AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या या गोष्टी तुमच्या आयुष्यातील प्रत्येक आव्हानाला करतील सोपं

जर तुम्हाला तुमचे जीवन सुधारायचे असेल तर तुम्ही केवळ आचार्य चाणक्यांची धोरणे वाचू नका तर ती तुमच्या जीवनात लागू करा. अशी व्यक्ती जीवनाच्या प्रत्येक परिस्थितीला पूर्ण उत्साहाने सामोरे जाऊ शकते आणि आयुष्य आनंदी बनवू शकते. येथे जाणून घ्या आचार्य चाणक्यांचे काही अनमोल विचार

Chanakya Niti : आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या या गोष्टी तुमच्या आयुष्यातील प्रत्येक आव्हानाला करतील सोपं
अपमान- चाणक्य नीतीनुसार, जर कोणी तुमचा अपमान केला असेल तर तो स्वतःकडेच ठेवावा. त्याबद्दल इतरांना सांगितल्याने त्या लोकांचा तुमच्याबद्दलचा आदर कमी होईल.
| Edited By: Nupur Chilkulwar | Updated on: Aug 12, 2021 | 7:11 AM
Share

मुंबई : आचार्य चाणक्य एक महान राजकारणी, मुत्सद्दी, अर्थशास्त्रज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ होते. आजच्या काळातही ते एक उत्तम जाणकार आणि मॅनेजमेंट प्रशिक्षक म्हणून आठवले जातात आणि त्यांनी सांगितलेल्या गोष्टींचे पालन करण्याचा सल्ला दिला जातो. आचार्यांच्या गोष्टींनी, एखाद्या व्यक्तीला त्याच्या आयुष्यातील संघर्षांचे निदान मिळते, जी व्यक्ती स्वतः आयुष्यभर जगल्यानंतरही सहजपणे कमवू शकत नाही. म्हणूनच, जर तुम्हाला तुमचे जीवन सुधारायचे असेल तर तुम्ही केवळ आचार्य चाणक्यांची धोरणे वाचू नका तर ती तुमच्या जीवनात लागू करा. अशी व्यक्ती जीवनाच्या प्रत्येक परिस्थितीला पूर्ण उत्साहाने सामोरे जाऊ शकते आणि आयुष्य आनंदी बनवू शकते. येथे जाणून घ्या आचार्य चाणक्यांचे काही अनमोल विचार –

? फुलांचा सुगंध फक्त वाऱ्याच्या दिशेने पसरतो, पण माणसाचा चांगुलपणा सर्वत्र पसरतो. म्हणून नेहमी चांगले कर्म करा.

? दुःखाचे सर्वात मोठे कारण आसक्ती आहे. जो त्याच्या कुटुंबाशी खूप संलग्न आहे, ती व्यक्ती नेहमी भीती आणि दुःखात राहते. जर तुम्हाला आनंद हवा असेल तर आसक्ती सोडून द्या.

? ज्याप्रमाणे वासरु हजारो गायींच्या कळपात आपल्या आईच्या मागे चालतो. त्याच प्रकारे माणसाची चांगली आणि वाईट कर्मे त्याच्या मागे लागतात.

? राजाची ताकद त्याच्या पराक्रमी बाहूंमध्ये असते, ब्राह्मण यांची ज्ञानात आणि स्त्रीची तिच्या सौंदर्यात, तारुण्यात आणि मधुर बोलण्यात असते. याच्या भरवश्यावर हे लोक काहीही करवून घेऊ शकतात.

? तुम्ही कितीही चांगले असलात तरी तुम्ही दुष्टांच्या सहवासात राहिल्याने त्यांचा प्रभाव तुमच्यावर नक्कीच होतो. ज्याप्रमाणे जंगलातील आग चंदनाचे लाकूडही जाळते त्याचप्रमाणे.

? जे झाले त्याच्या चिंतेत वेळ वाया घालवू नका. जे अजून आलेले नाही त्या भविष्याची चिंता करु नये. लक्षात ठेवा बुद्धिमान लोक नेहमी वर्तमानात आयुष्य जगतात. वर्तमान हा तुमच्या भविष्याचा आधार आहे.

? जीवनाचा सर्वात मोठा गुरु मंत्र हा आहे की आपले रहस्य कोणाकडे कधीही उघड करु नका.

? देव मूर्तींमध्ये नसतो. तुमच्या भावनाच तुमचे देव आहे आणि तुमचा आत्मा तुमचे मंदिर आहे.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chanakya Niti : शत्रुवर मात करायची असेल तर आचार्य चाणक्य यांचे हे 3 सल्ले लक्षात ठेवा

Chanakya Niti : वाईट काळात आचार्य चाणक्य यांचे ‘हे’ सल्ले लक्षात ठेवा, कुठल्याही समस्येवर मात करण्यात हे मदत करतील

Follow Us
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार...
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार....
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल.
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत.