AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bhalchandra Sankashti Chaturthi 2021 | भालचंद्र संकष्टी चतुर्थी कधी?, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्त्व

भालचंद्र संकष्टी चतुर्थी उद्या 31 मार्चला बुधवारी आहे. संकष्टी चतुर्थी दर महिन्यात दोन वेळा येते कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्षात ( Bhalchandra Sankashti Chaturthi 2021).

Bhalchandra Sankashti Chaturthi 2021 | भालचंद्र संकष्टी चतुर्थी कधी?, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्त्व
Lord ganesha
| Updated on: Mar 30, 2021 | 11:00 AM
Share

Bhalchandra Sankashti Chaturthi 2021 | भालचंद्र संकष्टी चतुर्थी उद्या 31 मार्चला बुधवारी आहे. संकष्टी चतुर्थी दर महिन्यात दोन वेळा येते कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्षात. संकष्टी चतुर्थीला भगवान शंकराचे पुत्र गणेश भगवान यांची पूजा-अर्चना केली जाते. गणेश भक्त यादिवशी गणेशाची कृपा व्हावी यासाठी उपवास ठेवतात. संकष्टी चतुर्थी उपवास सर्व इच्छा पूर्ण करणारा मानला जातो. पौराणिक मान्यतेनुसार, हा उपवास केल्याने विघ्नहर्ता गणेश भगवान भाविकांच्या सर्व समस्या आणि संकट दूर करतात. चला जाणून घेऊ या उपवासाचा शुभ मुहूर्त आणि पूजा विधी (Bhalchandra Sankashti Chaturthi 2021 Know The Shubh Muhurat And Importance)…

भालचंद्र संकष्टी चतुर्थी शुभ मुहूर्त –

भालचंद्र संकष्टी चतुर्थी बुधवार, 31 मार्च, 2021 चन्द्रोदय – रात्री 9 वाजून 39 मिनिटं

चतुर्थी तिथी प्रारम्भ – 31 मार्च , 2021, गुरुवारला दुपारी 2 वाजून 6 मिनिटं

भालचंद्र संकष्टी चतुर्थी उपवास पूजा विधी :

भालचंद्र संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी उठून नित्यक्रम आणि स्नान करा. स्वच्छ वस्त्र परिधाण करा. पूजाघराची साफ सफाई करा आणि व्रतसंकल्प करा. त्यानंतर गणेश भगवानची पूजा-अर्चना करा. त्यांना तीळ, गुळ, लाडू, दुर्वा, चंदन आणि मोदक अर्पित करा. गणेशाची आरती करा. भगवान गणेशाच्या मंत्राचा जप करा. पूर्ण दिवस उपवास ठेवा. चंद्र निघण्यापूर्वी गणेश देवाची पूजा करा आणि चंद्रमा अर्घ्य द्या.

भालचन्द्र संकष्टी चतुर्थी व्रताचं महत्त्व :

हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार, भालचंद्र संकष्टी चतुर्थी व्रताला सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ मानलं जातं. धर्म शास्त्रानुसार गणेशाला प्रथम देव मानण्यात आलं आहे. त्यामुळे प्रत्येक शुभ कार्यापूर्वी त्यांची पूजा-अर्चना केली जाते आणि त्यांचा उपवास ठेवला जातात. गणेश देवाला विघ्नहर्ताही म्हटलं जातं. हा उपवास करणाऱ्या भाविकांच्या आयुष्यातील सर्व कष्ट आणि समस्या गणेश भगवान दूर करतात.

धार्मिक मान्यतेनुासर भगवान गणेशाची पूजा अर्चना केल्याने यश, धन, वैभव आणि उत्तम आरोग्याची प्राप्ती होते. सोबतच सर्व प्रकारच्या संकट आणि दु:खाचं निवारणही होतं. या दिवशी लोक उपवास ठेवतात आणि चंद्राच्या दर्शनानंतर उपवास पूर्ण मानला जातो.

Bhalchandra Sankashti Chaturthi 2021 Know The Shubh Muhurat And Importance

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Vinayak Chaturthi 2021 | विनायक चतुर्थी, पूजेचा शुभ मुहूर्त आणि पूजा विधी जाणून घ्या…

बाळासाहेबांना अपेक्षित प्रशासन चालवू, भाजपचा महापौर होताच....
बाळासाहेबांना अपेक्षित प्रशासन चालवू, भाजपचा महापौर होताच.....
तो पूर्व विदर्भातील नेता कोण? नाव जाहीर करा... संजय राऊत यांचं आवाहन
तो पूर्व विदर्भातील नेता कोण? नाव जाहीर करा... संजय राऊत यांचं आवाहन.
मुंबई महापालिकेत महापौर राज सुरू; रितू तावडे महापौर तर...
मुंबई महापालिकेत महापौर राज सुरू; रितू तावडे महापौर तर....
रितू तावडे यांनी सांगितला मास्टर प्लान, मुंबईतून या लोकांना...
रितू तावडे यांनी सांगितला मास्टर प्लान, मुंबईतून या लोकांना....
तो फोन, विदर्भातील नेता आणि... रोहित पवारांनी मांडल्या तीन मोठ्या शंका
तो फोन, विदर्भातील नेता आणि... रोहित पवारांनी मांडल्या तीन मोठ्या शंका.
अशी कोणती फाईल होती?, ज्या फाईलवर सही हवीच होती; संजय राऊत यांचा सवाल
अशी कोणती फाईल होती?, ज्या फाईलवर सही हवीच होती; संजय राऊत यांचा सवाल.
फडणवीसांचा गुप्त दिल्ली दौरा, सुनेत्रा पवारही राजधानीत
फडणवीसांचा गुप्त दिल्ली दौरा, सुनेत्रा पवारही राजधानीत.
अजितदादा प्लास्टिक बॉटल ऐवजी काचेची बॉटल का वापरत होते?
अजितदादा प्लास्टिक बॉटल ऐवजी काचेची बॉटल का वापरत होते?.
अजितदादांच्या विमान अपघाताबाबत मला शंका, रोहित पवारांचा खळबळजनक दावा
अजितदादांच्या विमान अपघाताबाबत मला शंका, रोहित पवारांचा खळबळजनक दावा.
अजितदादांच्या विमान अपघातावर रोहित पवारांचा मोठा दावा
अजितदादांच्या विमान अपघातावर रोहित पवारांचा मोठा दावा.