AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Budh Gochar: 7 फेब्रुवारीला होणार बुधाचे मकर राशीत संक्रमण, काय होणार प्रभाव?

जेव्हा बुध ग्रह मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याचा सर्व राशींवर परिणाम होतो. मकर राशीचे लोकं मेहनती आणि अत्यंत व्यावहारिक असतात. या राशीचा स्वामी शनि आहे. शनि आणि बुध हे मित्र आहेत त्यामुळे ते एकमेकांना मदत करतात.

Budh Gochar: 7 फेब्रुवारीला होणार बुधाचे मकर राशीत संक्रमण, काय होणार प्रभाव?
बुध गोचरImage Credit source: Social Media
| Updated on: Feb 04, 2023 | 3:43 PM
Share

मुंबई, वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार (Astrology), बुध हा ग्रहाचा राजकुमार मानला जातो आणि तो बुद्धिमत्ता व संवाद क्षमता दर्शवणारा ग्रह देखील मानला जातो. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत बुध ग्रह कमजोर असेल तर ती व्यक्ती आपल्या बुद्धीचा योग्य वापर करू शकत नाही. जेव्हा बुध निच असतो तेव्हा त्या व्यक्तीच्या बोलण्यात प्रभाव जाणवत नाही. बुध ग्रह 07 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 7.11 वाजता मकर राशीत प्रवेश करेल. (Budh Gochar)

बुध ग्रहाच्या राशी बदलाचा प्रभाव

जेव्हा बुध ग्रह मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याचा सर्व राशींवर परिणाम होतो. मकर राशीचे लोकं मेहनती आणि अत्यंत व्यावहारिक असतात. या राशीचा स्वामी शनि आहे. शनि आणि बुध हे मित्र आहेत त्यामुळे ते एकमेकांना मदत करतात. बुध सामान्यतः  बँकिंग, मोबाईल, नेटवर्किंग, संगणक आणि व्यवसाय इत्यादींशी संबंधित क्षेत्रांचे प्रतिनिधित्व करतो. कुंडलीत बुध ग्रह बलवान असेल तर व्यक्तीला या सर्व क्षेत्रात यश मिळते. जर मूळ व्यक्ती लेखक, ज्योतिषी, वृत्तपत्रकार, मीडिया प्रोफेशनल, गणितज्ञ, चार्टर्ड अकाउंटंट, वकील, विक्रेता, चित्रकार, शिल्पकार इत्यादी क्षेत्रात कार्यरत असेल तर त्याला चांगले यश मिळते.

या राशीच्या लोकांवर होणार प्रभाव

मिथुन- राशीतून आठव्या भावात प्रवेश करत असताना, बुधाचा प्रभाव थोड्या काळासाठी आरोग्यावर प्रतिकूल परिणाम करेल. कामाच्या ठिकाणी षड्यंत्राचे बळी होण्याचे टाळा. न्यायालयीन प्रकरणे बाहेरून निकाली काढणे शहाणपणाचे ठरेल. तुमचेच लोक तुमचा अपमान करण्याचा प्रयत्न करतील, सावध राहा.

कर्क- बुधचे संक्रमण अचानक सुखद अनुभव देईल. वैवाहिक जीवनाशी संबंधित चर्चा यशस्वी होतील. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. तुम्ही कोणत्याही प्रकारच्या निवडणुकीचा विचार करत असाल तर त्या दृष्टीनेही ग्रह अनुकूल राहील. सासरच्या मंडळींकडूनही सहकार्य मिळण्याची शक्यता. जरी तुम्ही संयुक्त व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर त्याचा परिणाम आनंददायी असेल. शासकीय विभागांची प्रलंबीत कामे पूर्ण होतील.

वृश्चिक- पराक्रमाच्या तिसऱ्या घरात प्रवेश केल्याने तुमच्या स्वभावात सौम्यता येईल. तुमच्या उर्जा आणि अदम्य धैर्याच्या बळावर तुम्ही कठीण प्रसंगांवर सहज नियंत्रण ठेवू शकाल. तुमचे निर्णय आणि घेतलेल्या कृतींचे कौतुक केले जाईल. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य आणि लहान भाऊ यांच्याशी मतभेद वाढू देऊ नका. जर तुम्हाला परदेशात प्रवास करायचा असेल किंवा कोणत्याही देशात व्हिसासाठी अर्ज करायचा असेल तर त्या दृष्टिकोनातून ग्रहांचे संक्रमण अधिक आनंददायी परिणाम देईल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?.
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह..
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह...
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी.
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला.
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?.
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?.
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप.
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?.
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले.
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा.