AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : कुठलंही काम करण्यापूर्वी आचार्य चाणक्य यांचे हे सल्ले लक्षात ठेवा, यश नक्की मिळेल

आचार्य चाणक्य हे राजकारण आणि मुत्सद्देगिरीत कुशल व्यक्ती होते. त्यांनी लहान वयातच अनेक ग्रंथ आणि वेदांचे ज्ञान प्राप्त केले होते. ते तक्षशीला येथे शिक्षक होते. त्यांनी आयुष्यात अनेक पुस्तके आणि ग्रंथ लिहिली. लोकांना अजूनही त्याचे नीतिशास्त्र वाचायला आवडते. त्यांची धोरणे एखाद्या व्यक्तीला यशस्वी होण्यास मदत करतात.

Chanakya Niti : कुठलंही काम करण्यापूर्वी आचार्य चाणक्य यांचे हे सल्ले लक्षात ठेवा, यश नक्की मिळेल
जर तुम्हाला जीवनाचा मार्ग सुलभ करायचा असेल तर आचार्य चाणक्याच्या या गोष्टी लक्षात ठेवा
| Edited By: | Updated on: Aug 16, 2021 | 8:00 AM
Share

मुंबई : आचार्य चाणक्य हे राजकारण आणि मुत्सद्देगिरीत कुशल व्यक्ती होते. त्यांनी लहान वयातच अनेक ग्रंथ आणि वेदांचे ज्ञान प्राप्त केले होते. ते तक्षशीला येथे शिक्षक होते. त्यांनी आयुष्यात अनेक पुस्तके आणि ग्रंथ लिहिली. लोकांना अजूनही त्याचे नीतिशास्त्र वाचायला आवडते. त्यांची धोरणे एखाद्या व्यक्तीला यशस्वी होण्यास मदत करतात.

जर तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्यक्ती व्हायचे असेल तर आचार्य चाणक्याच्या धोरणांचे पालन केले पाहिजे. जीवनाशी संबंधित पैलूंबद्दल त्यांचे अनुभव नीतिशास्त्र पुस्तकात नमूद केले आहे. चाणक्य म्हणतात की कोणतेही काम करण्यापूर्वी काही गोष्टींकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. कोणत्याही कार्यात यशस्वी होण्याआधी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत हे जाणून घेऊया.

कोणतीही कृती करण्यापूर्वी धोरण ठरवा

आचार्य चाणक्य यांच्या मते, कोणत्याही व्यक्तीने आपले कोणतेही काम करण्यापूर्वी योजना बनवावी. योजनेशिवाय काम केल्यास अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. यामुळे, कार्य यशस्वी होण्याची शक्यता कमी होते. नियोजन केल्यानंतर जर तुम्ही काम केले तर तुम्हाला त्यात नक्कीच यश मिळेल.

कठोर परिश्रम करा

चाणक्य यांच्या मते, मेहनत ही यशाची गुरुकिल्ली आहे. कोणतेही काम यशस्वी करण्यासाठी मेहनत करावी लागते. कोणत्याही कामासाठी केलेली मेहनत व्यर्थ जात नाही, म्हणून कोणतेही काम करण्यापासून, कठोर परिश्रम करण्यापासून मागे हटू नका.

काम झाल्यानंतर खुलासा करा

आचार्य चाणक्य म्हणतात की काम पूर्ण झाल्यानंतरच योजना कोणासमोरही उघड करावी. असे केल्याने तुम्हाला कामात यश मिळते. जर तुम्ही काम पूर्ण होण्यापूर्वी योजना उघड केली तर हेवा करणारे लोक तुमच्या कामात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे तुमचे काम पूर्ण होईपर्यंत त्याचा उल्लेख करु नका.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...
काँग्रेससोबत वंचित आल्यानं वर्षा गायकवाड नाराज? युतीवर केलं मोठं विधान
काँग्रेससोबत वंचित आल्यानं वर्षा गायकवाड नाराज? युतीवर केलं मोठं विधान.
नागपूरमध्ये कार्यकर्त्यांचा बावनकुळे यांना घेराव अन् नाराजी व्यक्त
नागपूरमध्ये कार्यकर्त्यांचा बावनकुळे यांना घेराव अन् नाराजी व्यक्त.