AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | आचार्य चाणक्य यांच्या या 5 गोष्टी लक्षात ठेवा, कधीही आर्थिक चणचण भासणार नाही

आचार्य चाणक्य यांनी आयुष्याच्या जवळजवळ प्रत्येक पैलूवर आपले विचार मांडले आहेत. संपत्तीबाबत, आचार्य मानत होते की पैसा हा माणसाचा खरा मित्र आहे. म्हणून संपत्ती नेहमी साठवली पाहिजे. जेव्हा आपल्या जवळचेही आपली साथ सोडतात, तेव्हा तुमचे जमा केलेले पैसे कामी येतात. आयुष्यात कधीही आर्थिक चिंता वाटू नये असे तुम्हाला वाटत असेल तर आचार्य चाणक्य यांच्या या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा.

Chanakya Niti | आचार्य चाणक्य यांच्या या 5 गोष्टी लक्षात ठेवा, कधीही आर्थिक चणचण भासणार नाही
Chanakya Niti
| Edited By: | Updated on: Jul 30, 2021 | 7:28 AM
Share

मुंबई : आचार्य चाणक्य यांनी आयुष्यभराच्या अनुभवांच्या जोरावर जे काही सांगितले आहे, त्या गोष्टी आजच्या तरुण पिढीने समजून घेतल्या पाहिजेत. कारण, त्या गोष्टी आजच्या वातावरणातही अचूक असल्याचे सिद्ध होते. आचार्य केवळ विलक्षण बुद्धिमत्तेचे धनी नव्हते, तर ते सर्व विषयांचे जाणकारही होते. आजच्या पिढीसाठी ते मॅनेजमेंट गुरुपेक्षा कमी नाहीत (Acharya Chanakya Advise 5 Things To Understand About Money In Chanakya Niti).

आचार्य चाणक्य यांनी आयुष्याच्या जवळजवळ प्रत्येक पैलूवर आपले विचार मांडले आहेत. संपत्तीबाबत, आचार्य मानत होते की पैसा हा माणसाचा खरा मित्र आहे. म्हणून संपत्ती नेहमी साठवली पाहिजे. जेव्हा आपल्या जवळचेही आपली साथ सोडतात, तेव्हा तुमचे जमा केलेले पैसे कामी येतात. आयुष्यात कधीही आर्थिक चिंता वाटू नये असे तुम्हाला वाटत असेल तर आचार्य चाणक्य यांच्या या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा.

1. चाणक्य यांच्या मते, पैसा नेहमी विचारपूर्वक खर्च केला पाहिजे. जे लोक विनाकारण पैसे खर्च करतात, त्यांच्याकडे पैसा जास्त काळ टिकत नाही. म्हणून, शक्य तेवढे पैसे वाचवा जेणेकरुन जेव्हा गरज असेल तेव्हा आपण ते वापरु शकाल.

2. जर तुम्हाला आयुष्यात पैसे कमवायचे असतील तर नेहमी तुमच्या ध्येयावर नजर ठेवा. आपले ध्येय साध्य करणे आपल्या संपत्तीचे साधन बनते. म्हणूनच, आयुष्यात तुम्हाला काय करायचे आहे याची एक रुपरेषा तयार करा आणि त्यावर परिश्रमपूर्वक काम करा.

3. रोजगाराची साधने असतील तेथेच यश मिळण्याची शक्यता आहे. म्हणून, अशा ठिकाणी राहा जिथे तुम्हाला रोजगाराची चिंता नाही. अशी परिस्थिती किंवा लोकांना सोडून दिले पाहिजे जे तुमच्या यशामध्ये अडथळा आणतात. जर तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुम्हाला आर्थिक चिंता कधीही करावी लागणार नाही.

4. चाणक्य यांच्या मते, एखाद्याने नेहमी प्रामाणिकपणे आणि मेहनतीने पैसे कमवावेत कारण चुकीच्या मार्गाने कमावलेला पैसा जास्त काळ टिकत नाही. असे लोक एक ना एक दिवस नक्कीच अडचणीत येतात आणि चुकीने कमावलेले पैसे पाण्यासारखे वाहून जातात. प्रामाणिकपणा आणि कष्टाने मिळवलेले पैसे त्या व्यक्तीसाठी नेहमीच उपयोगी पडतात.

5. आपले पैसे नेहमी आपल्या अधिकारक्षेत्रात असले पाहिजेत. जो पैसा इतरांच्या ताब्यात राहतो, तो कधीच वेळेवर कामी येत नाही. अशा परिस्थितीत पश्चात्ताप करण्याशिवाय दुसरा मार्ग उरत नाही.

Acharya Chanakya Advise 5 Things To Understand About Money In Chanakya Niti

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chanakya Niti : या गोष्टी ठरतात एखाद्या व्यक्तीच्या वाईट काळाचे कारण, जाणून घ्या चाणक्य नीति काय म्हणते ते

Chanakya Niti | अत्यंत आदरणीय असतात हे 7 व्यक्ती, यांना चुकूनही पाय लावू नये

तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार.
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा.
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का.
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा...
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा....
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी.