AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : साध्या, सरळ स्वभावाच्या व्यक्तींना नेहमीच त्रास दिला जातो

आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य नीति ग्रंथात ज्ञानाच्या अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. जर तुम्ही आचार्यांच्या गोष्टी समजून घेतल्या आणि आत्मसात केल्या तर तुम्ही स्वतःला अनेक प्रकारच्या अडचणींपासून वाचू शकता आणि तुमचे जीवन सोपे करू शकता.

Chanakya Niti : साध्या, सरळ स्वभावाच्या व्यक्तींना नेहमीच त्रास दिला जातो
Chanakya Niti
| Edited By: Nupur Chilkulwar | Updated on: Jul 31, 2021 | 7:43 AM
Share

मुंबई : आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य नीति ग्रंथात ज्ञानाच्या अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. जर तुम्ही आचार्यांच्या गोष्टी समजून घेतल्या आणि आत्मसात केल्या तर तुम्ही स्वतःला अनेक प्रकारच्या अडचणींपासून वाचू शकता आणि तुमचे जीवन सोपे करू शकता. आचार्य यांची धोरणे माणसाला योग्य आणि अयोग्य यात फरक करायला शिकवतात आणि नेहमी धर्माच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देतात (Acharya Chanakya Said People With Simple Nature Will Always Harassed By The Others In Chanakya Niti ).

आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीतिच्या सातव्या अध्यायातील बाराव्या श्लोकात सांगितले आहे की कोणत्या प्रकारच्या लोकांना त्यांच्या स्वभावामुळे नेहमीच त्रास दिला जातो.

नात्यन्तं सरलेन भाव्यं गत्वा पश्य वनस्थलीम् छिद्यन्ते सरलास्तत्र कुब्जास्तिष्ठन्ति पादपाः

या श्लोकाद्वारे आचार्य म्हणतात की, ज्या लोकांचा स्वभाव अत्यंत सरळ आहे, त्यांच्यासाठी हे जीवन अत्यंत वेदनादायक बनते. याचे एक साधे उदाहरण म्हणजे जंगलात उपस्थित असलेली झाडे. जर तुम्ही बघितले तर तुम्हाला दिसेल की जी झाडे सरळ उभी आहेत ती प्रथम कापली जातात. हा मानवांसाठी एक धडा आहे ज्यापासून प्रत्येक व्यक्तीने शिकले पाहिजे.

चाणक्य म्हणतात की, ज्या व्यक्तीचा स्वभाव आवश्यकतेपेक्षा अधिक सरळ, साधा आणि सहज असतो, त्यांना समाजात शांततेने राहणे खूप कठीण होते. कोणाचेही नुकसान न करताही त्यांना अडकवले जाते. हुशार आणि चालाख लोक त्यांचा लाभ घेण्याची संधी कधीही सोडत नाहीत.

अशा लोकांना समाजात कमकुवत मानले जाते. म्हणूनच लोक त्यांना त्रास देतात. अशा लोक कुणालाही काहीही त्रास देत नसतानाही त्यांना त्रास दिला जातो. कारण प्रत्येकाला माहित आहे की ते कोणाचेही नुकसान करु शकत नाहीत. म्हणूनच समाजात राहणारे लोक त्याचा लाभ घेऊ नयेत म्हणून प्रत्येक व्यक्तीने थोडे हुशार आणि चालाख असणे अत्यंत आवश्यक आहे. आपण कोणाचेही नुकसान करु नये, परंतु स्वतःचे आणि आपल्या कुटुंबाचे भले करण्यासाठी बुद्धिमत्ता कौशल्य आणि शक्ती दोन्ही असणे आवश्यक आहे. तरच तुम्ही तुमच्या कुटुंबाचे पोट भरु शकाल आणि या समाजातील वाईट लोकांमध्ये सुरक्षित राहू शकाल.

Acharya Chanakya Said People With Simple Nature Will Always Harassed By The Others In Chanakya Niti

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chanakya Niti : या गोष्टी ठरतात एखाद्या व्यक्तीच्या वाईट काळाचे कारण, जाणून घ्या चाणक्य नीति काय म्हणते ते

Chanakya Niti | अत्यंत आदरणीय असतात हे 7 व्यक्ती, यांना चुकूनही पाय लावू नये

Follow Us
झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी!
Zeeshan Siddique | झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी! थेट मुंबई आयुक्तांना फोन; फडणवीसांनाही दिली माहिती
अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार
Abhijit Dipke | अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार; नेमकं प्रकरण काय?
मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
Mumbai | तुकाराम मुंढे यांचा Domino’s ला दणका! मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा
Eknath Shinde | एकनाथ शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा, नेमकं काय ठरलं?
आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं...
Tv9 Marathi Special Report | फक्त आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं; सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी गठीत केली उच्चस्तरीय समिती
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?