AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रत्येक रत्नाचा असतो विशिष्ट ग्रहाशी संबंध, राशीनुसार अशा प्रकारे करा धारण

ज्योतिषशास्त्रात मुख्य 9 रत्नांबद्दल (Gemstone Benefits) सांगितले आहे. ते पुढीलप्रमाणे आहेत रुबी, मोती, पन्ना, मुंगा, पुष्कराज, हिरा, नीलम, गोमेद, लहसुनीया.

प्रत्येक रत्नाचा असतो विशिष्ट ग्रहाशी संबंध, राशीनुसार अशा प्रकारे करा धारण
रत्न धारण करण्याचे फायदेImage Credit source: Social Media
| Updated on: Jun 08, 2023 | 12:03 PM
Share

मुंबई : जोतिषशास्त्रानुसार 9 प्रमुख ग्रह व्यक्तीच्या जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव पाडतात. म्हणूनच ज्यो तिषशास्त्रात ग्रहांचे नकारात्मक प्रभाव कमी करण्यासाठी रत्ने घालण्याचा सल्ला दिला जातो. ज्योतिषशास्त्रात मुख्य 9 रत्नांबद्दल (Gemstone Benefits) सांगितले आहे. ते पुढीलप्रमाणे आहेत रुबी, मोती, पन्ना, मुंगा, पुष्कराज, हिरा, नीलम, गोमेद, लहसुनीया. चला जाणून घेऊया कोणत्या व्यक्तीने कोणते रत्न परिधान करावे.

पन्नाला कोणी घालावा?

ज्योतिषशास्त्रानुसार, पन्ना बुध ग्रहाशी संबंधित आहे. वृषभ, मिथुन, कन्या, तूळ, मकर आणि कुंभ राशीसाठी पाचू धारण करणे शुभ आहे. सिंह, धनु आणि मीन राशीच्या लोकांच्या कुंडलीनुसार, हा रत्न काही विशिष्ट परिस्थितीत परिधान केला जाऊ शकतो. तथापि, मेष, कर्क आणि वृश्चिक राशीच्या लोकांनी चुकूनही पन्ना घालू नये. विद्यार्थी आणि व्यावसायिकांसाठी हे विशेष शुभ आहे.

कोणत्या राशीसाठी आहे पुष्कराज

पुष्कराज रत्न गुरू ग्रहाशी संबंधित आहे. मेष, वृषभ, सिंह, धनु आणि मीन राशीच्या लोकांनी पुष्कराज घालावे, ते त्यांच्यासाठी फायदेशीर आहे. ज्या राशींसाठी पुष्कराज शुभ आहे, त्यांची खूप प्रगती होते. दुसरीकडे, वृषभ, तूळ, मकर आणि कुंभ राशीच्या राशीच्या लोकांनी ते परिधान करणे टाळावे.

यांच्यासाठी आहे हिरा फायदेशीर

हिरा वृषभ आणि तूळ राशीचा स्वामी आहे. शुक्र ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी ते परिधान केले जाते. हिरा घालणे ही आजकाल फॅशन म्हणून पाहिले जाते. पण मेष, कर्क, वृश्चिक, सिंह आणि मीन राशीच्या लोकांनी हिरा घालू नये. तर वृषभ, मिथुन, कन्या, तूळ, मकर आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी ते शुभ आहे.

अशा असतो नीलम रत्नाचा प्रभाव

नीलम रत्न अतिशय काळजीपूर्वक आणि ज्योतिषाच्या सल्ल्यानुसार परिधान केला पाहिजे, कारण अनेक परिस्थितींमध्ये त्याचे परिणाम विपरीत असू शकतात. त्यामुळे व्यक्तीला गरिबीचा सामना करावा लागतो. ज्यांच्या कुंडलीत शनि कमकुवत स्थितीत आहे अशा लोकांनीच हे रत्न धारण करावे. विशेषतः सिंह राशीने नीलम रत्न घालू नये.

या राशीच्या लोकांना घालावा गोमेद

गोमेद हे राहूचे रत्न मानले जाते. ज्यांची राशी किंवा लग्न घर वृषभ, मिथुन, कन्या, तूळ आणि कुंभ आहे त्यांनाच हे रत्न घालण्याचा सल्ला दिला जातो. हे मुख्यतः राजकारणी, हेर, जुगारी, सट्टेबाज आणि तंत्र किंवा मंत्र विद्याशी संबंधित लोक परिधान करतात.

रुबी कोणत्या राशीसाठी निषिद्ध आहे

रुबी हा सूर्य ग्रहाशी संबंधित मानला जातो, त्यामुळे सूर्याशी संबंधित समस्यांसाठी हे रत्न धारण करावे. ज्योतिष शास्त्रानुसार ज्यांची राशी सिंह, मेष, वृश्चिक, कर्क आणि धनु आहे त्यांच्यासाठी माणिक रत्न धारण करणे शुभ असते. कन्या, तूळ, मकर आणि कुंभ राशीच्या लोकांनी माणिक परिधान करू नये.

मोती परिधान करण्याचे फायदे

मोती हे चंद्राचे रत्न आहे. हे धारण केल्याने मानसीक समस्या दूर होतात. पण वृषभ, मिथुन, कन्या आणि मकर राशीच्या लोकांनी ज्योतिषाच्या सल्ल्याशिवाय मोती घालू नये. तथापि, मेष, कर्क, वृश्चिक आणि मीन राशीसाठी मोती धारण करणे खूप फायदेशीर आहे.

प्रवाळ कोणत्या ग्रहाशी संबंधित आहे?

मंगळाचे रत्न प्रवाळ लाल किंवा नारिंगी रंगाचे आहे. मंगळ हा मेष राशीचा स्वामी आहे. अशा स्थितीत या राशीचे लोकं प्रवाळ धारण करू शकतात. यासोबतच वृश्चिक राशीचे लोकं देखील हा रत्न धारण करू शकतात, परंतु कन्या आणि मिथुन राशीच्या लोकांनी हा रत्न घालणे टाळावे.

या राशीच्या लोकांनी धारण करावा लहसुनीया

लहसुनीया हे केतूचे रत्न आहे. कुंडलीत केतू अनुकूल असेल तरच परिधान करावा. ज्योतिष शास्त्रानुसार वृषभ, मकर, तूळ, कुंभ आणि मिथुन राशीच्या लोकांसाठी लहसुनीया रत्न धारण करणे शुभ असते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.