AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : अशा व्यक्ती स्वत: त्यांच्या दारिद्र्यासाठी जबाबदार असतात

आचार्य चाणक्य यांच्या मते, जो माणूस उशिरापर्यंत झोपत राहतो, त्याचा वेळ वाया घालवण्याबरोबरच तो आपली ऊर्जाही नष्ट करतो. सकाळची वेळ दैवी वेळ मानली जाते. यावेळी व्यक्तीच्या शरीरात विशेष ऊर्जा असते, ज्याचा प्रत्येकाने चांगला वापर करावा आणि या काळात त्यांच्या कठीण कामांना सामोरे जावे.

Chanakya Niti : अशा व्यक्ती स्वत: त्यांच्या दारिद्र्यासाठी जबाबदार असतात
विद्यार्थी जीवनात जो 'या' सवयी सोडतो त्याच्यासाठी काहीही नाही अशक्य
| Edited By: | Updated on: Aug 01, 2021 | 7:47 AM
Share

मुंबई : आचार्य चाणक्य हे अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राजकारण इत्यादी सर्व विषयांमध्ये निपुण होते. एक महान विद्वान म्हणून त्यांचे आजही स्मरण केले जाते आणि त्यांची धोरणे लोकांना जगण्याची कला शिकण्यासाठी प्रेरित करतात.आचार्य चाणक्य यांनी त्यांचे आयुष्य अनेक अडचणींमध्ये जगले. पण ते कधीही परिस्थितीपुढे झुकले नाही, तर त्यांचा बारकाईने अभ्यास केला आणि त्यातून शिकले (Acharya Chanakya Said Such People Are Responsible For Their Poverty In Chanakya Niti).

त्यांनी त्या अनुभवांना चाणक्य नीति ग्रंथाच्या रूपात इतर लोकांसाठी मांडले आहे. चाणक्य नीतिमध्ये मानव कल्याणाशी संबंधित अशा अनेक गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे जे आजच्या काळात सुद्धा लोकांसाठी खूप फायदेशीर ठरेल. आचार्यांचे अनुभव आपल्याला सर्व त्रास टाळण्याचा मार्ग दाखवतात आणि प्रतिकूल काळात मार्गदर्शन करतात. आचार्यांनी चाणक्य नीतिमध्ये अशा काही सवयींचे वर्णन केले आहे, ज्या व्यक्तीला दारिद्र्याच्या मार्गावर ढकलतात. आपण लवकरच त्यांच्यापासून मुक्त व्हावे.

1. आचार्य चाणक्य यांच्या मते, जो माणूस उशिरापर्यंत झोपत राहतो, त्याचा वेळ वाया घालवण्याबरोबरच तो आपली ऊर्जाही नष्ट करतो. सकाळची वेळ दैवी वेळ मानली जाते. यावेळी व्यक्तीच्या शरीरात विशेष ऊर्जा असते, ज्याचा प्रत्येकाने चांगला वापर करावा आणि या काळात त्यांच्या कठीण कामांना सामोरे जावे. पण झोपलेली व्यक्ती ही वेळ वाया घालवते. अशी व्यक्ती प्रत्यक्षात स्वतःच स्वतःचे आयुष्य उध्वस्त करते.

2. चाणक्य नीतिमध्ये आचार्य चाणक्य म्हणतात की जे घाणेरडे कपडे घालतात, दात स्वच्छ करत नाहीत आणि स्वच्छतेने राहत नाहीत, अशा लोकांवर देवी लक्ष्मी नाराज होते. असे लोक कधीही समृद्ध होऊ शकत नाहीत. त्यांचे शरीर लवकरच रोगांच्या कचाट्यात पडते, ज्यामुळे ते कोणतेही काम व्यवस्थित करु शकत नाहीत किंवा पैसे वाचवू शकत नाहीत कारण त्यांच्या आजारपणावर पाण्यासारखा पैसा खर्च होतात. त्यामुळे नेहमी स्वच्छतेची काळजी घ्या.

3. आवश्यकतेपेक्षा जास्त खाणे आणि नेहमी अन्नाबद्दल लोभी असणे हे व्यक्तीला गरिबीकडे ढकलते. अन्न हे आपले जगण्याचे साधन आहे. पण जे त्यालाच जीवन समजतात ते दुसरे काहीही करु शकत नाहीत आणि आयुष्यभर समस्यांना सामोरे जातात.

4. जर तुम्हाला यश हवे असेल तर तुम्ही नक्कीच गोड बोलायला यायला हवे. जो गोड बोलतो तो सर्वांना प्रिय असतो. तर जी व्यक्ती कडू बोलते त्यांचे नाते बिघडते आणि त्यांना निराशेचा सामना करावा लागतो. अशी माणसे इच्छा असली तरी यशस्वी होऊ शकत नाहीत.

Acharya Chanakya Said Such People Are Responsible For Their Poverty In Chanakya Niti

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chanakya Niti | आचार्य चाणक्य यांच्या या 5 गोष्टी लक्षात ठेवा, कधीही आर्थिक चणचण भासणार नाही

Chanakya Niti | या 3 गोष्टींपासून नेहमी दूर रहा, अन्यथा इतरांच्या निंदेस पात्र ठराल

Follow Us
भोंदू बाबा खरातचा पेनड्राईव्ह बाहेर आल्यास तीन मंत्र्यांची विकेट जाईल
भोंदू बाबा खरातचा पेनड्राईव्ह बाहेर आल्यास तीन मंत्र्यांची विकेट जाईल.
उद्धव ठाकरेंमुळेच शिंदे आज फडणवीसांच्या मंत्रिमंडळात; राऊतांचा पलटवार
उद्धव ठाकरेंमुळेच शिंदे आज फडणवीसांच्या मंत्रिमंडळात; राऊतांचा पलटवार.
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार प्रकरणात कर्नाटकात गुन्हा दाखल
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार प्रकरणात कर्नाटकात गुन्हा दाखल.
वन्यजीवांनाही सोडलं नाही, भोंदू खरातचे किळसवाणे कारनामे उघड
वन्यजीवांनाही सोडलं नाही, भोंदू खरातचे किळसवाणे कारनामे उघड.
उद्धव ठाकरेंचा विधानपरिषदेचा शेवटचा दिवस, एकनाथ शिंदेंकडून शुभेच्छा
उद्धव ठाकरेंचा विधानपरिषदेचा शेवटचा दिवस, एकनाथ शिंदेंकडून शुभेच्छा.
भोंदूबाबाच्या संपत्तीबाबात फडणवीसांचा मोठा खुलासा, एकूण संपत्ती....
भोंदूबाबाच्या संपत्तीबाबात फडणवीसांचा मोठा खुलासा, एकूण संपत्ती.....
खरातकडून फोटो व्हायरल होण्याची धमकी देत पाच कोटींच्या खंडणीची मागणी
खरातकडून फोटो व्हायरल होण्याची धमकी देत पाच कोटींच्या खंडणीची मागणी.
5 नरबळी, हरणाची शिकार, अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती
5 नरबळी, हरणाची शिकार, अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती.
भोंदूबाबा अशोक खरातच्या तपासाला वेग, सरकारी वकिलांची नियुक्ती
भोंदूबाबा अशोक खरातच्या तपासाला वेग, सरकारी वकिलांची नियुक्ती.
दरवाज्यात अडकून जखमा? चाकणकर-तटकरेेंचे नाव घेत सुषमा अंधारे म्हणाल्या
दरवाज्यात अडकून जखमा? चाकणकर-तटकरेेंचे नाव घेत सुषमा अंधारे म्हणाल्या.