AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Surya Grahan 2021: वर्षातील अंतिम ग्रहणामुळे या 4 राशींच्या व्यक्तींना मिळणार छप्परफाड संपत्ती, तुमची रास यामध्ये आहे का ?

वर्षातील अंतिम ग्रहणामुळे या 4 राशींच्या व्यक्तींना मिळणार छप्परफाड संपत्ती, तुमची रास यामध्ये आहे का ?

Surya Grahan 2021: वर्षातील अंतिम ग्रहणामुळे या 4 राशींच्या व्यक्तींना मिळणार छप्परफाड संपत्ती, तुमची रास यामध्ये आहे का ?
Zodiac and Eclipse
| Edited By: | Updated on: Dec 03, 2021 | 1:09 PM
Share

मुंबई : शनिवार, ४ डिसेंबर रोजी या वर्षाचे शेवटचे सूर्यग्रहण होणार आहे. हे ग्रहण सकाळी १०:५९ ते दुपारी ३:०७ पर्यंत राहील. हे ग्रहण भारतात कुठेही, कुठूनही दिसणार नाही. त्यामुळे भारतातील या सूर्यग्रहणात जोतिषशास्त्रात मानले जाणारे सुतक देखील पाळले जाणार नाही. हे सूर्यग्रहण ऑस्ट्रेलिया, नामिबिया, दक्षिण आफ्रिका, जॉर्जिया, मेडागास्कर, मॉरिशस, बोत्सवाना, तस्मानियासह इतर काही देशांमध्ये पाहता येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु, भारतातून  दिसणार नाही.

भारतात बहूतेक वेळा ग्रहण अशुभ मानले जाते. हा शब्द ऐकताच अनेकांच्या मनात नकारात्मक विचार येऊ लागतात. ज्योतिषांचे म्हणणे आहे की हे सूर्यग्रहण भारतात कोठेही दिसणार नाही पण याचा प्रभाव सर्व 12 राशींवर त्याचा प्रभाव पडेल. ज्योतिषांच्या मते, हे सूर्यग्रहण चार राशीच्या लोकांसाठी खूप शुभ सिद्ध होऊ शकते त्यांच्याकडे धन दौलत मोठ्या प्रमाणात येऊ शकते. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या राशी.

मिथुन (Mithun Rashi) मिथुन राशीच्या लोकांसाठी हे सूर्यग्रहण खूप शुभ मानले जाते. सूर्यग्रहणामुळे मिथुन राशीच्या लोकांच्या जीवनातील संघर्ष संपून जाईल. जर तुम्ही बर्‍याच दिवसांपासून नोकरीच्या शोधात असाल, तर तुमची प्रतीक्षा संपू शकते. यामुळे तुम्हाला नोकरी मिळण्यास मदत होईल.सर्वच कामे योग्य पद्धतीने झाल्याने तुमचा आत्मविश्वास ही वाढेल.

कन्या (Kanya Rashi) कन्या राशीच्या लोकांसाठी हे सूर्यग्रहण खूप शुभ मानले जाते. हे सूर्यग्रहण कन्या राशीच्या लोकांना प्रोत्साहन देईल आणि त्यांचे धैर्य देखील वाढेल. कन्या राशीचे लोक जे कठोर परिश्रम करत आहेत आणि आपल्या जीवनात यश मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना या काळात यश मिळेल.

मकर (Makar Rashi) मकर राशीच्या लोकांसाठी सूर्यग्रहण शुभ ठरू शकते. यामुळे मकर राशीच्या लोकांच्या कमाईत वाढ होईल. समाजात उच्च स्थान असलेल्या लोकांशी तुमची ओळख होईल, जीवनात यशाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी फायदा होईल. हे सूर्यग्रहण तुम्हाला एक नवीन अशा देऊन जाईल.

कुंभ (Kumbha Rashi) कुंभ राशीच्या लोकांसाठी हे सूर्यग्रहण खूप चांगले ठरू शकते आणि त्यांचे नशीब बदलू शकते. हे सूर्यग्रहण कुंभ राशीच्या राशीच्या लोकांच्या करिअरसाठी निर्णायक भाग ठरू शकतो. या राशींच्या लोकांच्या करिअरमधील अडथळे दूर होतील आणि लवकरच तुम्हाला चांगली नोकरी मिळू शकेल.

(येथे दिलेली माहिती ही धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

इतर बातम्या :

Surya Grahan 2021| भूक आवरत नाही? ग्रहण काळातही खायचंय, तर हा उपाय करा आणि निर्धास्त राहा

Chanakya Niti | या 4 गोष्टींना चुकूनही पायाने स्पर्श करु नका, अन्यथा पापाचे भागीदार व्हाल…

Lord Ganesha | जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी श्रीगणेशाची मनोभावे आराधना करा

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.