AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | या 3 गोष्टींपासून नेहमी दूर रहा, अन्यथा इतरांच्या निंदेस पात्र ठराल

आचार्य चाणक्य यांनी आयुष्यात खूप संघर्ष केला आणि प्रतिकूल परिस्थितीतही अतिशय कठीण निर्णय घेतले. पण त्यांचे प्रत्येक निर्णय बहुतेक अचूक ठरले कारण आचार्य नेहमीच त्यांच्या संघर्षाकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पहात असत, धैर्याने आव्हानांना सामोरे जात असत आणि आपत्तीला संधीमध्ये बदलत असत

Chanakya Niti | या 3 गोष्टींपासून नेहमी दूर रहा, अन्यथा इतरांच्या निंदेस पात्र ठराल
स्वतःचे त्रास स्वत: पर्यंत ठेवा - चाणक्य नीतीनुसार, तुमच्या आयुष्यातील त्रास इतरांना शेअर करणे टाळले पाहिजे. तुमची समस्या जाणून घेतल्यानंतर लोक तुमची थट्टा करतील. तुम्हाला त्यांच्या कडून कोणतीच मदत होणार नाही.
| Edited By: | Updated on: Jul 29, 2021 | 7:48 AM
Share

मुंबई : आचार्य चाणक्य यांनी आयुष्यात खूप संघर्ष केला आणि प्रतिकूल परिस्थितीतही अतिशय कठीण निर्णय घेतले. पण त्यांचे प्रत्येक निर्णय बहुतेक अचूक ठरले कारण आचार्य नेहमीच त्यांच्या संघर्षाकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पहात असत, धैर्याने आव्हानांना सामोरे जात असत आणि आपत्तीला संधीमध्ये बदलत असत (Acharya Chanakya Said Do Not Do These Three Things If You Want To Avaoid Slander).

आचार्य चाणक्य यांनी जे काही केले ते त्यांनी जनहिताचे भान ठेवून केले आणि लोकांना नेहमी धर्माच्या मार्गावर चालण्यासाठी प्रेरित केले. आचार्य यांचा असा विश्वास होता की ज्या कामात मानवी कल्याणाची भावना नसते, त्या कार्याचे फळ कधीच कायम राहू शकत नाही. चाणक्य नीति या ग्रंथात आचार्य यांनी लोकांना वाईट कृत्ये टाळण्याचा सल्ला दिला आहे. अपयश टाळायचे असेल तर नेहमी या 3 गोष्टींपासून दूर रहा, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

खोटे बोलून फायदा घेणे

आचार्य चाणक्य यांच्यामते, जी व्यक्ती असत्याचा आधार घेऊन फायदा घेतो त्याला समाजात कधीही आदर मिळू शकत नाही. खोटे बोलून आपले काम काही दिवस चालू शकते, परंतु एखाद्या दिवशी आपले पितळ नक्कीच उघडं पडतं. ज्या दिवशी लोकांना आपले सत्य माहित होईल ते आपल्याला नापसंत करतील आणि आपल्यापासून दूर जातील.

इतरांबाबत वाईट बोलणे

काही लोकांना इतरांचे वाईट करणे आवडते. परंतु वाईट करणाऱ्यास कधीही आदराने पाहिले जात नाही. अशा लोकांमध्ये नकारात्मकता आणि निराशा दिसून येते. हे लोक जिथेही बसतात तिथे ते कोणाबाबत वाईट बोलतात. परंतु, इतरांबाबत वाईट बोलून आपण आपला अनमोल वेळच वाया घालवत नाही तर, स्वत: देखील टीकेचे पात्र ठरता.

दुसर्‍याचे नुकसान करण्यासाठी पैशांचा वापर

पैसा आपल्या जगण्यासाठी आहे, तो आपल्या वाईट काळाचा खरा मित्र आहे. म्हणून, पैसे जमा करणे आवश्यक आहे आणि त्याचा काही भाग धार्मिक कार्यातही वापरला जावा. परंतु काही लोक पैशांचा वापर इतरांचे नुकसान करण्यासाठी करतात. अशा लोकांना समाजात कधीही आदराने पाहिले जात नाही. लोकांना अशा लोकांसोबत राहाणे आवडत नाही. ते त्यांच्यापासून अंतर ठेवणे पसंत करतात.

Acharya Chanakya Said Do Not Do These Three Things If You Want To Avaoid Slander

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chanakya Niti : या गोष्टी ठरतात एखाद्या व्यक्तीच्या वाईट काळाचे कारण, जाणून घ्या चाणक्य नीति काय म्हणते ते

Chanakya Niti | अत्यंत आदरणीय असतात हे 7 व्यक्ती, यांना चुकूनही पाय लावू नये

अजित पवार यांच्या विमानात बॉम्ब होता का?
अजित पवार यांच्या विमानात बॉम्ब होता का?.
एक स्वीकृत नगरसेवकपद मिळण्यासाठी मनसे आग्रही
एक स्वीकृत नगरसेवकपद मिळण्यासाठी मनसे आग्रही.
सुनेत्रा पवारांचा शपथविधी इतक्या लवकर का? शिवसेना नेत्यांचा सवाल
सुनेत्रा पवारांचा शपथविधी इतक्या लवकर का? शिवसेना नेत्यांचा सवाल.
महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपला MIM चा पाठिंबा?
महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपला MIM चा पाठिंबा?.
कोल्हापूरच्या महापौरपदी रुपाराणी निकम यांची निवड
कोल्हापूरच्या महापौरपदी रुपाराणी निकम यांची निवड.
भाजपचंच वर्चस्व... आठ महापालिकेत कोण बनलं महापौर? घ्या जाणून
भाजपचंच वर्चस्व... आठ महापालिकेत कोण बनलं महापौर? घ्या जाणून.
मोदींचा विद्यार्थ्यांना कानमंत्र, कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा?
मोदींचा विद्यार्थ्यांना कानमंत्र, कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा?.
मुंबईच्या राजकारणात उलथापालथ; शरद पवार गटाचा आवाज सत्ताधाऱ्यांमध्ये
मुंबईच्या राजकारणात उलथापालथ; शरद पवार गटाचा आवाज सत्ताधाऱ्यांमध्ये.
महत्वाच्या महामार्गावर 32 तास वाहतूक ठप्प; प्रशासन यंत्रणेवर सवाल
महत्वाच्या महामार्गावर 32 तास वाहतूक ठप्प; प्रशासन यंत्रणेवर सवाल.
सत्ता हातात आली की शिंगं फुटतात; राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
सत्ता हातात आली की शिंगं फुटतात; राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल.