AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | व्यक्तीच्या खऱ्या मित्राप्रामाणे अखेरच्या श्वासापर्यंत या चार गोष्टी त्याला साथ देतात

आचार्य चाणक्य एक महान राजनयिक होते. आयुष्यातील प्रत्येक बाबींचा त्यांनी खोलवर (Four Things Are True Friends Of Human) जाऊन अभ्यास केला होता. हेच कारण आहे की आजच्या काळातही त्यांचे शब्द अचूक सिद्ध झाले आहेत.

Chanakya Niti | व्यक्तीच्या खऱ्या मित्राप्रामाणे अखेरच्या श्वासापर्यंत या चार गोष्टी त्याला साथ देतात
Chanakya Niti
| Updated on: Apr 28, 2021 | 9:29 AM
Share

मुंबई : आचार्य चाणक्य एक महान राजनयिक होते. आयुष्यातील प्रत्येक बाबींचा त्यांनी खोलवर (Four Things Are True Friends Of Human) जाऊन अभ्यास केला होता. हेच कारण आहे की आजच्या काळातही त्यांचे शब्द अचूक सिद्ध झाले आहेत. आचार्य चाणक्य यांच्या धोरणांचे अनुसरण केल्यास, एखादी व्यक्ती सर्वात मोठ्या आव्हानांना अगदी सहज पार करु शकते. चाणक्य यांनी चाणक्य नीतित चार गोष्टींचा उल्लेख करुन त्याला मनुष्याचे खरे सहकारी म्हणून वर्णन केले आहे. कारण या गोष्टी शेवटच्या श्वासापर्यंत त्याचे समर्थन करतात. त्यांच्याबद्दल जाणून घ्या (Acharya Chanakya Said These Four Things Are True Friends Of Human In Chanakya Niti)-

विद्या मित्रं प्रवासेषु भार्या मित्र गृहेषु च व्याधितस्यौषधं मित्र धर्मो मित्रं मृतस्य

1. आचार्य चाणक्य म्हणतात की जे लोक आपल्या घरापासून बरेच दूर राहतात त्यांच्यासाठी ज्ञान हा त्यांचा खरा सहकारी आहे. एखाद्या अज्ञात ठिकाणी एखाद्या व्यक्तीचे ज्ञान त्याला केवळ इतर लोकांमध्ये सन्मान आणि आदर मिळवून देत नाही, तर सर्व समस्यांवर मात करण्यास देखील मदत करते. म्हणूनच, जीवनात जितके शक्य असेल तितके ज्ञान मिळवत रहा.

2. पती आणि पत्नीचे नाते रथाच्या दोन चाकांसारखे आहे, जे एकत्र फिरतात. जर एक चाक डबघाईला आला तर संपूर्ण रथाचे संतुलन बिघडते. आचार्य चाणक्य म्हणाले की, ज्या लोकांची पत्नी त्यांची चांगली मित्र बनते त्यांना समाजात खूप आदर आणि सन्मान मिळतो. ती बायको त्याच्याबरोबर प्रत्येक सुखात आणि दुःखात असते. ती आपल्या पतीच्या आनंदाची काळजी घेते, त्याचबरोबर वाईट वेळेवर संयम ठेवून संकटाचा सामना करण्याचे धैर्य वाढवते.

3. औषध ही व्यक्तीची तिसरी सोबती आहे. जेव्हा-जेव्हा एखाद्या व्यक्तीला अस्वस्थ वाटते, तेव्हा औषध पुन्हा निरोगी होण्यासाठी संपूर्ण शक्ती देते आणि सर्वात मोठ्या आजारापासून त्याचे संरक्षण करते.

4. या व्यतिरिक्त व्यक्तीचा चौथा खरा सोबती म्हणजे त्याचा धर्म. जी व्यक्ती सदैव धर्माच्या मार्गावर चालतो, तो सदैव सत्कर्म करतो. हे सत्कर्म तो जिवंत असताना त्याचा सन्मान करतात, तसेच त्याचे निधन झाल्यानंतरही प्रेरणा म्हणून त्याचे स्मरण केले जाते. म्हणून प्रत्येक व्यक्तीने नेहमीच धर्माचा मार्ग अवलंब केला पाहिजे.

Acharya Chanakya Said These Four Things Are True Friends Of Human In Chanakya Niti

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chanakya Niti | ‘हे’ लोक स्वतःच्याच विनाशाचे कारण बनतात

Chanakya Niti | स्त्रिया पुरुषांपेक्षा अधिक बुद्धिमान आणि धैर्यवान असतात

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.