AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | अत्यंत आदरणीय असतात हे 7 व्यक्ती, यांना चुकूनही पाय लावू नये

लहानपणी आपले पालक अनेकदा आपल्याला काही गोष्टींना पाय लागण्यापासून रोखतात. त्यांचा उद्देश आपल्याला हे शिकवणे आहे की आपण सर्व आदरणीय लोकांचा आणि गोष्टींचा आदर केला पाहिजे. बालपणात पालकांनी दिलेले हे संस्कार आपल्या व्यक्तिमत्त्वाचा पाया बनतात.

Chanakya Niti | अत्यंत आदरणीय असतात हे 7 व्यक्ती, यांना चुकूनही पाय लावू नये
जर तुम्हाला जीवनाचा मार्ग सुलभ करायचा असेल तर आचार्य चाणक्याच्या या गोष्टी लक्षात ठेवा
| Edited By: | Updated on: Jul 21, 2021 | 7:58 AM
Share

मुंबई : लहानपणी आपले पालक अनेकदा आपल्याला काही गोष्टींना पाय लागण्यापासून रोखतात. त्यांचा उद्देश आपल्याला हे शिकवणे आहे की आपण सर्व आदरणीय लोकांचा आणि गोष्टींचा आदर केला पाहिजे. बालपणात पालकांनी दिलेले हे संस्कार आपल्या व्यक्तिमत्त्वाचा पाया बनतात (Acharya Chanakya Said Do Not Touch These 7 People With Your Feet Who Are Very Respectful).

आचार्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीति ग्रंथातील सातव्या अध्यायातील सहाव्या श्लोकात असे सात लोक सांगितले आहेत, ज्यांना चुकूनही पाय लागू नये. आचार्य चाणक्य हे प्रत्येक विषयाचे जाणकार होते आणि त्यांनी आयुष्यात जे काही सांगितले ते त्यांनी आपल्या अनुभवाच्या आधारे आणि लोकांचे हित लक्षात घेऊन सांगितले आहे. आचार्य यांनी आयुष्यभर लोकांना खूप मदत केली आणि आपल्या चाणक्य नीति या ग्रंथात त्यांनी आयुष्याशी संबंधित जवळजवळ प्रत्येक बाबींला स्पर्श केला आहे आणि अशा अनेक रहस्यमय गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या एखाद्या व्यक्तीला समजल्या तर त्याचे आयुष्य सुधारु शकते.

पादाभ्यां न स्पृशेदग्निं गुरु ब्राह्मणमेव च नैव गां न कुमारीं च न वृद्धं न शिशुं तथा

? या श्लोकाद्वारे आचार्य यांनी सांगितले आहे की अग्नि, गुरू, ब्राह्मण, गाय, कुमारी, वृद्ध आणि लहान बाळाला कधीही पाय लागू नये. आचार्य यांनी सांगितल्याप्रमाणे हे समजून घ्या.

? शास्त्रांमध्ये अग्निला भगवानचा दर्जा देण्यात आला आहे, घरात यज्ञ वगैरे असेल तर अग्नी पेटवून शुद्धीकरण केले जाते. म्हणून अग्निला कधीही पाय लावू नये. अग्निचा अपमान करणे हा देवतांचा अपमान मानला जातो. या व्यतिरिक्त, जर आग तीव्र असेल तर ती आपल्यालाही नुकसान पोहोचवू शकते. म्हणून अग्नीला लांबून प्रणाम करा.

? गुरु, ब्राह्मण आणि वृद्ध व्यक्ती आदरणीय मानले जातात आणि आमचे संस्कार म्हणतात की ज्याला आदरणीय असतील पूजनीय असतात त्यांच्या पायांना नेहमी हाताने स्पर्श करुन आशीर्वाद घ्यावा. त्यांना कधीच आपला पाय लागू देऊ नये.

? शास्त्रामध्ये गाय पूजनीय मानली जाते आणि मुलगी ही देवीचे रुप असल्याचे म्हटले जाते आणि मूल हे देवाचे रुप असल्याचे म्हटले जाते. अशा परिस्थितीत या तिघांनाही पाय लागू देऊ नये. अथर्ववेदात गायीला पाय लागल्यास शिक्षेची तरतूद आहे.

Acharya Chanakya Said Do Not Touch These 7 People With Your Feet Who Are Very Respectful

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chanakya Niti | या प्रकारच्या व्यक्तींचं स्वत:चं अस्तित्व नसते, जाणून घ्या आचार्य चाणक्य काय सांगतात

Chanakya Niti | या चार गोष्टींमध्ये महिला पुरुषांपेक्षा नेहमी असतात पुढे, जाणून घ्या आचार्य चाणक्य काय सांगतात

Follow Us
सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत
सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत.
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड.
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान.
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा.
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....