AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Tips : घरातल्या या चुकांमूळे निर्माण होतो वास्तूदोष, राशीनुसार करा उपाय

घरातील वास्तू सुख-समृद्धीशी संबंधित असल्याचे मानले जाते. वास्तु नियमांचे पालन केल्यास घरात सुख, समृद्धी आणि शांती राहते. अनेकदा लोकांना वास्तूच्या काही सोप्या टिप्सने घरात सकारात्मक ऊर्जा कायम ठेवायची असते. चला जाणून घेऊया अशा टिप्स ज्याद्वारे घरात सकारात्मक ऊर्जा संचारते.

Vastu Tips : घरातल्या या चुकांमूळे निर्माण होतो वास्तूदोष, राशीनुसार करा उपाय
वास्तूदोषImage Credit source: Social Media
| Updated on: Apr 09, 2023 | 3:39 PM
Share

मुंबई :  घरामध्ये वास्तुदोष आहे की नाही यावरून अनेकदा लोक चिंतेत असतात. घरातील वास्तुदोषांमुळेही (Vastu Tips) जीवनात समस्या निर्माण होतात. जर राशीशी संबंधित गोष्टी घरात ठेवल्या तर जीवनातील अनेक समस्या कमी होतात. प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते. या सामान्यतः साध्या गोष्टी आहेत मात्र त्याचे हरि आणि त्यांचा विशेष वापर आणि देखभाल आश्चर्यकारक आहे. चला  जाणून घेऊया, राशीनुसार कोणते उपाय केले पाहिजेत, ज्यामुळे घरातील वास्तुदोष दूर होऊ शकतात.

राशीनुसार हे उपाय ठरतील फायदेशीर

1. मेष

घरात सूर्यप्रकाश असणे आवश्यक आहे. याकडे जास्तीत जास्त लक्ष द्या. स्वयंपाकघरात आगीचा वापर करताना काळजी घ्या.

2. वृषभ

घरातील रंग आणि सुगंधांकडे विशेष लक्ष द्या. रंगांचा योग्य वापर केल्यास वास्तुदोष दूर होतात. तसेच घरातील डस्टबिन व्यवस्थित ठेवा.

3. मिथुन

घरात हवेचे आगमन योग्य ठेवा. खूप गर्दीची ठिकाणे टाळा. घरात नेहमी सुगंध ठेवा.

4. कर्क

घरातील पाण्याच्या ठिकाणी विशेष लक्ष द्या. पाण्याचा अपव्यय अजिबात करू नका. ईशान्य दिशेला पाण्याची व्यवस्था करा.

5. सिंह

घरातील सूर्यप्रकाशाकडे विशेष लक्ष द्या. विद्युत वस्तू आणि स्थानांकडे लक्ष द्या. घरात जास्त अंधार नसावा.

6. कन्या

घरामध्ये दक्षिण दिशेकडे विशेष लक्ष द्या. येथे कचरा गोळा करून ठेवू नका. घरातील वस्तू नेहमी योग्य पद्धतीने ठेवा.

7. तुला

घरातील हवेच्या प्रवाहाकडे विशेष लक्ष द्या. घरातील ठिकाणांच्या रंगाकडेही लक्ष द्या. घर नेहमी सुगंधित ठेवा.

8. वृश्चिक

घरातील पाण्याच्या ठिकाणांकडे विशेष लक्ष द्या. घरात ओलसरपणा आणि पाण्याची गळती होऊ नये. ईशान्य दिशा स्वच्छ ठेवा.

9. धनु

घरात सूर्यप्रकाशाची विशेष काळजी घ्या. यासोबत घराच्या पायऱ्या चांगल्या बनवल्या पाहिजेत. घराच्या मध्यभागी असलेली जागा स्वच्छ ठेवा.

10. मकर

घरात अनावश्यक वस्तू जमा करू नका. स्नानगृह स्वच्छ आणि नीटनेटके ठेवा. कोणतीही निरुपयोगी वस्तू उत्तर दिशेला ठेवू नका.

11. कुंभ

घरातील रंग आणि सुगंधांकडे विशेष लक्ष द्या. प्रार्थनास्थळाचे पावित्र्य राखावे. घर सुगंधी राहिल्यास चांगले होईल.

12. मीन

घरातील पाण्याच्या ठिकाणांकडे विशेष लक्ष द्या. स्वयंपाकघरात पाण्याची टाकी आणि स्टोव्ह एकत्र ठेवू नका. घराच्या कानाकोपऱ्याच्या स्वच्छतेची विशेष काळजी घ्या.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.