AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Tips : घरातल्या या चुकांमूळे निर्माण होतो वास्तूदोष, राशीनुसार करा उपाय

घरातील वास्तू सुख-समृद्धीशी संबंधित असल्याचे मानले जाते. वास्तु नियमांचे पालन केल्यास घरात सुख, समृद्धी आणि शांती राहते. अनेकदा लोकांना वास्तूच्या काही सोप्या टिप्सने घरात सकारात्मक ऊर्जा कायम ठेवायची असते. चला जाणून घेऊया अशा टिप्स ज्याद्वारे घरात सकारात्मक ऊर्जा संचारते.

Vastu Tips : घरातल्या या चुकांमूळे निर्माण होतो वास्तूदोष, राशीनुसार करा उपाय
वास्तूदोषImage Credit source: Social Media
| Updated on: Apr 09, 2023 | 3:39 PM
Share

मुंबई :  घरामध्ये वास्तुदोष आहे की नाही यावरून अनेकदा लोक चिंतेत असतात. घरातील वास्तुदोषांमुळेही (Vastu Tips) जीवनात समस्या निर्माण होतात. जर राशीशी संबंधित गोष्टी घरात ठेवल्या तर जीवनातील अनेक समस्या कमी होतात. प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते. या सामान्यतः साध्या गोष्टी आहेत मात्र त्याचे हरि आणि त्यांचा विशेष वापर आणि देखभाल आश्चर्यकारक आहे. चला  जाणून घेऊया, राशीनुसार कोणते उपाय केले पाहिजेत, ज्यामुळे घरातील वास्तुदोष दूर होऊ शकतात.

राशीनुसार हे उपाय ठरतील फायदेशीर

1. मेष

घरात सूर्यप्रकाश असणे आवश्यक आहे. याकडे जास्तीत जास्त लक्ष द्या. स्वयंपाकघरात आगीचा वापर करताना काळजी घ्या.

2. वृषभ

घरातील रंग आणि सुगंधांकडे विशेष लक्ष द्या. रंगांचा योग्य वापर केल्यास वास्तुदोष दूर होतात. तसेच घरातील डस्टबिन व्यवस्थित ठेवा.

3. मिथुन

घरात हवेचे आगमन योग्य ठेवा. खूप गर्दीची ठिकाणे टाळा. घरात नेहमी सुगंध ठेवा.

4. कर्क

घरातील पाण्याच्या ठिकाणी विशेष लक्ष द्या. पाण्याचा अपव्यय अजिबात करू नका. ईशान्य दिशेला पाण्याची व्यवस्था करा.

5. सिंह

घरातील सूर्यप्रकाशाकडे विशेष लक्ष द्या. विद्युत वस्तू आणि स्थानांकडे लक्ष द्या. घरात जास्त अंधार नसावा.

6. कन्या

घरामध्ये दक्षिण दिशेकडे विशेष लक्ष द्या. येथे कचरा गोळा करून ठेवू नका. घरातील वस्तू नेहमी योग्य पद्धतीने ठेवा.

7. तुला

घरातील हवेच्या प्रवाहाकडे विशेष लक्ष द्या. घरातील ठिकाणांच्या रंगाकडेही लक्ष द्या. घर नेहमी सुगंधित ठेवा.

8. वृश्चिक

घरातील पाण्याच्या ठिकाणांकडे विशेष लक्ष द्या. घरात ओलसरपणा आणि पाण्याची गळती होऊ नये. ईशान्य दिशा स्वच्छ ठेवा.

9. धनु

घरात सूर्यप्रकाशाची विशेष काळजी घ्या. यासोबत घराच्या पायऱ्या चांगल्या बनवल्या पाहिजेत. घराच्या मध्यभागी असलेली जागा स्वच्छ ठेवा.

10. मकर

घरात अनावश्यक वस्तू जमा करू नका. स्नानगृह स्वच्छ आणि नीटनेटके ठेवा. कोणतीही निरुपयोगी वस्तू उत्तर दिशेला ठेवू नका.

11. कुंभ

घरातील रंग आणि सुगंधांकडे विशेष लक्ष द्या. प्रार्थनास्थळाचे पावित्र्य राखावे. घर सुगंधी राहिल्यास चांगले होईल.

12. मीन

घरातील पाण्याच्या ठिकाणांकडे विशेष लक्ष द्या. स्वयंपाकघरात पाण्याची टाकी आणि स्टोव्ह एकत्र ठेवू नका. घराच्या कानाकोपऱ्याच्या स्वच्छतेची विशेष काळजी घ्या.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?.
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह..
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह...
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी.
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला.
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?.
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?.
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप.
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?.
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले.
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा.