AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astrology : सुगंधाने दूर होतील नव ग्रहांचे दोष, कोणत्या ग्रहासाठी कोणता सुगंध आहे प्रभावी?

ग्रहांच्या शांतीसाठी (Astrology) शास्त्रात अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. कोणी रत्ने घालतात तर कोणी माळा घालतात. जर तुमच्या जीवनात ग्रहांमुळे अनेक समस्या येत असतील तर त्या शांत करण्यासाठी तुम्ही..

Astrology : सुगंधाने दूर होतील नव ग्रहांचे दोष, कोणत्या ग्रहासाठी कोणता सुगंध आहे प्रभावी?
ग्रहदोषImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: May 27, 2023 | 4:23 PM
Share

मुंबई : हिंदू धर्मात नऊ ग्रहांच्या पूजेला विशेष महत्त्व दिले गेले आहे. ग्रहांचा मानवी जीवनावर खोलवर प्रभाव पडतो. कुंडलीतील ग्रहांच्या स्थितीनुसार आपल्याला शुभ आणि अशुभ फळ मिळतात. ग्रहांच्या शांतीसाठी (Astrology) शास्त्रात अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. कोणी रत्ने घालतात तर कोणी माळा घालतात. जर तुमच्या जीवनात ग्रहांमुळे अनेक समस्या येत असतील तर त्या शांत करण्यासाठी तुम्ही सुगंधाचा वापर करू शकता. चला जाणून घेऊया की ग्रहांच्या आवडीनुसार कोणता परफ्यूम किंवा सुगंध वापरणे त्यांना अनुकूल ठेवण्यास मदत करते.

सूर्य

पत्रिकेत सूर्याचा अशुभ प्रभाव दिसत असेल तर केशर किंवा गुलाबाचा सुगंध वापरावा. लक्षात ठेवा की केवळ नैसर्गिक आणि फुलांचा सुगंध वापरा.

चंद्र

चंद्र हा मनाचा कारक मानला जातो. पत्रिकेत चंद्र ग्रह कमजोर असेल तर त्या व्यक्तीच्या शरीरात पाण्याशी संबंधित आजार होतात. अशा स्थितीत चंद्राची शुभ प्राप्ती करण्यासाठी चमेली आणि रात राणीचा अत्तर लावू शकता.

मंगळ

मंगळ हा अग्नि, धैर्य आणि उर्जेचा सूचक मानला जातो. ग्रहांचा सेनापती मंगल देव अनुकूल ठेवायचा असेल तर लाल चंदनाचा सुगंध वापरावा. ते तुम्ही तेल, परफ्यूम सारखे वापरू शकता.

बुध

वेलची आणि चंपा यांचा सुगंध बुधाला प्रिय आहे. त्यांचे परफ्यूम किंवा तेल वापरणे हे बुध ग्रहाच्या दृष्टीकोनातून सर्वोत्तम मानले जाते. अंगावर परफ्यूम लावायचे असेल तर ते फक्त नाभी, मनगट आणि मानेच्या मागे लावावे.

गुरू

देव गुरू मानल्या जाणाऱ्या गुरु ग्रहाची शांती केवडा किंवा केशराचा सुगंध वापरून करता येते. पिवळ्या फुलांच्या सुगंधाने गुरू ग्रहाची शुभताही कळू शकते.

शुक्र

शुक्राच्या अशुभ प्रभावामुळे वैवाहिक जीवनात अडचणी येऊ लागतात. शुक्र ग्रहाला शांत करण्यासाठी पांढरी सुगंधी फुले, पांढरे चंदन आणि कापूर सुगंधाचा वापर फायदेशीर ठरतो.

शनि

शनिदोष कमी करण्यासाठी कस्तुरी आणि लोबानचा सुगंध वापरणे चांगले. शनिदेवाचा अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी एका बडीशेपचा सुगंध घरीही वापरता येतो.

राहू-केतू

राहू केतू ग्रहाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी गाईचे तूप आणि कस्तुरीचा अत्तर वापरा. राहू-केतूची शुभफळ मिळवण्यासाठी गुळ आणि तुपाची धुणीही घरात देऊ शकता.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार: एकाच दिवशी दोन मोठे धक्के
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती: सीएम फडणवीस
गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला
अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला; नवोदित अभिनेत्री ठरली निमित्त
अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
महाराष्ट्रातील ग्रामीण शाळांच्या अवस्थेवर अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
मनोज जरांगे पाटील यांनी बोलावली आरक्षण अभ्यासकांची महत्त्वाची बैठक
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची उद्या आरक्षण अभ्यासकांसोबत बैठक
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ