू असला तरीही पन्ना रत्न धारण करता येतो. त्यामुळे नोकरी-व्यवसायात येणाऱ्या अडचणी दूर होतात. ज्योतिषशास्त्रानुसार ज्या व्यक्तीच्या कुंडलीत 6 व्या, 8 व्या आणि 12 व्या घरात बुध आहे, त्यांनी पन्ना घालणे टाळावे.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.